शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

"प्रत्येक रामाला लक्ष्मणाची गरज..."; एस जयशंकर यांनी शेजारील देशांना दिला 'हा' खास संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 12:30 IST

एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणातील पात्रांद्वारे भारताची जागतिक भूमिका अधोरेखित केली आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणातील पात्रांद्वारे भारताची जागतिक भूमिका अधोरेखित केली आहे. भारतीय विचार केंद्र (BVK) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संलग्न संस्थेने आयोजित केलेल्या एका व्याख्यानाला संबोधित करताना ते म्हणाले की, "ज्याप्रमाणे रामायणात प्रभू राम आणि लक्ष्मण यांची जोडी होती, त्याचप्रमाणे प्रत्येक देशाला आपल्या आजुबाजूला मजबूत मैत्री आवश्यकता आहे."

"वेगाने विकसित होत असलेल्या भारताने जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यास तयार असले पाहिजे. आपण आपला इतिहास, आपली सभ्यता विसरू नये कारण या गोष्टी आपल्याला उर्वरित जगापासून वेगळे करतात."

आर्थिक आणि वैज्ञानिक आघाडीवर झपाट्याने विकसित होत असलेल्या भारताच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या सुरक्षेचा संदर्भ देत एस जयशंकर म्हणाले की, सध्याच्या काळात भारताची बदलती जागतिक परिस्थिती महत्त्वाची आहे. कारण आज भारताच्या शेजाऱ्यांना अधिक सुरक्षित वाटतं आणि त्यांचा भारताप्रती विश्वास आणि आदर वाढला आहे. जागतिक महामारी कोरोनाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, त्यावेळीही जगाने भारतावर हाच विश्वास ठेवला होता.

जागतिक स्तरावर अनेक आघाड्यांवर भारतालाही आव्हानांचा सामना करावा लागला आहे. याचा संदर्भ देत जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणाचा संदर्भ दिला आणि सांगितलं की, परशुरामाने प्रभू रामाची जशी परीक्षा घेतली होती तशीच सर्व देशांनी आपल्या शेजारील देशांची परीक्षा घेतली पाहिजे. जेव्हा देश विकसित होतात तेव्हा त्यांच्या बाबतीत असंच घडतं. आपलाच देश घ्या. आमच्या मजबूत अर्थव्यवस्थेमुळे आम्ही ही खडतर परीक्षा पास केली. अणुचाचणी करून आम्ही दुसरी चाचणी पास केली. आपल्यालाही रामासारखी परीक्षा द्यावी लागेल. परशुरामाने ज्या प्रकारे रामाची परीक्षा घेतली.

याआधीही जयशंकर यांनी अनेक प्रसंगी रामायणाचा उल्लेख केला होता. अलीकडेच त्यांच्या 'व्हाय इंडिया मॅटर्स' या पुस्तकावरील चर्चेदरम्यान त्यांनी "रामायणात अनेक महान डिप्लोमॅट होऊन गेले आहेत. प्रत्येकजण हनुमानाबद्दल बोलतो. पण अंगदही तिथे होता. राजनैतिक पातळीवर सर्वांनी योगदान दिले आहे. भारतात आपण राम-लक्ष्मण या जोडीचं नाव घेतो. म्हणजे दोन भाऊ जे कधीही वेगळे होणार नाहीत. त्याचप्रमाणे देशांनाही अशा अतूट संबंधांची गरज आहे" असं म्हटलं होतं.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत