शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

५३ वर्षांपासून बहिणी समाधीवर बांधत आहेत राखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 07:33 IST

भारत-पाकिस्तान सीमेवरील सिंबल गावातील असेही रक्षाबंधन 

- बलवंत तक्षक 

चंडीगड : भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या सिंबल या गावात एका समाधीवर या बहिणी ५३ वर्षांपासून राखी बांधत आहेत. १९७१ च्या भारत पाक युद्धात शहीद झालेले रेडिओ ऑपरेटर नायक कमलजित सिंह यांची आहे. बीएसएफ चौकीवर बांधलेल्या आपल्या भावाच्या समाधीवर जालंधरच्या अमृतपाल कौर गेली ४३ वर्षे अखंड राखी बांधत होत्या. 

आठ वर्षांपूर्वी कॅन्सरशी लढा देत अमृतपाल कौर यांनी हे जग सोडले. तरीही शहीद भावाच्या समाधीवर राखी बांधण्याची परंपरा कायम आहे. शहीद सैनिक परिवार सुरक्षा परिषदेचे सरचिटणीस कुंवर रवींद्र सिंह यांनी सांगितले की, आजारी असलेल्या अमृतपाल कौर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते रुग्णालयात गेले असता त्यांनी परिषदेच्या सदस्यांकडून वचन घेतले होते की, राखी बांधण्याची परंपरा थांबणार नाही. 

कमलजित ज्या गावात शहीद झाले त्या गावातील मनप्रीत कौर, हरप्रीत कौर, हरमन कौर, संदीप कौर, मनदीप कौर आणि मनप्रीत कौर यांनी शहीदांच्या कुटुंबीयांसह कमलजित यांच्या समाधीस्थळी राखी बांधून ५२ वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा कायम राखली. येथे तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनाही त्यांनी राखी बांधली. 

१९७१ मध्ये झाले जवान शहीदभारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ४ डिसेंबर १९७१ रोजी जेव्हा पाकिस्तानी सैन्याने या चौकीवर हल्ला केला तेव्हा कमलजित हे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. पाकिस्तानी लष्कराचा पराभव करत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी नंतर त्यांचे सहकारी रेडिओ ऑपरेटर नायक कमलजित यांच्या बलिदानाचा बदला घेतला होता.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन