शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

परदेशी विद्यापीठांमुळे देशात शिक्षण परवडेनासे होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 06:36 IST

प्रा. भूषण पटवर्धन यांचे मत उच्चशिक्षणातील बदल स्वागतार्ह; धोरणकर्त्यांना दिला सावधगिरीचा इशारा

टेकचंद सोनवणे।नवी दिल्ली: परदेशी विद्यापीठांना भारतात आणण्याचा विचार चांगला असला तरी त्यात विद्यार्थी हिताचा विचार हवा. अन्यथा देशात वर्गसंघर्ष आणि सामान्यांना शिक्षण न परवडण्याचा धोका वाढेल. इथे परदेशी विद्यापीठांची बेटे तयार होतील. शिवाय जागतिक दर्जाची किती विद्यापीठे भारतात येतील, हा प्रश्न आहेच. सध्या बाजारू विद्यापीठे येण्याची भीती अधिक आहे, अशा शब्दात विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना नव्या धोरणकर्त्यांना सावधगिरीचा इशारा दिला.प्रश्न - या स्थितीत परदेशी विद्यापीठांना काय पर्याय आहे?परदेशी विद्यापीठांमुळे सर्वांना शिक्षण परवडणे अवघड होईल. त्यातून समस्या वाढतील. विद्यार्थी हिताचा विचार व्हायला हवा. प्रतिष्ठित विद्यापीठे येण्यास अनुत्सुक असतील, तर बाजारू विद्यापीठे याचा फायदा उठवतील. आपल्याकडे नालंदा, तक्षशिलामध्ये जगभरातून विद्यार्थी येत. तशी व्यवस्था पुन्हा उभी करण्याचा विचार व्हायला हवा.प्रश्न - जागतिक क्रमवारीतआपण मागे आहोत?कोण ठरवते क्रमवारी? शिक्षण गुणवत्तेचे सर्वमान्य निकष आहेत. अमेरिका-युरोपमध्ये ते काही वेगळे नाही. येथील शिक्षण जागतिक दर्जाचे व्हायला हवे. जागतिक क्रमवारीचे क्रमवारीचे मार्केर्टिंंग कुणी केले? त्यावर अमेरिका-चीनच्या सिस्टमचा प्रभाव आहे. भारताला हिणवणे सुरू झाले. आपल्यावरही दबाव वाढला. त्यामुळे नवी योजना तयार झाली. गुणवत्तावाढीऐवजी रॅट रेसमध्ये सामील झाले. त्यातून दिखाऊपणा वाढला. सरकारी मदत विद्यापीठांना दिली गेली. पण आपल्या समस्या सोडवण्यास विद्यापीठे सक्षम झाली का?प्रश्न- नव्या शैक्षणिक धोरणात सरकारनेकेलेल्या तरतुदींबाबत काय मत आहे?उच्च शिक्षणातबदल, प्रस्तावितमल्टिसेंट्रीक शिक्षणामुळे आपले ध्येय साधता येईल. रँकिंग रेसऐवजी देशांची गरज औळखून आपली विद्यापीठे उभी राहिली पाहिजे. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती प्रश्न कळतो? खरीप-रब्बीमधील फरक सांगता येतो? कोणतीही विद्याशाखा देशाची गरज व समस्या सोडवणारी हवी. प्रस्तावित बहुशाखा अभ्यासामुळे हा बदल होण्याची आशा आहे.प्रश्न - आपल्याकडे संशोधनाविषयीकमालीची उदासीनता दिसून येते?कारण अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये विद्याथीतयार होत नाही. पदवी घेतल्याने नोकरी मिळणार नाही हे माहित असल्याने विद्यार्थी पदवुत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतो. त्यातूनच पुढे पीएचडी केली जाते. फेलोशिप मिळते. जगात सर्वाधिक संख्येने भारतात शिष्यवृत्ती दिली जाते, पण संशोधनात आपण खूप मागे आहोत. कारण विद्यार्थ्यांची क्षमता, गरज, आवड घेऊन शैक्षणिक प्रगतीचा कधीही विचार झाला नाही. प्रस्तावित राष्ट्रीय संशोधन परिषदेने याचाच गांभीर्याने विचार केला पाहिजे.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण