शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाचे भवितव्य ठरवेल हवाई वाहतुकीचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 03:08 IST

नवीन वर्षात एअर इंडियाला खरेदीदार मिळणार का आणि जेट एअरवेज पुन्हा टेक ऑफ घेणार का, या प्रश्नांच्या उत्तरातच हवाई प्रवासाच्या खर्चाचे गणित अवलंबून राहणार आहे.

- खलील गिरकरभारतीय हवाई वाहतूक क्षेत्राचे भवितव्य एअर इंडियाच्या भवितव्याशी बांधलेले आहे. नवीन वर्षात एअर इंडियाला खरेदीदार मिळणार का आणि जेट एअरवेज पुन्हा टेक ऑफ घेणार का, या प्रश्नांच्या उत्तरातच हवाई प्रवासाच्या खर्चाचे गणित अवलंबून राहणार आहे. २०१९ हे वर्ष भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रासाठी वाईट ठरले. त्यामुळे २०२० हे वर्ष भारतीय हवाई क्षेत्रासाठी प्रगतीची नवी उड्डाणे घेणारे ठरावे, अशी अपेक्षा आहे.नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाच्या कामाला वेग आला आहे. या विमानतळाच्या उभारणीचे महत्त्वपूर्ण काम पुढील टप्प्यात प्रवेश करील. मुंबई विमानतळाची सध्याची ४८ दशलक्ष प्रति वर्ष प्रवाशांची क्षमता लक्षात घेता २०३० मध्ये ही संख्या १०० दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष होऊ शकते.११६० हेक्टर क्षेत्रात उभारण्यात येणाºया या विमानतळामध्ये दोन स्वतंत्र व समांतर धावपट्ट्या असणार आहेत. पूर्ण ११६० हेक्टर जागेचे भूसंपादन झाले असून सिडकोकडे त्याचा ताबा आहे. ७ गावांमधील २,६३३ घरांपैकी २,३९८(९१ टक्के) घरांचे निष्कासन झाले आहे. विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दुसºया टप्प्यात सिंधुदुर्ग, गोंदिया, अमरावती, रत्नागिरी येथील विमानतळे समाविष्ट करण्यात आली असून, त्यापैकी सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ मार्च, २०२० पर्यंत सुरू होईल. विमानतळ विकास प्राधिकरणाने नागपूर व शिर्डी येथे ग्रीनफिल्ड विमानतळ कार्यान्वित केले आहे.एक हजार नवीन मार्गावर विमानसेवाउडान ४.० मध्ये देशातील ३० विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तर पूर्व विभागाला जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालया, त्रिपुरा या राज्यांतील ज्या ठिकाणी विमानसेवा उपलब्ध नाही, ती ठिकाणे हवाई मार्गाने जोडली जातील. याशिवाय लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील विभागांना उडानद्वारे जोडण्यात येईल. पाच वर्षांत देशात १०० विमानतळांच्या माध्यमातून १ हजार नवीन मार्गांवर सेवा सुरू करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.प्रॅट अँड व्हिटनी इंजीनप्रॅट अँड व्हिटनी इंजीन असलेल्या सर्व विमानांमधील इंजीन ३१ जानेवारी, २०२० पर्यंत बदलण्याचे निर्देश नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) देण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन वर्षात प्रॅट अँड व्हिटनी इंजिनामुळे विमान प्रवासात येणाºया अडचणी येणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.हवाई वाहतूक व्यवस्थापन सुधारणारएअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियातर्फे टेलिकम्युनिकेशन्समध्ये पायाभूत सुविधा वाढविण्याचे प्रयत्न केले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून फ्युचरिस्टिक टेलिकम्युनिकेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे काम २०२० मध्ये सुरू होईल. त्यासाठी ९४५ कोटी रु पयांचे कंत्राट अमेरिकन कंपनीला देण्यात आले आहे.नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने पुढील पाच वर्षांत देशभरात १०० पेक्षा जास्त विमानतळांच्या माध्यमातून एक हजार मार्गांवर हवाई वाहतूक सुरू करून देशात सर्वत्र हवाई वाहतूक पोहोचविण्याचे ध्येय बाळगले आहे. ज्या मार्गांवर जास्त वाहतूक केली जाणे शक्य असेल, अशा मार्गांचा यामध्ये प्राधान्याने विचार केला जात आहे.- उषा पढी, संयुक्त सचिव, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, नवी दिल्ली

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया