शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आईला आपल्याकडे ठेवण्यासाठी चार भाऊ आपापसात भिडले, कोर्टात गेले, अखेर आई म्हणाली मी धाकट्या मुलाकडे राहीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 19:31 IST

Family News: सर्वसाधारणपणे आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्यास मुले टाळाटाळ करतात, असं दिसून येतं. अनेकदा आई-वडिलांना वृद्धाश्रमाचीही वाट दाखवली जाते. मात्र हे प्रकरण जरा वेगळंच आहे

भोपाळ - सर्वसाधारणपणे आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्यास मुले टाळाटाळ करतात, असं दिसून येतं. अनेकदा आई-वडिलांना वृद्धाश्रमाचीही वाट दाखवली जाते. मात्र हे प्रकरण जरा वेगळंच आहे. वृद्ध आईला आपल्याकडे ठेवण्यासाठी चार भाऊ आमने-सामने आले आणि आईच्या ताब्यासाठी कोर्टापर्यंत गेल्याची घटना समोर आली आहे. अखेर ८५ वर्षीय आई सरजूबाईच्या इच्छेनुसार ती छोट्या मुलाकडे राहील, असा निर्णय झाला. तसेच जेव्हा कधी तिची आपल्या इतर मुलांना भेटण्याची इच्छा होईल, तेव्हा ती जाऊ शकेल. ही घटना मध्य प्रदेशमधील देवास येथे घडली आहे. (Four brothers rushed to the court to keep their mother with them, finally the mother said I will stay with the youngest child) 

याबाबतची सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे, ऑगस्टमध्ये सीआयएसएफमधून निवृत्त झालेला सर्वात लहान मुलगा प्रल्हादसिंग उर्फ मोनू हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी मोठे भाऊ परमानंद यांच्याकडे गेले. मात्र परमानंद यांनी त्यांना आईला भेटू दिले नाही. त्यानंतर मोनू यांनी २ सप्टेंबर रोजी एसडीएम कोर्टामध्ये यासंदर्भात अर्ज दिला. या अर्जामध्ये त्यांनी सांगितले की, मला माझ्या आईला भेटू दिले जावे. मी त्यांना आपल्याकडे ठेऊ इच्छिते. त्यावर एसडीएम प्रदीप सोनी यांनी कलम ९७ आणि ९८ अन्वये सर्च वॉरंट जारी केले. त्यानंतर पोलीस वृद्ध आईला जबाब नोंदवण्यासाठी परमानंद यांच्या घरातून कोर्टात घेऊन आले. तिथे या आईने ती धाकट्या मुलाकडे राहू इच्छित असल्याचे सांगितले. माझ्या स्वर्गिय पतींनी मला धाकट्या मुलाकडे राहायला सांगितले होते, अशी माहिती या आईने कोर्टात दिली.

आईच्या जबाबानंतर एसडीएमने तिला तिच्या धाकट्या मुलासोबत राहण्यास सांगितले. तसेच आई कुठल्याही मुलाकडे तिच्या इच्छेनुसार राहू शकते, असे मत नोंदवले. दरम्यान, देवासचे एसडीएम प्रदीप सोनी यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, कोर्टामध्ये आईने तिच्या धाकट्या मुलाकडे राहण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यानुसार तिला त्यांच्याकडे पाठण्यात आले आहे. मात्र धाकटा भाऊ आईचा योग्य पद्धतीने सांभाळ करणार नाही, अशी बाकीच्या तीन मुलांची तक्रार आहे. त्यामुळे आमचे पथक धाकट्या भावाच्या घरी जाऊन पाहणी करणार आहे.

दरम्यान, आईला आपल्याकडे ठेवण्यावरून सरजूबाईंच्या चारही मुलांमध्ये कोर्टाबाहेर वाद झाला. यावेळी विक्रम सिंह, कंचन सिंह, परमानंद या तिघांनी प्रल्हाद आणि त्यांच्या कुटुंबासोबत वाद घातला. हा वाद एवढा वाढला की, पोलिसांना पाचारण करावे लागले. दरम्यान, प्रल्हाद, त्यांची पत्नी आणि मुलीला मारहाण केल्या प्रकरणी विक्रम कंचन आणि परमानंद यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात अजून एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे सरजूबाईच्या नावावर काही जमीन आहे. तसेच चारही भाऊ त्यामुळेच आईला आपल्याकडे ठेवू इच्छित आहेत. त्यांच्यामते आई ज्याच्याकडे राहील त्यालाच जमीन मिळणार आहे. 

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय