शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

इंधनही संपत आलेले; अमेरिकेच्या वादळातून एअर इंडियाच्या पायलटनं 370 जणांना दिला पुनर्जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 12:26 IST

शेवटची 37 मिनिटे घाबरवणारी; वादळाने 370 प्रवाशांसह एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला

न्यूयॉर्क : ''हवामान खराब आहे, इंधनही संपत आलेय, आम्ही पुरते अडकलोय'', हे गंभीर शब्द आहेत एअर इंडियाच्या पायलटचे. अमेरिकेसाठी 11 सप्टेंबरला एअर इंडियाच्या दिल्ली-जेएफके AI 101 विनाथांबा बोइंग 777 विमानाने उड्डाण केले खरे, मात्र तेथील वादळाने 370 प्रवाशांसह एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला. तब्बल दीड तास हवेत घिरट्या घातल्यानंतर वरिष्ठ पायलट रुस्तम पालिया यांनी विमान सुखरुप विमानतळावर उतरवले. मात्र, शेवटची 37 मिनिटे घाबरवणारी होती.

अमेरिकेमध्ये गेल्या आठवड्यात फ्लॉरेन्स वादळाने थैमान घातले होते. यावेळी दिल्लीवरून उड्डाण केलेले एअर इंडियाचे विनाथांबा विमान AI 101 न्युयॉर्कजवळ पोहोचले होते. मात्र, विमानात इंधन कमी उरले होते. अशातच इन्स्ट्रमन्ट लैंडिंग सिस्टम (ILS) हा कमी दृष्यमानतेमध्ये काम करणारे यंत्र बंद पडले. यामुळे विमानाला जास्त दृष्यमानता असलेल्या धावपट्टीवर उतरवण्याती गरज होती. मात्र, हवामान खराब असल्याने पायलट विमान उतरवू शकत नव्हते. यामुळे कॅप्टन पालिया आणि सिंह यांना विमान उतरविण्याचा निर्णय रद्द करावा लागला. विमान कमी इंधनावरच हवेत घिरट्या घालू लागले. 

जेकेएफ विमानतळावरील नियंत्रण कक्षासोबत पायटांचे बोलने ऐकल्यावर किती गंभीर परिस्थिती ओढवली होती याची कल्पना येते. जेकेएफ विमानतळावर AI 101 च्या विमानाअगोदर दुसरे विमान उतरणार होते. कॉकपीटने इशारा दिला. यामुळे विमानाने पहिली घिरटी घातली. दुसऱ्या प्रयत्नावेळी विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विमानातील प्रणालीचील बिघाडामुळे अन्य उपकरणेही बंद होऊ लागली. 

कॅप्टन पालिया आणि सिंह यांनी  नियंत्रण कक्षाला न घाबरता विमान बिघडल्याचे सांगितले. यामुळे पुढे ही उपकरणे नीट होतील का याबाबत शंकाही व्यक्त केली. नियंत्रकाने त्यांना मार्गदर्शन केले. त्याने अॅटोलँडचा पर्याय निवडण्यास सांगितले. मात्र, विमानाचे दोन्ही रेडियो अल्टीमीटर बंद पडले होते. यामुळे वैमानिकांनी नकार दिला. तसेच ट्रैफिक कोलिजन अवॉइडेंस सिस्टमही बंद पडल्याने दिसत नसताना विमान उतरवणे धोक्याचे असल्याचे सांगितले. तसेच दुसऱ्या सुरक्षित धावपट्टीचा पर्याय देण्यास सांगितले. 

यावेळी नेवार्क, बोस्टन, लोगान, वॉशिंग्टन, डलास सारख्या जवळच्या विमानतळांचाही पर्याय सुचविण्यात आला. मात्र, तेवढे इंधन विमानात नव्हते. एटीसीने विमानात किती वेळासाठी इंधन उरल्याचे विचारले. तेव्हाच नेवार्कच्या विमानतळावरील वातावरण निवळायला लागले. यामुळे एटीसीने नेवार्कला विमान नेण्यास सांगितले. तसे विमान नेवार्ककडे वळले. 

विमानात यावेळी 7200 किलो इंधन होते. 14 तासांच्या उड्डाणानंतर एवढे इंधन राहिले होते. या दीड तासांच्या हवेतील थरारक कसरतींनंतर विमान शेवटी पायलटांनी मोठ्या कौशल्याने नेवार्कला सुखरुप उतरविले. विमानात आणखी दोन पायलटही होते. एअर इंडियाने एवढ्या कठीण परिस्थितीत धैर्य दाखविल्याबद्दल चारही पायलटांचे आभार मानले आहेत. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAmericaअमेरिकाairplaneविमानAirportविमानतळ