शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

सेम टू सेम... महाराष्ट्र अन् झारखंडच्या निकालातील चार साम्य पाहून चकित व्हाल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 12:48 IST

महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक निकालातील समान धागे

रांची: महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट होऊ लागले आहेत. त्यामध्ये भाजपा सत्तेपासून दूर राहणार असल्याचं दिसत आहे. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या भाजपा ३० जागांवर पुढे आहे. त्यामुळे आणखी एक राज्य भाजपाच्या हातातून जाणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणूक निकालात अनेक समान धागे असल्याचं दिसतं. महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या. मात्र शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या साथीनं सरकार स्थापन केलं. झारखंडमध्ये जेएमएमनं (झारखंड मुक्ती मोर्चा) भाजपाला धक्का दिला. विशेष म्हणजे शिवसेना आणि जेएमएम यांचं निवडणूक सारखंच आहे. हे दोन्ही पक्ष धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवतात.

महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीतील दुसरं साम्य थेट भाजपाशी संबंधित आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. झारखंडमध्ये भाजपा सर्वाधिक ३० जागांवर पुढे आहे. तर महाराष्ट्रात भाजपाला १०५ जागा मिळाल्या होत्या. मात्र तरीही भाजपाला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही. त्याचीच पुनरावृत्ती आता झारखंडमध्ये होण्याची शक्यता आहे. 
महाराष्ट्रात तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीनं भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. झारखंडमध्येही तीन पक्षांची आघाडी (झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल) सत्तेत येताना दिसत आहेत. मात्र दोन्ही राज्यांमधील तीन पक्षांच्या आघाडीत फरक आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलानं निवडणुकीआधीच आघाडी केली. तर महाराष्ट्रात निवडणूक निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी तयार झाली. 
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि झारखंडचे मावळते मुख्यमंत्री आणि त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीत एक समान धागा आहे. झारखंडचे सध्याचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते रघुबर दास पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिलेच बिगर-आदिवासी मुख्यमंत्री आहेत. झारखंड आदिवासीबहुल राज्य असतानाही भाजपानं त्यांना मुख्यमंत्रिपदं दिलं आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. मराठ्यांचं वर्चस्व असलेल्या राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री ठरले, ज्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. महाराष्ट्रात भाजपानं फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली, तर झारखंडमध्ये दास यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचं नेतृत्त्व केलं. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस