शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

उष्माघातामुळे केरळ एक्सप्रेसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:47 PM

सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत.

आगरा - देशात वाढत्या तापमानामुळे गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अशातच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही गरमीचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील आगरा ते झांसी दरम्यान केरळ एक्सप्रेसमधील स्लीपर कोचमध्ये प्रवास करणाऱ्या 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर भारतात वाढत्या तापमानाने उच्चांक गाठला असून अनेक शहरात गरमीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. 

सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. ही ट्रेन निजामुद्दीनपासून त्रिवेंद्रमला जात होती. आगरापासून ट्रेन निघाल्यानंतर पुढील प्रवासात ट्रेन थांबत थांबत पुढे जात होती. त्यामुळे ट्रेनमध्ये 5 प्रवाशांची तब्येत बिघडली. ज्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. झांसी रेल्वे स्टेशनवर या चार जणांचा मृतदेह उतरविण्यात आला. त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. 

दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून या घटनेवर कोणतंही भाष्य केलं जात नाही. उत्तर मध्य रेल्वेचे पीआरओ मनोज कुमार सिंह यांनी तांत्रिक कारणामुळे ट्रेन उशीराने सुरु होती. मात्र या प्रवाशांची तब्येत आधीपासून खराब होती. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळू शकेल असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. 

दहा दिवसांपूर्वी 68 प्रवाशांचा एक गट तामिळनाडूहून वाराणसी आणि आगरा येथे फिरण्यासाठी आला होता. वाराणसीनंतर ते आगरा येथे पोहचले. हे सर्व प्रवासी स्लीपर कोचमधून प्रवास करत होते. आगरा ते झांसी दरम्यान ट्रेन तांत्रिक कारणाने थांबत थांबत पुढे जात होती. या दरम्यान कोचमधील प्रवासी गरमीमुळे त्रस्त झाले होते. ट्रेनमध्ये कोणतीही उपचारासाठी सोय न मिळाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला. 

उत्तर प्रदेशमध्ये रविवारी सर्वाधिक तापमान बांदामध्ये नोंदवलं गेलं होतं. बांदामध्ये 49 डिग्री सेल्सियस तापमान होतं, तर महोबामध्ये 47 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. हरियाणातही तापमान 48 अंशांवर पोहोचलं आहे. तर नारनौलमध्ये 47.6 डिग्री सेल्सियस तापमान होतं. पंजाबमध्येही उष्णतेची लाट कायम आहे. त्याशिवाय राजस्थानमधल्या सहा शहरांमध्ये पारा 47 डिग्रीच्या वर गेला होता. राजस्थानच्या चुरूमध्ये शनिवारी 50.8 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे. उत्तर भारतात गरमीमुळे हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.  

टॅग्स :Heat Strokeउष्माघातKeralaकेरळUttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वे