शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 21:32 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सडेतोड शब्दांत उत्तर दिले.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच निवडणुका झाल्यावर संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यावर टीका केली होती. तर उद्धव ठाकरे यांनीही प्रचारसभांमध्ये चंद्रचूड यांना लक्ष्य केले होते. 

धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश असताना ते घटनात्मक निर्णय देऊ शकले नाहीत. त्यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही. त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रातील चित्र बदलले असते. तुम्हाला आता जे चित्र दिसत आहे, ते तुम्हाला नक्कीच दिसले नसते. त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडक्या आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेले आहेत. आतासुद्धा कुणाही कुणाला विकत घेऊ शकते. कुणीही कुठेही कशाही उड्या मारु शकते. कारण दहाव्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींची भीती राहिलेली नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. यावर चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?

९ सदस्यांचे खंडपीठ असेल किंवा ९ सदस्यांचे खंडपीठ असेल किंवा घटनापीठ असेल, आमच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी घ्यावी, हे आता एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का, गेल्या २० वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाची प्रकरणे प्रलंबित आहेत. माझ्या कार्यकाळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला. तो कमी महत्त्वाचा होता का, कलम ६ एच्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी केली, तसेच अन्य प्रमुख याचिकांवर सुनावणी घेत निकाल देण्यात आले, ते सर्व महत्त्वाचे नव्हते का, सर्वोच्च न्यायालयात कोणत्या याचिकांवर सुनावणी व्हावी, याचे सर्वाधिकार न्यायाधीशांकडे असतात. त्यांनी पक्षावर लोकांना हायजॅक करू दिले, जो उशीर झाला आणि जो निर्णय देण्यात आला. आम्ही काम करत नाही असे दाखवा, तेव्हा हा आरोप बरोबर ठरतो. आमच्याकडे अनेक महत्त्वाची प्रकरणे होती आणि आहेत, त्यामुळे कोणत्या याचिकांवर सुनावणी घ्यायची हे सांगण्याचा अधिकार राजकीय पक्षाला नाही, असे सडेतोड उत्तर डीवाय चंद्रचूड यांनी दिले.

दरम्यान, न्यायपालिका विरोधकांची भूमिका बजावेल, असे कुणीही गृहीत धरू नये. विरोधकांप्रमाणे न्यायपालिकांनी वागावे, अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. आम्ही फक्त कायदा, त्याची वैधता आणि घटनात्मकता पाहतो. खरी अडचण आहे की जर, त्यांचा अजेंडा फॉलो केला तर त्यांना वाटते की स्वतंत्र आहे. इलेक्ट्रॉल बॉण्डवर निर्णय दिला, अलीगढ मुस्लिम केस, मदरसा संदर्भात निर्णय दिला. अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. आम्ही त्यांच्या प्रकरणावर निर्णय दिला नाही म्हणजे दुसऱ्यांनी ठरवलेला अजेंडा आम्ही फॉलो नाही करणार. आम्ही ठरवणार की कुठल्या प्रकरणावर सुनावणी होणार. चांगले वकील, पैसा, आणि पद असल्यामुळे आम्ही त्यांच्या याचिकांवर सुनावणी घ्यावी, असे होणार नाही, असे चंद्रचूड यांनी ठामपणे सांगितले. ते एएनआयच्या मुलाखतीत बोलत होते. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४