शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

राजीव गांधी दलालांसमोर लाचार होते- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 18:30 IST

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आदित्यनाथ यांची जोरदार टीका

लखनऊ: केंद्रात मोदी सरकार आल्यावर दलालांचं अस्तित्वच संपलंय, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. दलालांना सध्या दलालीच मिळत नाही. त्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत, असं आदित्यनाथ म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. माजी पंतप्रधान राजीव गांधी दलालांसमोर लाचार होते, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी शनिवारी हरदोई जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. माजी पंतप्रधान राजीव गांधींवर त्यांनी जोरदार टीका केली. 'तीस वर्षांपूर्वी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. विकासासाठी 100 रुपयांचा निधी पाठवल्यावर लोकांपर्यत फक्त 10 रुपये पोहोचतात, असं खुद्द तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यावेळचं सरकार लाचार होतं. मोदींच्या काळात संपूर्ण 100 रुपयांचा निधी जनतेपर्यंत पोहोचतो,' असं योगी आदित्यनाथ म्हणाले. देशात पहिल्यांदाच लोकांपर्यंत सर्वाधिक निधी पोहोचत असल्याचा दावादेखील योगींनी केला. 'विकासासाठी खासदार, आमदारांना जितका निधी मिळत नाही, तितका निधी आता सरपंचांना मिळत आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचं जीवनमान उंचावेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधान ग्राम समाधान दिवसाचं आयोजन करण्याची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. यामुळे पंचायतीच्या माध्यमातून वादविवाद मिटवले जातील. यामध्ये महसूल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचादेखील सहभाग असेल. यामुळे गावातील लोकांना पोलीस ठाण्यात, न्यायालयात जावंच लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेस