शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी विद्यापीठांमुळे देशात शिक्षण परवडेनासे होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 06:36 IST

प्रा. भूषण पटवर्धन यांचे मत उच्चशिक्षणातील बदल स्वागतार्ह; धोरणकर्त्यांना दिला सावधगिरीचा इशारा

टेकचंद सोनवणे।नवी दिल्ली: परदेशी विद्यापीठांना भारतात आणण्याचा विचार चांगला असला तरी त्यात विद्यार्थी हिताचा विचार हवा. अन्यथा देशात वर्गसंघर्ष आणि सामान्यांना शिक्षण न परवडण्याचा धोका वाढेल. इथे परदेशी विद्यापीठांची बेटे तयार होतील. शिवाय जागतिक दर्जाची किती विद्यापीठे भारतात येतील, हा प्रश्न आहेच. सध्या बाजारू विद्यापीठे येण्याची भीती अधिक आहे, अशा शब्दात विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना नव्या धोरणकर्त्यांना सावधगिरीचा इशारा दिला.प्रश्न - या स्थितीत परदेशी विद्यापीठांना काय पर्याय आहे?परदेशी विद्यापीठांमुळे सर्वांना शिक्षण परवडणे अवघड होईल. त्यातून समस्या वाढतील. विद्यार्थी हिताचा विचार व्हायला हवा. प्रतिष्ठित विद्यापीठे येण्यास अनुत्सुक असतील, तर बाजारू विद्यापीठे याचा फायदा उठवतील. आपल्याकडे नालंदा, तक्षशिलामध्ये जगभरातून विद्यार्थी येत. तशी व्यवस्था पुन्हा उभी करण्याचा विचार व्हायला हवा.प्रश्न - जागतिक क्रमवारीतआपण मागे आहोत?कोण ठरवते क्रमवारी? शिक्षण गुणवत्तेचे सर्वमान्य निकष आहेत. अमेरिका-युरोपमध्ये ते काही वेगळे नाही. येथील शिक्षण जागतिक दर्जाचे व्हायला हवे. जागतिक क्रमवारीचे क्रमवारीचे मार्केर्टिंंग कुणी केले? त्यावर अमेरिका-चीनच्या सिस्टमचा प्रभाव आहे. भारताला हिणवणे सुरू झाले. आपल्यावरही दबाव वाढला. त्यामुळे नवी योजना तयार झाली. गुणवत्तावाढीऐवजी रॅट रेसमध्ये सामील झाले. त्यातून दिखाऊपणा वाढला. सरकारी मदत विद्यापीठांना दिली गेली. पण आपल्या समस्या सोडवण्यास विद्यापीठे सक्षम झाली का?प्रश्न- नव्या शैक्षणिक धोरणात सरकारनेकेलेल्या तरतुदींबाबत काय मत आहे?उच्च शिक्षणातबदल, प्रस्तावितमल्टिसेंट्रीक शिक्षणामुळे आपले ध्येय साधता येईल. रँकिंग रेसऐवजी देशांची गरज औळखून आपली विद्यापीठे उभी राहिली पाहिजे. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती प्रश्न कळतो? खरीप-रब्बीमधील फरक सांगता येतो? कोणतीही विद्याशाखा देशाची गरज व समस्या सोडवणारी हवी. प्रस्तावित बहुशाखा अभ्यासामुळे हा बदल होण्याची आशा आहे.प्रश्न - आपल्याकडे संशोधनाविषयीकमालीची उदासीनता दिसून येते?कारण अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये विद्याथीतयार होत नाही. पदवी घेतल्याने नोकरी मिळणार नाही हे माहित असल्याने विद्यार्थी पदवुत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतो. त्यातूनच पुढे पीएचडी केली जाते. फेलोशिप मिळते. जगात सर्वाधिक संख्येने भारतात शिष्यवृत्ती दिली जाते, पण संशोधनात आपण खूप मागे आहोत. कारण विद्यार्थ्यांची क्षमता, गरज, आवड घेऊन शैक्षणिक प्रगतीचा कधीही विचार झाला नाही. प्रस्तावित राष्ट्रीय संशोधन परिषदेने याचाच गांभीर्याने विचार केला पाहिजे.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण