शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

चौधरी चरण सिंह यांच्यासह चार दिग्गजांना 'भारतरत्न' प्रदान, आडवाणी यांना घरी जाऊन सन्मानित करणार राष्ट्रपती मुर्मू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 12:42 IST

महत्वाचे म्हणजे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यावेळी पाच दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आल्यानंतर, महामना मालवीय, पंडित अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पीव्ही नरसिंह राव कर्पूरी ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न देण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना या सन्मानाने सन्मानित कणार आहेत.

महत्वाचे म्हणजे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यावेळी पाच दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आल्यानंतर, महामना मालवीय, पंडित अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 53 जणांना भारतरत्न देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 फेब्रुवारीला लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. आता आडवाणी 96 वर्षांचे आहेत आणि ते आजारीही असतात. यामुळे राष्ट्रपती दौपदी मुर्मू 31 मार्चला त्यांच्या निवासस्तानी जाऊन त्यांना भारतरत्नने सन्मानित करतील. अटल बिहारी वाजपेयी आणि नानजी देशमुख यांच्यानंतर आडवाणी असे तिसरे आरएसएसशी संबंधित नेते आहेत, ज्यांना भारतरत्न देण्यात येत आहे.महत्वाचे म्हणजे, पीव्ही नरसिंह राव हे देशाचे नववे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळातच देशाने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि भारताची अर्थव्यवस्था संपूर्ण जगासाठी खुली करण्यात आली. यामुळे त्याला नव्या युगाचे प्रवर्तक म्हटले जाते. चौधरी चरणसिंग हे देशाचे पाचवे पंतप्रधान होते. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ते ओळखले जातात. तसेच, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना जननायक म्हणून ओळखले जाते. ते दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. साधी राहणी आणि उच्च विचार यांमुळे आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

टॅग्स :Bharat Ratnaभारतरत्नDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा