शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

तासांवर विकली जाणारी मैत्री

By admin | Updated: March 11, 2016 12:37 IST

आपल्या स्वभावाचं, आपला आनंद शेअर करणारं, ज्याच्याशी मनातलं बोलू शकू असं सच्च्या मैत्रीचं आताशा कुणीच भेटू नये इतकं कोरडं, अलिप्त का झालं असेल अनेकांचं आयुष्य?

एकटेपणावर बाजारपेठेचा जालीम उपाय! 

- चिन्मय लेले
मुंबई, दि. ११ - जमाना स्टार्टअपचा आहे. कुणाला  काय उद्योग, कल्पना सुचेल याचा नेम नाही. विशेष म्हणजे, नुस्ता उद्योग सुचून उपयोग  नाही, तर लोकांची गरज अचूक ओळखून, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून त्यातून आपला उद्योग वाढीस लावण्याचं कसबही अंगी हवंच. त्यातून अमेरिकेतल्या काही तरुणांनी आता नवीनच उद्योग सुरू केला आहे. त्याचं नाव आहे, ‘रेण्ट अ फ्रेण्ड’. आणि एकटी अमेरिका कशाला, आता जगभरात ही नवीन इंडस्ट्रीच सुरू होणार अशी चर्चा आहे. तिचं नाव आहे फ्रेण्ड रेण्टल इण्डस्ट्री.
जपानमध्ये या अजब उद्योगाची सुरुवात झाली, पण त्यानं मूळ धरलं ते अमेरिकेत. सध्या अमेरिका आणि कॅनडात या उद्योगाची बरीच चर्चा आहे. ‘रेण्टअफ्रेण्ड डॉट कॉम’ या वेबसाइटच्या माध्यमातून चालणा-या या उद्योगात सध्याच दोन लाखांवर अनेक लोकांनी स्वत:ला सदस्य म्हणून (पैसे देऊन) नोंदवलं आहे. स्कॉट रोजबम यानं ही वेबसाइट सुरू केली. तो म्हणतो, ‘मैत्री अशी भाडय़ानं कशी देताघेता येईल याची तात्त्विक चर्चा करण्यात मला रस नाही. मोठय़ा शहरात अनेकजण एकेकटे आहेत. साधं पबमध्ये, बाहेर जेवायला, कुठं सिनेमाला, लॉँग ड्राइव्हला जायचं तर कुणी सोबत नाही. मग ते एकेकटे कुढत घरात बसतात. त्यापेक्षा थोडे पैसे दिले आणि आपल्यासारख्याच आवडीनिवडी असलेलं कुणी ‘सोबत’ म्हणून स्वीकारलं तर काय बिघडतं? यातून अनेक माणसांमध्ये पुढे मैत्रीही होऊ शकते. मुळात जे असे भाड्यानं मित्र म्हणून जातात त्यांच्यासाठी काही नियम असतात. कुठल्याच प्रकारचं गैरवर्तन करायचं नाही, शारीरिक लगट नाही, ‘तस्लं’ काही नाही. फक्त निखळ मैत्रीनी आवडीनिवडीचं शेअरिंग इतपतच हे सारं मर्यादित ठेवणं अपेक्षित नाही तर कॉण्ट्रॅक्टनुसार कायदेशीररीत्या बंधनकारकही असतं. त्यामुळे काळाची गरज म्हणून या उद्योगाकडे पाहायला हवं!’
आता तर अमेरिकेपासून दूर पूर्वेला ऑस्ट्रेलियातही हे ‘फ्रेण्ड्स फॉर हायर’ नावाचे उद्योग सुरू झाले आहेत. आणि तिकडे या विषयावरून बरीच चर्चा झडते आहे, वाद आहेत, तरुण मुलांच्या एकटेपणाची चर्चा आहे असं इंटरनेट धुंडाळलं तर दिसतं! पण मुख्य मुद्दा म्हणजे गरज काय ही अशी काही तासांची मैत्रीपूर्ण सोबत भाडय़ानं घेण्याची? तर त्याचं एका शब्दात उत्तर आहे ते लाइफस्टाइल.
अतिवेगवान जीवनशैली. मोठय़ा शहरातले बडे जॉब्ज. लांबच लांब कामांचे तास. रात्र होऊन जाते पण ऑफिसच्या बाहेर अनेकांना पडता येत नाही. कुठं कुणाकडे जाता येत नाही की सोशलायझिंग नाही. त्यातल्या काहींचे मित्रंचे ग्रुप्सही नसतात नवख्या शहरात. सहका:यांशी आताशा मैत्री होईनाशी झाली आहे अशी गत. त्यामुळे सुटीच्या दिवशी कुठं बाहेर जायचं, अगदी शॉपिंगलाही जायचं तर सोबत कुणी नाही. कार आहे पण लॉँग ड्राइव्हला एकटय़ानंच जायचं, पैसे आहेत पण हॉटेल-सिनेमा-पबमध्ये जायचं तर सोबत नाही.
जे मुलग्यांचं तेच मुलींचंही! त्यात एकेकटय़ानं जायचं तर मजा येत नाही. आणि जे सोबत आहेत त्यांना आपल्या विषयात रस असेलच असंही नाही. म्हणजे म्युझियम, गाण्याचे कार्यक्रम, जिम, शॉपिंग, बर्ड वॉचिंग. असे किती प्रकार. त्यात मित्रमैत्रिणींना रस नसला तरी हळूहळू अनेक जणांचं एकेकटय़ानं हे सारं करणं बंद होतं. मग त्यावर उपाय काय? काही सूज्ञ लोकांना गरज आहे की, यांना मित्रांची गरज आहे. त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीनं अशा ‘गरजू’ची गाठ घालून द्यायला सुरुवात केली. त्यातून काहींना सोबत मिळाली, तर काहींना पैसे. दोन तास ते दोन दिवस असे आता मित्र भाडय़ानं घेणं सुरू झालं. आपण अशा रेण्ट केलेल्या ‘मित्र’ सोबत म्युझियम कसं पाहिलं, शॉपिंग कसं केलं याचे किस्से अनेकजण आता जगजाहीर शेअरपण करत आहेत.
मुख्य म्हणजे आपल्याला जिवाभावाचे मित्र नाहीत, अपेक्षाविरहित मैत्री आपल्या वाटय़ाला आलेली नाही याचा खेद किंवा खंत कुणी व्यक्त करताना दिसत नाही. उलट आपला ‘एकटेपणा’ संपायला आणि आपल्या आवडीनिवडीतला आनंद नव्यानं जगायला आपण यातून सुरुवात केली असं अनेकजण सांगत आहेत! 
हे सारं असं ‘घडत’ असताना प्रश्न मात्र पडतोच की, असं का व्हावं? आपल्या स्वभावाचं, आपलाच आनंद शेअर करणारं, आपण ज्याच्याशी मनातलं बोलू शकू असं सच्च्या मैत्रीचं आताशा कुणीच भेटू नये इतकं कोरडं, अलिप्त का झालं असेल अनेकांचं आयुष्य? प्रश्न आहेच. आणि माणसांच्या गरजांची आणि प्रश्नांची तड लावत त्यातून पैसे कमवण्याची बाजारपेठेची तयारीही आहे. म्हणून मग बाजारपेठ कामाला लागलेली दिसते. आणि मैत्री भाडय़ानं देण्याचे स्टार्टअप्सही कामाला लागलेले दिसताहेत. जागतिकीकरण अनेक गोष्टी बदलून टाकेल अशी चर्चा पूर्वी होतीच. पण म्हणजे किती आणि काय काय बदलेल. याची ही एक फक्त झलक आहे!
 
स्वकेंद्री जगणारं पैसेफेकू जग
मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, नव्या जगात मानवी जगण्याची ही शोकांतिका आहे!  
 
या ‘रेण्टल’ मैत्रीविषयी जगभरातले मानसोपचारतज्ज्ञ मात्र अत्यंत गंभीर मत व्यक्त करत आहेत. त्यांना काळजी आहे मेट्रो शहरातल्या तारुण्याच्या बदलत्या मानसिकतेची!
अनेक मानसोपचारतज्ज्ञ आणि मनोविकारतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मोठय़ा शहरात ‘एकेकटे’ राहण्याचे प्रश्न जगभरच गंभीर होत चालले आहेत. कुठं बाहेर जायचं तर, काही सेलिब्रेट करायचं तर ‘आपली’ वाटावी अशी अनेक माणसं अवतीभोवती नसल्याची समस्या अनेकांची आहे. दुसरीकडे ही ‘एकेकटी’ माणसं सतत कानाला आणि हाताला चिकटलेल्या मोबाइलमध्ये हरवलेलीही दिसतात. सतत कनेक्टेड. व्हर्च्युअल माणसांनी वेढलेले. मात्र तरीही अत्यंत एकेकटे. ही अशी ‘भाडय़ानं’ घेतली जाणारी मैत्री हे समाजस्थितीचं अत्यंत दु:खद रूप आहे. मानवी नाती किती पोकळ होत चालली आहेत हे तर यातून दिसतं आहेच; पण अति स्वकेंद्री जगणं माणसांना कुठवर घेऊन जाणार याचीही ही एक झलक आहे. आपल्याच आनंदात वाटेकरी हवेत, दुस-याशी जुळवून घेत आपला आनंद जगणं हे आता कालबाह्य होईल की काय, अशी भीतीही अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  
माणसाला सच्चे मित्र मिळू नयेत, आणि पैसे फेकून या ‘सेवा’ विकत घ्याव्या लागाव्यात हे अत्यंत भयाण चित्र आहे, असंही मत काहीजण व्यक्त करत आहेत.