शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक रामाला लक्ष्मणाची गरज..."; एस जयशंकर यांनी शेजारील देशांना दिला 'हा' खास संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 12:30 IST

एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणातील पात्रांद्वारे भारताची जागतिक भूमिका अधोरेखित केली आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणातील पात्रांद्वारे भारताची जागतिक भूमिका अधोरेखित केली आहे. भारतीय विचार केंद्र (BVK) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संलग्न संस्थेने आयोजित केलेल्या एका व्याख्यानाला संबोधित करताना ते म्हणाले की, "ज्याप्रमाणे रामायणात प्रभू राम आणि लक्ष्मण यांची जोडी होती, त्याचप्रमाणे प्रत्येक देशाला आपल्या आजुबाजूला मजबूत मैत्री आवश्यकता आहे."

"वेगाने विकसित होत असलेल्या भारताने जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यास तयार असले पाहिजे. आपण आपला इतिहास, आपली सभ्यता विसरू नये कारण या गोष्टी आपल्याला उर्वरित जगापासून वेगळे करतात."

आर्थिक आणि वैज्ञानिक आघाडीवर झपाट्याने विकसित होत असलेल्या भारताच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या सुरक्षेचा संदर्भ देत एस जयशंकर म्हणाले की, सध्याच्या काळात भारताची बदलती जागतिक परिस्थिती महत्त्वाची आहे. कारण आज भारताच्या शेजाऱ्यांना अधिक सुरक्षित वाटतं आणि त्यांचा भारताप्रती विश्वास आणि आदर वाढला आहे. जागतिक महामारी कोरोनाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, त्यावेळीही जगाने भारतावर हाच विश्वास ठेवला होता.

जागतिक स्तरावर अनेक आघाड्यांवर भारतालाही आव्हानांचा सामना करावा लागला आहे. याचा संदर्भ देत जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणाचा संदर्भ दिला आणि सांगितलं की, परशुरामाने प्रभू रामाची जशी परीक्षा घेतली होती तशीच सर्व देशांनी आपल्या शेजारील देशांची परीक्षा घेतली पाहिजे. जेव्हा देश विकसित होतात तेव्हा त्यांच्या बाबतीत असंच घडतं. आपलाच देश घ्या. आमच्या मजबूत अर्थव्यवस्थेमुळे आम्ही ही खडतर परीक्षा पास केली. अणुचाचणी करून आम्ही दुसरी चाचणी पास केली. आपल्यालाही रामासारखी परीक्षा द्यावी लागेल. परशुरामाने ज्या प्रकारे रामाची परीक्षा घेतली.

याआधीही जयशंकर यांनी अनेक प्रसंगी रामायणाचा उल्लेख केला होता. अलीकडेच त्यांच्या 'व्हाय इंडिया मॅटर्स' या पुस्तकावरील चर्चेदरम्यान त्यांनी "रामायणात अनेक महान डिप्लोमॅट होऊन गेले आहेत. प्रत्येकजण हनुमानाबद्दल बोलतो. पण अंगदही तिथे होता. राजनैतिक पातळीवर सर्वांनी योगदान दिले आहे. भारतात आपण राम-लक्ष्मण या जोडीचं नाव घेतो. म्हणजे दोन भाऊ जे कधीही वेगळे होणार नाहीत. त्याचप्रमाणे देशांनाही अशा अतूट संबंधांची गरज आहे" असं म्हटलं होतं.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत