शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गलवानमध्ये चीनचे चार लष्करी अधिकारी मारले गेले, चीनने अधिकृतपणे पहिल्यांदाच केले मान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 7:26 AM

Galwan : भारतीय लष्कराच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पेंगाँग त्सो तलावाच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यावरून आपापले सैन्य मागे घेण्याचा करार भारत व चीनने केला होता. त्यानुसार टप्प्याटप्प्याने गेल्या काही दिवसांत हे सैन्य मागे घेण्यात आले. 

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या सीमेवरील पेंगाँग त्सो तलावाच्या दोन्ही काठांवरून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया भारत व चीनने पूर्ण केली आहे. दरम्यान गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या संघर्षात चीनचे चार लष्करी अधिकारी व सैनिक मारले गेल्याचा व पाच सैनिक जखमी झाल्याचे चीनच्या लष्कराचे मुखपत्र असलेल्या पीएलए डेलीने प्रसिद्ध केले आहे. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पेंगाँग त्सो तलावाच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यावरून आपापले सैन्य मागे घेण्याचा करार भारत व चीनने केला होता. त्यानुसार टप्प्याटप्प्याने गेल्या काही दिवसांत हे सैन्य मागे घेण्यात आले. पूर्व लडाखमध्ये ९ महिन्यांपूर्वी चीनच्या लष्कराकडून करण्यात आलेले घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते; तर चीनचे ४०हून अधिक सैनिक ठार झाल्याचा दावा भारताने केला होता.  परंतु त्यावेळी चीनने त्यांच्या सैन्याची  नेमकी किती हानी झाली याची काहीही माहिती दिली नव्हती. त्यानंतर गलवान खोऱ्यामध्येही चिनी सैनिकांशी भारतीय जवानांचा संघर्ष झाला होता. या घडामोडींमुळे दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. भारत व चीनने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानेही प्रयत्न सुरू केले होते. यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या स्तरावर अनेक फेऱ्या पार पडल्या  दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये प्रारंभी झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या होत्या. अखेर पुन्हा चर्चा होऊन पूर्व लडाखमधून आपापले सैन्य मागे घेण्याचा करार करण्यात आला.

मतभेदांवर आज चर्चाभारत व चीनमध्ये असलेल्या मतभेदांच्या इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या, शनिवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख