शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 21:32 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सडेतोड शब्दांत उत्तर दिले.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच निवडणुका झाल्यावर संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यावर टीका केली होती. तर उद्धव ठाकरे यांनीही प्रचारसभांमध्ये चंद्रचूड यांना लक्ष्य केले होते. 

धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश असताना ते घटनात्मक निर्णय देऊ शकले नाहीत. त्यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही. त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रातील चित्र बदलले असते. तुम्हाला आता जे चित्र दिसत आहे, ते तुम्हाला नक्कीच दिसले नसते. त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडक्या आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेले आहेत. आतासुद्धा कुणाही कुणाला विकत घेऊ शकते. कुणीही कुठेही कशाही उड्या मारु शकते. कारण दहाव्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींची भीती राहिलेली नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. यावर चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?

९ सदस्यांचे खंडपीठ असेल किंवा ९ सदस्यांचे खंडपीठ असेल किंवा घटनापीठ असेल, आमच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी घ्यावी, हे आता एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का, गेल्या २० वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाची प्रकरणे प्रलंबित आहेत. माझ्या कार्यकाळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला. तो कमी महत्त्वाचा होता का, कलम ६ एच्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी केली, तसेच अन्य प्रमुख याचिकांवर सुनावणी घेत निकाल देण्यात आले, ते सर्व महत्त्वाचे नव्हते का, सर्वोच्च न्यायालयात कोणत्या याचिकांवर सुनावणी व्हावी, याचे सर्वाधिकार न्यायाधीशांकडे असतात. त्यांनी पक्षावर लोकांना हायजॅक करू दिले, जो उशीर झाला आणि जो निर्णय देण्यात आला. आम्ही काम करत नाही असे दाखवा, तेव्हा हा आरोप बरोबर ठरतो. आमच्याकडे अनेक महत्त्वाची प्रकरणे होती आणि आहेत, त्यामुळे कोणत्या याचिकांवर सुनावणी घ्यायची हे सांगण्याचा अधिकार राजकीय पक्षाला नाही, असे सडेतोड उत्तर डीवाय चंद्रचूड यांनी दिले.

दरम्यान, न्यायपालिका विरोधकांची भूमिका बजावेल, असे कुणीही गृहीत धरू नये. विरोधकांप्रमाणे न्यायपालिकांनी वागावे, अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. आम्ही फक्त कायदा, त्याची वैधता आणि घटनात्मकता पाहतो. खरी अडचण आहे की जर, त्यांचा अजेंडा फॉलो केला तर त्यांना वाटते की स्वतंत्र आहे. इलेक्ट्रॉल बॉण्डवर निर्णय दिला, अलीगढ मुस्लिम केस, मदरसा संदर्भात निर्णय दिला. अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. आम्ही त्यांच्या प्रकरणावर निर्णय दिला नाही म्हणजे दुसऱ्यांनी ठरवलेला अजेंडा आम्ही फॉलो नाही करणार. आम्ही ठरवणार की कुठल्या प्रकरणावर सुनावणी होणार. चांगले वकील, पैसा, आणि पद असल्यामुळे आम्ही त्यांच्या याचिकांवर सुनावणी घ्यावी, असे होणार नाही, असे चंद्रचूड यांनी ठामपणे सांगितले. ते एएनआयच्या मुलाखतीत बोलत होते. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४