शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जवानांची जिगरबाज कामगिरी; बुरहान वानी गँग 'खल्लास', ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 11:54 IST

दहशतवाद्यांना जाऊन मिळालेल्या काश्मीर विद्यापीठातील प्राध्यापकालाही जवानांनी ठार केलं आहे.

श्रीनगर: काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या 'मिशन ऑल आउट'ला आज मोठं यश मिळालंय. शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर सद्दाम पाडर याच्यासह पाच जणांना जवानांनी कंठस्नान घातलं आहे. सद्दाम मारला गेल्यानं बुरहान वानी गँग 'खल्लास' झाली आहे. दहशतवाद्यांना जाऊन मिळालेल्या काश्मीर विद्यापीठातील प्राध्यापकालाही जवानांनी ठार केल्याचं कळतं.

शोपियान जिल्ह्यातील बडीगाम क्षेत्रात आज सकाळपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांची गोळी लागून दोन जण जखमीही झाले होते. त्यानंतर, जवानांनी केलेल्या व्यूहरचनेत दहशतवादी अडकले आणि दुपार व्हायच्या आतच त्यांचा 'खेळ खल्लास' झाला. बुरहान गँगमधील एकमेव जिवंत हिज्बुल कमांडर सद्दाम पाडर याच्यासोबत मोहम्मद रफी भट्ट, बिलाल मौलवी, आदिल मलिक हे चकमकीत ठार झालेत. पाच दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले आहेत. 

या कारवाईदरम्यान, ४४ राजपुताना रायफल्सचा एक जवान आणि पोलीस अनिल कुमार जखमी झाले. त्यांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

वर्षभरात ५९ दहशतवादी ठार

भारताच्या नंदनवनात शांतता नांदावी, या हेतूने काश्मीर खोऱ्यातून दहशतवादाचा बिमोड करण्याचा विडाच लष्कराने उचलला आहे. २०१७ मध्ये, देशात घुसखोरी करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २०८ दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं होतं. या वर्षी आत्तापर्यंत ५९ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं समजतं. 

गेल्या महिन्यात पुलवामा इथं जवान आणि पोलीस यांनी संयुक्तपणे दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. त्यात हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर समीर टायगरही होता. बुरहान वानीनंतर तो हिज्बुलचा 'पोस्टर बॉय' झाला होता. पण, जवानांनी अत्यंत चलाखीने त्याचा खेळ संपवला आणि आता सद्दामलाही ठार केलं. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीन