शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
3
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
4
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
5
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
6
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
7
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासरखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
8
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
9
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
10
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
11
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
12
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
13
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
14
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
15
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
16
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
17
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
18
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
19
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
20
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

गायकवाड प्रकरणाचे संसदेत पडसाद

By admin | Updated: March 28, 2017 04:10 IST

शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांच्यावर फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाइन्सने घातलेली विमान प्रवास बंदी हटविण्यासाठी

हरिश गुप्ता / नवी दिल्लीशिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांच्यावर फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाइन्सने घातलेली विमान प्रवास बंदी हटविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे, केंद्र सरकारने प्रतिसाद न देता गायकवाड यांचे वर्तन स्वीकारण्यासारखे नसल्याचे स्पष्ट केले आहे.गायकवाड यांच्यावरील विमानबंदीचे सोमवारी संसदेत पडसाद उमटले. शिवसेनेसह अन्य सदस्यांनी हा मुद्दा मांडून बंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी गदारोळ घातला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी या मुद्द्यावर घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे सरकारही नमते घेण्याच्या तयारीत नसल्याचे स्पष्ट दिसते.नागरी उड्डयणमंत्री पी. अशोक गजपती राजू यांनीही गायकवाड यांचे वर्तन स्वीकारार्ह नसल्याचे सांगितल्याने सरकारची भूमिकाही कठोर असल्याचे दिसून आले. एखादा खासदार अशा भानगडीत अडकेल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते, असे ते म्हणाले. या मुद्यावर लोकसभेध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी शिवसेनेचे खासदार आणि नागरी उड्डयणमंत्री राजू यांच्याशी चर्चाही केली. तथापि, बंदी मागे घेतल्यास चांगला संदेश जाणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.लोकसभेत या मुद्द्यावर शिवसेनेच्या खासदारांनी गोंधळ घातला. खासदाराला संसदेत यावे लागते. ते दरवेळी ट्रेनने प्रवास करू शकत नाहीत. काही वेळा त्यांना विमानाने प्रवास करावा लागतो, वाटल्यास घटनेची चौकशी करा, असे शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ, चंद्रकात खैरे, भावना गवळी यांनी सांगितले. यावर त्या म्हणाल्या की, काय घडले, चूक कोणाची, हा वेगळा मुद्दा आहे. या विषयावरून कामकाज विस्कळीत करू दिले जाणार नाही. मला अधिक बोलण्यास भाग पाडू नका, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. राज्यसभेतही उपसभापती पी. जे. कुरियन यांनी समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल यांना हा मुद्दा उपस्थित करू दिला नाही. तिथे शिवसेनेच्या एकाही सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला नाही. बंदी घालण्याचे स्वातंत्र्य विमान कंपन्यांना आहे. मात्र नियमात दुरुस्तीचा विचार होऊ शकतो. परंतु, गायकवाड प्रकरणाचा वाद विकोपाला गेल्याने इथे तसे करणे अवघड आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.अनिश्चित नव्हे, तर मर्यादित काळासाठी विमान प्रवास बंदी घातली जावी, यासंबंधी फेडरेशनशी बोलणी सुरू आहेत. आजन्म बंदी घालता येत नाही. गैरवर्तन केल्याचे आढळून आल्यास प्रवाशावर पुन्हा विमान प्रवासबंदी घालण्याचा इशारा दिला जातो.भाजपनेही शिवसेनेला स्पष्ट सांगितले की, गायकवाड यांच्या वर्तनामुळे राजकारण्यांची बदनामी झाली असून हा वाद लवकर संपविणे, हेच चांगले राहील. पंतप्रधानांनीही शिवसेनेच्या खासदारांचे म्हणणे ऐकण्याची सूचना धुडकावली आहे. घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करून वाद मिटवावा, यासाठी खासदाराला राजी करण्याचे येत असल्याचे समजते.भाजपला असे वाटते की, हा मुद्या चांगलाच तापला असून शिवसेनाही एकटी पडली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना नेत्यांनी केलेली विधानेही अस्वीकारार्ह आहेत. शिवसेना विश्वासू नाही. राष्ट्रपतीपदाच्या मागच्या दोन निवडणुकीतही शिवसेने एनडीएला पाठिंबा दिला नव्हता. तेव्हा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी ‘मातोश्री’वर बोलणी करणे निरर्थक आहे, असे मोदी सरकारच्या वरिष्ठ मंत्र्याने म्हटले आहे. कॉमेडियन कपिल शर्मांना एअर इंडिया देणार इशारानवी दिल्ली : प्रसिद्ध दूरचित्रवाणी कलावंत कपिल शर्मा यांनी नुकत्याच आॅस्ट्रेलिया-भारत विमानात दारू पिऊ न सुनील ग्रोव्हर यांच्यावर केलेला हल्ला आणि घातलेल्या गोंधळानंतर एअर इंडिया शर्मा यांना इशारा देणार आहे. तो या आठवड्यात दिला जाईल. शर्मा यांनी १६ मार्च रोजी मेलबोर्न- दिल्ली-मुंबई विमानात ग्रोव्हर यांच्यावर बूट फेकला व फटके मारले. सोबत असलेल्यांना शिवीगाळ केली. कपिल शर्मा शोचे कलावंत या विमानाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करीत होते.