शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या मुलींसाठी योग्य घर मिळेना; म्हणाले, ‘समाज दिव्यांगांना दडपून टाकतो’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:42 IST

Dhananjay chandrachud news: न्यायमूर्ती चंद्रचूड आणि पत्नी कल्पना दास यांनी प्रियंका आणि माही या दोन मुलींना दत्तक घेतले आहे.

नवी दिल्ली : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दिल्लीत विशेष गरजा असलेल्या त्यांच्या दोन मुलींसाठी आरामदायक घर शोधण्यासाठी धडपडत आहेत. न्या.चंद्रचूड यांना ३० एप्रिल रोजी सरकारी निवासस्थान रिकामे करायचे आहे. ते म्हणाले की, 'आमच्या दोन सुंदर मुलींच्या विशेष गरजांसाठी घर मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येक सार्वजनिक जागा सारखीच असते.' 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिव्यांगांप्रति दु:ख व्यक्त करताना माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, 'आपल्या समाजाने दिव्यांगांना अज्ञान व दडपशाहीची वागणूक दिली आहे.'

दोन्ही मुली आहेत दुर्मीळ आजाराने त्रस्त 

न्यायमूर्ती चंद्रचूड आणि पत्नी कल्पना दास यांनी प्रियंका आणि माही या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. मुलींना ‘नेमालाइन मायोपॅथी’ या दुर्मीळ आजाराने ग्रासले आहे.

आव्हानांबाबत केली चर्चा

मिशन ॲक्सेसिबिलिटीने आयोजित केलेल्या दिव्यांगांचे अधिकार आणि त्यापुढे काय? या चर्चेत न्या. चंद्रचूड यांनी दिव्यांग मुलींच्या दुर्मीळ आजाराच्या कारणांवर चर्चा केली. कुटुंबासमोरील आव्हानांबद्दल यावेळी त्यांनी चर्चा केली.  

मुलींमुळे माझा पूर्ण  दृष्टिकोनच बदलला

न्या. चंद्रचूड म्हणाले की, त्यांच्या मुलींनी त्यांच्या कुटुंबाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, त्यांना शाकाहाराची ओळख करून दिली आहे.

प्राणी आणि पर्यावरणाबद्दल खोल आदर निर्माण केला आहे. केवळ या दृष्टिकोनातून, दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वोच्च न्यायालयात ‘मिट्टी कॅफे’ सुरू झाला. अपंगत्व हा अडथळा नाही, हे आम्हाला दाखवायचे होते. ते सन्मानीय जीवन जगण्यास सक्षम आहेत, हे यातून दाखविण्याचा प्रयत्न होता.

दिव्यांगांना सवलत नव्हे, तर  हक्क म्हणून सुविधा द्या

माजी सरन्यायाधीशांनी दिव्यांग-संबंधित प्रकरणांना प्राधान्य देण्यासाठी न्यायालयांना आवाहन केले. दिव्यांगांप्रति सहानुभूतीप्रत खंडपीठाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.  

दिव्यांग व्यक्तींना सवलत म्हणून नव्हे तर हक्क म्हणून सुविधा दिल्या जाव्यात. ते पूर्णतः दुर्लक्षित जीवन जगतात. दिव्यांग व्यक्तींच्या हक्क (आरपीडब्ल्यूडी) कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHomeसुंदर गृहनियोजनNew Delhiनवी दिल्लीDivyangदिव्यांगSocialसामाजिक