शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जम्मू काश्मीर - आंदोलनावेळी सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केल्यास पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:28 IST

जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोहरा यांनी राज्य सरकारच्या त्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे, ज्यानुसार उपोषण किंवा निदर्शन करत असताना झालेल्या सार्वजनिक संपत्तीची नुकसानभरपाई आंदोलकांकडून वसूल केली जाणार आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये अनेकदा हिंसक आंदोलनादरम्यान सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं जातं. मात्र आता अशाप्रकारे संपत्तीचं नुकसान करणा-या आंदोलकांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी सरकारने तयारी केली आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोहरा यांनी राज्य सरकारच्या त्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे, ज्यानुसार उपोषण किंवा निदर्शन करत असताना झालेल्या सार्वजनिक संपत्तीची नुकसानभरपाई आंदोलकांकडून वसूल केली जाणार आहे.  आंदोलकांकडून फक्त दंड आकारला जाणार नाही, तर त्यांना जवळपास पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. 

जम्मू अॅण्ड काश्मीर पब्लिक प्रॉपर्टी (प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज) ऑर्डिनन्स 2017 अंतर्गत, सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानाशी संबंधित अस्तित्वात असलेल्या कायद्यात काही बदल केले जाणार आहेत, आणि त्यानंतर हा अध्यादेश तात्काळपणे लागू करण्यात येईल. 'यामुळे व्यक्ती तसंच संघटनांच्या सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहोचवण्याच्या भूमिकेला आळा बसेल', असं एका अधिकृत वक्तव्यात सांगण्यात आलं आहे. 

हा अध्यादेश आणण्यामागे दोन उद्देश आहेत. पहिला उद्धेश म्हणजे सार्वजनिक आणि खासगी संपत्तीला नुकसान पोहोचवणं दंडनीय गुन्हा असेल, आणि दुसरा म्हणजे असे गुन्हे करणा-यांना थेट जबाबदार ठरवण्यास मदत मिळेल. बंद, उपोषण, निदर्शन तसंच इतर प्रकारच्या आंदोलनादरम्यान जर सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचं नुकसान झालं तर बंद किंवा आंदोलनासाठी उकसवणा-यांना दोन ते पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय त्यांना बाजारमूल्याप्रमाणे नुकसान झालेल्या संपत्तीची दंड म्हणून भरपाई द्यावी लागणार आहे. 

याआधी खासगी संपत्तीचं नुकसान झाल्यास कारवाई करण्यासाठी कायद्यात कोणतीही तरतूद नव्हती. मात्र या अध्यादेशात ही तरतूद करण्यात आली आहे. याआधी फक्त सरकारी संपत्तीचं नुकसान झाल्यावरच कारवाई केली जात होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करण्यासाठी कायद्यात सुधार करण्याचा हा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. सध्या विधानसभेचं कोणतंही अधिवेशन सुरु नसल्याने मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या शिफाशीनंतर राज्यपालांनी हा अध्यादेश लागू केला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती