शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

केरळ, कर्नाटकात पुरामुळे ६ लाख लोकांचे स्थलांतर, ५0 लोक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 04:07 IST

केरळच्या काही भागांतील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मलप्पुरम तथा वायनाडमध्ये भूस्खलनामुळे कवलप्परा आणि पुथुमाला भागात मदतकार्य सुरूच आहे.

तिरुवनंतपुरम/बंगळुरू : केरळच्या काही भागांतील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मलप्पुरम तथा वायनाडमध्ये भूस्खलनामुळे कवलप्परा आणि पुथुमाला भागात मदतकार्य सुरूच आहे. केरळ, कर्नाटकात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या वाढून १२३ झाली आहे, तर ६ लाख लोकांनी मदत शिबिरात आश्रय घेतलेला आहे.केरळात ५८ व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. यातील ५० लोक मलप्पुरमचे आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांंधी हे पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी केरळमध्ये आलेले आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी वायनाडच्या तिरुवम्बाडीमध्ये एका शिबिरात पाहणी केली. या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, संकटाच्या काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत. पूरग्रस्त लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस आणि यूडीएफच्या कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले की, आज सण असूनही आनंदाचे वातावरण नाही. तरीही मी आपणास ईदच्या शुभेच्छा देतो.मध्य भारत, केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशाराबंगालच्या उत्तर पश्चिम उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे मध्य भारतात आणि केरळच्या काही भागांत आगामी दोन दिवसांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.राहुल गांधी यांचे मदत साहित्य देण्याचे आवाहन

वायनाड : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी नागरिकांना आवाहन केले की, वायनाडमधील पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक साहित्याची मदत करावी. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून, यात म्हटले आहे की, वायनाडमध्ये पुराने मोठे नुकसान झाले आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यांना शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. या लोकांना तात्काळ पाणी बॉटल, चटई, चादरी, कपडे, चप्पल, साबण, टूथब्रश, ब्लिचिंग पावडर आदींची गरज आहे. लोकांनी बिस्किट, साखर, मूग डाळ, हरभरा डाळ, नारळाचे तेल, भाज्या, ब्रेड आणि मुलांसाठी खाण्याचे पदार्थ द्यावेत, असे आवाहन केले आहे.मृत्यूनंतरही त्यांचे हातात घट्ट होते हातमलप्पुरम : आई आपल्या मुलावर किती प्रेम करते? त्याच्यासाठी ती काय काय नाही करीत? पण, जेव्हा मृत्यू समोर दिसू लागला आणि त्यातून सुटका होण्याची शक्यताही धूसर झाली तेव्हा या माऊलीने आपल्या दीड वर्षाच्या लेकराचा हात हातात घट्ट धरला.कदाचित काळाच्या तावडीतून हा कोवळा जीव तरी वाचावा हीच तिची अपेक्षा असेल; पण नियतीला काही वेगळंच करायचं होतं... मलप्पुरममध्ये मदतकार्यात भूस्खलनाच्या ठिकाणाहून गीतू (२१) या महिलेचा आणि तिच्या दीड वर्षाच्या धु्रव या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मातेने आपल्या चिमुरड्याचा हात हातात घट्ट पकडला होता.अगदी मृत्यूनंतरही हाताची ही पकड तशीच होती. स्थानिक लोकांनी हे दृश्य पाहिले तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले.या दुर्घटनेत महिलेचा पती सरत बचावला आहे; पण यात आईचाही मृत्यू झाला आहे. पत्नी, मुलगा आणि आईच्या जाण्याने सरत यांना मोठा धक्का बसला आहे.

कर्नाटकमध्ये 40 जणांचा बळी कर्नाटकात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये मृृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ४० वर पोहोचली असून, १४ नागरिक बेपत्ता आहेत. आतापर्यंत पुरात फसलेल्या ५ लाख ८१ हजार लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, तर ११६८ शिबिरांत ३,२७,३५४ लोकांनी आश्रय घेतला आहे. राज्यात मदतकार्य वेगाने सुरू असून, पाऊस थांबल्याने पाणी ओसरू लागले आहे. ४ ते ५ दिवसांत परिस्थितीत सुधारणा होईल, असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केले, तर केंद्राकडून 3000 कोटी रुपयांची तात्काळ मदत राज्य सरकारने मागितली.माय-लेकीसह भूस्खलनात सहा जण ठारडेहराडून : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांत मुसळधार पावसानंतरच्या भूस्खलन आणि पुराच्या दुर्घटनेत माय-लेकीसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तीन लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. चमोली जिल्ह्यात पहाडी भागात सोमवारी ही दुर्घटना घडली. भूस्खलनात रूपा देवी आणि त्यांची ९ महिन्यांची मुलगी चंदा दबल्या गेल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घरातील ४० शेळ्या आणि दोन बैलही ढिगाºयाखाली दबले असल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :floodपूरKeralaकेरळKarnatakकर्नाटक