शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

५३ वर्षांपासून बहिणी समाधीवर बांधत आहेत राखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 07:33 IST

भारत-पाकिस्तान सीमेवरील सिंबल गावातील असेही रक्षाबंधन 

- बलवंत तक्षक 

चंडीगड : भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या सिंबल या गावात एका समाधीवर या बहिणी ५३ वर्षांपासून राखी बांधत आहेत. १९७१ च्या भारत पाक युद्धात शहीद झालेले रेडिओ ऑपरेटर नायक कमलजित सिंह यांची आहे. बीएसएफ चौकीवर बांधलेल्या आपल्या भावाच्या समाधीवर जालंधरच्या अमृतपाल कौर गेली ४३ वर्षे अखंड राखी बांधत होत्या. 

आठ वर्षांपूर्वी कॅन्सरशी लढा देत अमृतपाल कौर यांनी हे जग सोडले. तरीही शहीद भावाच्या समाधीवर राखी बांधण्याची परंपरा कायम आहे. शहीद सैनिक परिवार सुरक्षा परिषदेचे सरचिटणीस कुंवर रवींद्र सिंह यांनी सांगितले की, आजारी असलेल्या अमृतपाल कौर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते रुग्णालयात गेले असता त्यांनी परिषदेच्या सदस्यांकडून वचन घेतले होते की, राखी बांधण्याची परंपरा थांबणार नाही. 

कमलजित ज्या गावात शहीद झाले त्या गावातील मनप्रीत कौर, हरप्रीत कौर, हरमन कौर, संदीप कौर, मनदीप कौर आणि मनप्रीत कौर यांनी शहीदांच्या कुटुंबीयांसह कमलजित यांच्या समाधीस्थळी राखी बांधून ५२ वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा कायम राखली. येथे तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनाही त्यांनी राखी बांधली. 

१९७१ मध्ये झाले जवान शहीदभारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ४ डिसेंबर १९७१ रोजी जेव्हा पाकिस्तानी सैन्याने या चौकीवर हल्ला केला तेव्हा कमलजित हे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. पाकिस्तानी लष्कराचा पराभव करत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी नंतर त्यांचे सहकारी रेडिओ ऑपरेटर नायक कमलजित यांच्या बलिदानाचा बदला घेतला होता.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन