शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आईला आपल्याकडे ठेवण्यासाठी चार भाऊ आपापसात भिडले, कोर्टात गेले, अखेर आई म्हणाली मी धाकट्या मुलाकडे राहीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 19:31 IST

Family News: सर्वसाधारणपणे आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्यास मुले टाळाटाळ करतात, असं दिसून येतं. अनेकदा आई-वडिलांना वृद्धाश्रमाचीही वाट दाखवली जाते. मात्र हे प्रकरण जरा वेगळंच आहे

भोपाळ - सर्वसाधारणपणे आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्यास मुले टाळाटाळ करतात, असं दिसून येतं. अनेकदा आई-वडिलांना वृद्धाश्रमाचीही वाट दाखवली जाते. मात्र हे प्रकरण जरा वेगळंच आहे. वृद्ध आईला आपल्याकडे ठेवण्यासाठी चार भाऊ आमने-सामने आले आणि आईच्या ताब्यासाठी कोर्टापर्यंत गेल्याची घटना समोर आली आहे. अखेर ८५ वर्षीय आई सरजूबाईच्या इच्छेनुसार ती छोट्या मुलाकडे राहील, असा निर्णय झाला. तसेच जेव्हा कधी तिची आपल्या इतर मुलांना भेटण्याची इच्छा होईल, तेव्हा ती जाऊ शकेल. ही घटना मध्य प्रदेशमधील देवास येथे घडली आहे. (Four brothers rushed to the court to keep their mother with them, finally the mother said I will stay with the youngest child) 

याबाबतची सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे, ऑगस्टमध्ये सीआयएसएफमधून निवृत्त झालेला सर्वात लहान मुलगा प्रल्हादसिंग उर्फ मोनू हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी मोठे भाऊ परमानंद यांच्याकडे गेले. मात्र परमानंद यांनी त्यांना आईला भेटू दिले नाही. त्यानंतर मोनू यांनी २ सप्टेंबर रोजी एसडीएम कोर्टामध्ये यासंदर्भात अर्ज दिला. या अर्जामध्ये त्यांनी सांगितले की, मला माझ्या आईला भेटू दिले जावे. मी त्यांना आपल्याकडे ठेऊ इच्छिते. त्यावर एसडीएम प्रदीप सोनी यांनी कलम ९७ आणि ९८ अन्वये सर्च वॉरंट जारी केले. त्यानंतर पोलीस वृद्ध आईला जबाब नोंदवण्यासाठी परमानंद यांच्या घरातून कोर्टात घेऊन आले. तिथे या आईने ती धाकट्या मुलाकडे राहू इच्छित असल्याचे सांगितले. माझ्या स्वर्गिय पतींनी मला धाकट्या मुलाकडे राहायला सांगितले होते, अशी माहिती या आईने कोर्टात दिली.

आईच्या जबाबानंतर एसडीएमने तिला तिच्या धाकट्या मुलासोबत राहण्यास सांगितले. तसेच आई कुठल्याही मुलाकडे तिच्या इच्छेनुसार राहू शकते, असे मत नोंदवले. दरम्यान, देवासचे एसडीएम प्रदीप सोनी यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, कोर्टामध्ये आईने तिच्या धाकट्या मुलाकडे राहण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यानुसार तिला त्यांच्याकडे पाठण्यात आले आहे. मात्र धाकटा भाऊ आईचा योग्य पद्धतीने सांभाळ करणार नाही, अशी बाकीच्या तीन मुलांची तक्रार आहे. त्यामुळे आमचे पथक धाकट्या भावाच्या घरी जाऊन पाहणी करणार आहे.

दरम्यान, आईला आपल्याकडे ठेवण्यावरून सरजूबाईंच्या चारही मुलांमध्ये कोर्टाबाहेर वाद झाला. यावेळी विक्रम सिंह, कंचन सिंह, परमानंद या तिघांनी प्रल्हाद आणि त्यांच्या कुटुंबासोबत वाद घातला. हा वाद एवढा वाढला की, पोलिसांना पाचारण करावे लागले. दरम्यान, प्रल्हाद, त्यांची पत्नी आणि मुलीला मारहाण केल्या प्रकरणी विक्रम कंचन आणि परमानंद यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात अजून एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे सरजूबाईच्या नावावर काही जमीन आहे. तसेच चारही भाऊ त्यामुळेच आईला आपल्याकडे ठेवू इच्छित आहेत. त्यांच्यामते आई ज्याच्याकडे राहील त्यालाच जमीन मिळणार आहे. 

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय