शहरं
Join us  
Trending Stories
1
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
2
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
4
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
5
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
6
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
7
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
8
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
9
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
10
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
12
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
13
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
14
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
15
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
16
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
18
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
19
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
20
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक रामाला लक्ष्मणाची गरज..."; एस जयशंकर यांनी शेजारील देशांना दिला 'हा' खास संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 12:30 IST

एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणातील पात्रांद्वारे भारताची जागतिक भूमिका अधोरेखित केली आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणातील पात्रांद्वारे भारताची जागतिक भूमिका अधोरेखित केली आहे. भारतीय विचार केंद्र (BVK) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संलग्न संस्थेने आयोजित केलेल्या एका व्याख्यानाला संबोधित करताना ते म्हणाले की, "ज्याप्रमाणे रामायणात प्रभू राम आणि लक्ष्मण यांची जोडी होती, त्याचप्रमाणे प्रत्येक देशाला आपल्या आजुबाजूला मजबूत मैत्री आवश्यकता आहे."

"वेगाने विकसित होत असलेल्या भारताने जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यास तयार असले पाहिजे. आपण आपला इतिहास, आपली सभ्यता विसरू नये कारण या गोष्टी आपल्याला उर्वरित जगापासून वेगळे करतात."

आर्थिक आणि वैज्ञानिक आघाडीवर झपाट्याने विकसित होत असलेल्या भारताच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या सुरक्षेचा संदर्भ देत एस जयशंकर म्हणाले की, सध्याच्या काळात भारताची बदलती जागतिक परिस्थिती महत्त्वाची आहे. कारण आज भारताच्या शेजाऱ्यांना अधिक सुरक्षित वाटतं आणि त्यांचा भारताप्रती विश्वास आणि आदर वाढला आहे. जागतिक महामारी कोरोनाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, त्यावेळीही जगाने भारतावर हाच विश्वास ठेवला होता.

जागतिक स्तरावर अनेक आघाड्यांवर भारतालाही आव्हानांचा सामना करावा लागला आहे. याचा संदर्भ देत जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणाचा संदर्भ दिला आणि सांगितलं की, परशुरामाने प्रभू रामाची जशी परीक्षा घेतली होती तशीच सर्व देशांनी आपल्या शेजारील देशांची परीक्षा घेतली पाहिजे. जेव्हा देश विकसित होतात तेव्हा त्यांच्या बाबतीत असंच घडतं. आपलाच देश घ्या. आमच्या मजबूत अर्थव्यवस्थेमुळे आम्ही ही खडतर परीक्षा पास केली. अणुचाचणी करून आम्ही दुसरी चाचणी पास केली. आपल्यालाही रामासारखी परीक्षा द्यावी लागेल. परशुरामाने ज्या प्रकारे रामाची परीक्षा घेतली.

याआधीही जयशंकर यांनी अनेक प्रसंगी रामायणाचा उल्लेख केला होता. अलीकडेच त्यांच्या 'व्हाय इंडिया मॅटर्स' या पुस्तकावरील चर्चेदरम्यान त्यांनी "रामायणात अनेक महान डिप्लोमॅट होऊन गेले आहेत. प्रत्येकजण हनुमानाबद्दल बोलतो. पण अंगदही तिथे होता. राजनैतिक पातळीवर सर्वांनी योगदान दिले आहे. भारतात आपण राम-लक्ष्मण या जोडीचं नाव घेतो. म्हणजे दोन भाऊ जे कधीही वेगळे होणार नाहीत. त्याचप्रमाणे देशांनाही अशा अतूट संबंधांची गरज आहे" असं म्हटलं होतं.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत