शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या वाळवंटात पूर तर काही राज्ये पाण्यासाठी तरसली; भारतात पावसाचा पॅटर्न बदलतोय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 16:24 IST

भारतात मान्सूनचा पॅटर्न झपाट्याने बदलतोय, ज्यामुळे एकतर कमी वेळेत जास्त पाऊस पडतोय किंवा अजिबात पडत नाहीये.

नवी दिल्ली: सध्या मध्य प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे, गेल्या तीन दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. राजधानी भोपाळमधील परिस्थिती अनियंत्रित झाली असून, मोठा तलाव पूर्णपणे भरला आहे. तलावात उभ्या असलेल्या बोटी वादळामुळे बुडण्याची भीती आहे. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्येही घडत आहे. बहुतांश धरणे, नद्या, तलाव भरले आहेत. पाऊस इतका पडला की पुढच्या वर्षी पाऊस पडला नाही तरी दुष्काळ पडणार नाही.

या राज्यात कमी पाऊसपण, तिकडे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह अनेक राज्ये पाण्यासाठी आसुसलेली आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 75 पैकी 64 म्हणजेच 85% जिल्हे असे आहेत, जिथे सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मान्सून आपला पॅटर्न कसा बदलतोय, हे अशा पद्धतीने समजून घ्या की, एकीकडे मध्य प्रदेश ओलाचिंब होत आहे, पण लगतचा उत्तर प्रदेश मात्र पाण्यासाठी तडफडत आहे. तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, मात्र लगतच्या केरळमध्ये अजूनही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही.

अनेक राज्यांत मुसळधारजून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे भारतात मान्सूनचे हंगाम आहेत, त्याला दक्षिण पश्चिम मान्सून म्हणतात. भारताच्या वार्षिक पावसाची सुमारे 75% गरज नैऋत्य मान्सूनद्वारे भागवली जाते. त्यामुळे हे चार महिने पावसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण, या चार महिन्यांत अशी काही राज्ये आहेत ज्यांच्यावर ढग दयाळू आहेत. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये इतका पाऊस झाला की, पूर आणि भूस्खलनामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हिमाचलमध्ये आतापर्यंत फक्त सामान्य पाऊस झाला आहे. मात्र कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने नैसर्गिक घटना वाढल्या आहेत.

वाळवंटात मुसळधारअधिकाऱ्यांनी सांगितले की, 20 ऑगस्टपर्यंत राजस्थानमधील 716 धरणे त्यांच्या क्षमतेच्या 76% पाण्याने भरली आहेत. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत केवळ 57 टक्के पाणी भरले होते. यंदा एवढा पाऊस पडल्याने पुढील वर्षी पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी 23 ऑगस्टपर्यंत राजस्थानमध्ये सामान्यपेक्षा 51% जास्त पाऊस झाला आहे. येथील एकही जिल्हा कोरडा नाही. ओडिशात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरापासून दिलासा मिळालेला नाही. नद्यांची पातळी कमी होत आहे, मात्र तरीही 902 गावांतील साडेसहा हजार लोक बाधित आहेत. राज्यातील जवळपास सर्वच नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :RainपाऊसfloodपूरRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेश