शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

राजस्थानच्या वाळवंटात पूर तर काही राज्ये पाण्यासाठी तरसली; भारतात पावसाचा पॅटर्न बदलतोय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 16:24 IST

भारतात मान्सूनचा पॅटर्न झपाट्याने बदलतोय, ज्यामुळे एकतर कमी वेळेत जास्त पाऊस पडतोय किंवा अजिबात पडत नाहीये.

नवी दिल्ली: सध्या मध्य प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे, गेल्या तीन दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. राजधानी भोपाळमधील परिस्थिती अनियंत्रित झाली असून, मोठा तलाव पूर्णपणे भरला आहे. तलावात उभ्या असलेल्या बोटी वादळामुळे बुडण्याची भीती आहे. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्येही घडत आहे. बहुतांश धरणे, नद्या, तलाव भरले आहेत. पाऊस इतका पडला की पुढच्या वर्षी पाऊस पडला नाही तरी दुष्काळ पडणार नाही.

या राज्यात कमी पाऊसपण, तिकडे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह अनेक राज्ये पाण्यासाठी आसुसलेली आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 75 पैकी 64 म्हणजेच 85% जिल्हे असे आहेत, जिथे सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मान्सून आपला पॅटर्न कसा बदलतोय, हे अशा पद्धतीने समजून घ्या की, एकीकडे मध्य प्रदेश ओलाचिंब होत आहे, पण लगतचा उत्तर प्रदेश मात्र पाण्यासाठी तडफडत आहे. तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, मात्र लगतच्या केरळमध्ये अजूनही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही.

अनेक राज्यांत मुसळधारजून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे भारतात मान्सूनचे हंगाम आहेत, त्याला दक्षिण पश्चिम मान्सून म्हणतात. भारताच्या वार्षिक पावसाची सुमारे 75% गरज नैऋत्य मान्सूनद्वारे भागवली जाते. त्यामुळे हे चार महिने पावसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण, या चार महिन्यांत अशी काही राज्ये आहेत ज्यांच्यावर ढग दयाळू आहेत. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये इतका पाऊस झाला की, पूर आणि भूस्खलनामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हिमाचलमध्ये आतापर्यंत फक्त सामान्य पाऊस झाला आहे. मात्र कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने नैसर्गिक घटना वाढल्या आहेत.

वाळवंटात मुसळधारअधिकाऱ्यांनी सांगितले की, 20 ऑगस्टपर्यंत राजस्थानमधील 716 धरणे त्यांच्या क्षमतेच्या 76% पाण्याने भरली आहेत. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत केवळ 57 टक्के पाणी भरले होते. यंदा एवढा पाऊस पडल्याने पुढील वर्षी पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी 23 ऑगस्टपर्यंत राजस्थानमध्ये सामान्यपेक्षा 51% जास्त पाऊस झाला आहे. येथील एकही जिल्हा कोरडा नाही. ओडिशात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरापासून दिलासा मिळालेला नाही. नद्यांची पातळी कमी होत आहे, मात्र तरीही 902 गावांतील साडेसहा हजार लोक बाधित आहेत. राज्यातील जवळपास सर्वच नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :RainपाऊसfloodपूरRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेश