शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

४० वर्षाचा कायदेशीर लढा दिला; पत्नीच्या हत्येचा आरोप असणाऱ्या पतीला सुप्रीम कोर्टानं निर्दोष ठरवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 15:10 IST

डिसेंबर २००८ मध्ये त्याची निर्दोष मुक्तता हायकोर्टानं नाकारली. निखिलने २००९ मध्ये त्याच्या दोषी आणि शिक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते

कोलकाता - पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीला ४० वर्षांपूर्वी झालेल्या पत्नीच्या हत्येच्या आरोपातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. निखिल चंद्र मंडल नावाच्या व्यक्तीला २००८ मध्ये उच्च न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. १९८७ मध्ये उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निकाल रद्द करून व्यक्तीला शिक्षा सुनावली. ट्रायल कोर्टाने संशयित आरोपीला क्लीन चिट दिली होती.

केवळ कबुलीजबाबाच्या आधारे व्यक्तीची शिक्षा कायम ठेवता येणार नाही, कारण तो कमकुवत पुरावा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या बर्धमान जिल्ह्यातून ११ मार्च १९८३ रोजी खून प्रकरण उघडकीस आले. निखिलला मार्च १९८३ मध्ये गावातील एका विवाहित महिलेच्या हत्येबाबत तीन गावकऱ्यांनी दिलेल्या कथित कबुलीजबाबाच्या आधारे अटक करण्यात आली होती. चार वर्षांनंतर मार्च १९८७ मध्ये ट्रायल कोर्टाने निखिलला सर्व आरोपातून दोषमुक्त केले कारण फिर्यादीने स्वतंत्र पुराव्यासह कबुलीजबाब सिद्ध केले नाही.

जवळपास २२ वर्षांनंतर कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निखिल मंडलला दोषी ठरवले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, डिसेंबर २००८ मध्ये त्याची निर्दोष मुक्तता हायकोर्टानं नाकारली. निखिलने २००९ मध्ये त्याच्या दोषी आणि शिक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, जे १४ वर्षे प्रलंबित राहिले. शुक्रवारी, न्यायमूर्ती बीआर गवई आणि संजय करोल यांनी खटल्यातील ट्रायल कोर्टाचा दृष्टिकोन आणि निर्णय कायम ठेवला.

निकाल देताना न्यायमूर्ती गवई म्हणाले की, हा खटला पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे. न्यायमूर्ती गवई आणि करोल यांनीही साक्षीदारांचे जबाब परस्परविरोधी असल्याचे मानले. न्यायालयाबाहेर गुन्ह्याची कबुली देणे संशयास्पद असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. यापलीकडे विधानाची विश्वासार्हता संशयास्पद बनते आणि त्याचे महत्त्व गमावून बसते. हे कायद्याचे स्थिर तत्व आहे की संशय कितीही खोल आणि मजबूत असला तरी पुराव्याचे स्थान घेऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय