शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

चार वर्षांत १,८२२ घुसखोर देशाबाहेर, काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 4:29 AM

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमधून ४० लाख लोकांची नावे गायब झाल्यानंतर काँग्रेस व भाजपा एकमेकांवर आरोप करीत असून, अधिक विदेशी लोकांना कोणी बाहेर काढले, यावरून त्यांच्यात जुंपली आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमधून ४० लाख लोकांची नावे गायब झाल्यानंतर काँग्रेस व भाजपा एकमेकांवर आरोप करीत असून, अधिक विदेशी लोकांना कोणी बाहेर काढले, यावरून त्यांच्यात जुंपली आहे.एनआरसीची सुरुवात आम्हीच केली व ८२ हजार घुसखोरांना देशाबाहेर काढले होते. स्व. राजीव गांधी यांनी विदेशी नागरिकांच्या प्रश्नावर जो आसाम करार केला होता त्या पार्श्वभूमीवरच एनआरसीची सुरुवात झाली, असे सांगून काँग्रेस स्वत:कडे श्रेय घेत आहे. मात्र काँग्रेसने विदेशींनी बाहेर काढण्यासाठी काहीही केले नाही, असा भाजपाचा आरोप आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विदेशी नागरिकांबाबत आपले धोरण काय आहे ते सांगावे, अशी मागणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. मात्र सरकारी आकड्यांनुसार, २००५ मध्ये १४,९१६ बांगलादेशी नागरिकांना परत पाठविण्यात आले. हा आकडा २००६ मध्ये १३,६९२. २००७ मध्ये १२,१३५, २००८ मध्ये १२,६२५, २००९ मध्ये १०,६०२ व २०१० मध्ये ६,२९० होता. तसेच २०११ मध्ये ६,७६१ बांगलादेशी नागरिकांना परत पाठविले. नंतर २०१२ मध्ये ६,५३७ तर २०१३ मध्ये ५,२३४ काँग्रेस सरकारने बांग्लादेशात परत पाठविले. म्हणजेच २००५ ते २०१३ पर्यंते ८२,७२८ बांगलादेशी नागरिकांना परत पाठविण्यात आले.>भाजपाच्या काळात...मोदी सरकारने २०१४ मध्ये आल्यापासून पहिल्या वर्षी ८९८, २०१५ मध्ये ४७४, २०१६ मध्ये ३०८ आणि २०१७ मध्ये ५१ बांग्लादेशींना बाहेर काढले. म्हणजे ४ वर्षांत १८२२ बांगलादेशींना देशातून बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी