शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जवानांची जिगरबाज कामगिरी; बुरहान वानी गँग 'खल्लास', ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 11:54 IST

दहशतवाद्यांना जाऊन मिळालेल्या काश्मीर विद्यापीठातील प्राध्यापकालाही जवानांनी ठार केलं आहे.

श्रीनगर: काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या 'मिशन ऑल आउट'ला आज मोठं यश मिळालंय. शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर सद्दाम पाडर याच्यासह पाच जणांना जवानांनी कंठस्नान घातलं आहे. सद्दाम मारला गेल्यानं बुरहान वानी गँग 'खल्लास' झाली आहे. दहशतवाद्यांना जाऊन मिळालेल्या काश्मीर विद्यापीठातील प्राध्यापकालाही जवानांनी ठार केल्याचं कळतं.

शोपियान जिल्ह्यातील बडीगाम क्षेत्रात आज सकाळपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांची गोळी लागून दोन जण जखमीही झाले होते. त्यानंतर, जवानांनी केलेल्या व्यूहरचनेत दहशतवादी अडकले आणि दुपार व्हायच्या आतच त्यांचा 'खेळ खल्लास' झाला. बुरहान गँगमधील एकमेव जिवंत हिज्बुल कमांडर सद्दाम पाडर याच्यासोबत मोहम्मद रफी भट्ट, बिलाल मौलवी, आदिल मलिक हे चकमकीत ठार झालेत. पाच दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले आहेत. 

या कारवाईदरम्यान, ४४ राजपुताना रायफल्सचा एक जवान आणि पोलीस अनिल कुमार जखमी झाले. त्यांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

वर्षभरात ५९ दहशतवादी ठार

भारताच्या नंदनवनात शांतता नांदावी, या हेतूने काश्मीर खोऱ्यातून दहशतवादाचा बिमोड करण्याचा विडाच लष्कराने उचलला आहे. २०१७ मध्ये, देशात घुसखोरी करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २०८ दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं होतं. या वर्षी आत्तापर्यंत ५९ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं समजतं. 

गेल्या महिन्यात पुलवामा इथं जवान आणि पोलीस यांनी संयुक्तपणे दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. त्यात हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर समीर टायगरही होता. बुरहान वानीनंतर तो हिज्बुलचा 'पोस्टर बॉय' झाला होता. पण, जवानांनी अत्यंत चलाखीने त्याचा खेळ संपवला आणि आता सद्दामलाही ठार केलं. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीन