शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:37 IST

Car Accident In Uttar Pradesh: कारला भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबामधील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण बदायूं येथील एका लग्नसमारंभातून दिल्लीला परतत होते, त्यादरम्यान, वाटेतच बुलंदशहर जिल्ह्यात हा अपघात झाला.

कारला भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबामधील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण बदायूं येथील एका लग्नसमारंभातून दिल्लीला परतत होते, त्यादरम्यान, वाटेतच बुलंदशहर जिल्ह्यात हा अपघात झाला.

या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्रीच्या वेळी कार चालवत असताना चालकाला झोप आली. त्यामुळे ही कार पुलावर आदळून पलटली. त्यानंतर या कारमध्ये आग लागली. मात्र अपघातानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने आतील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताची माहिती देताना बुलंदशहर पोलिसांनी सांगितले की, जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या जानीपूर चंदोस तिठ्याजवळ एक स्विफ्ट कार पुलावर आदळली. त्यानंतर या कारमध्ये आग लागली. या कारमधून एखाच कुटुंबातील सहा जण प्रवास करत होते. पैकी एक महिला बचावली तर इतर पाच जणांचा जळून मृत्यू झाला.  

दिल्लीतील मालवीयनगर येथील रहिवासी तंबीज अहमद हे आपल्या आणि त्यांच्या भाओजींच्या कुटुंबीयांसह एका लग्नसोहळ्यासाठी बदायूं येथील एका गावात आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते दिल्लीला परत जात होते. त्या प्रवासादरम्यान, आज पहाटे त्यांच्या कारला हा अपघात झाला. या अपघातात तंबीज अहमद, त्यांचे भाओजी जुबैर, सलजनिदा, त्यांची पत्नी मोमिना आणि भाओजींचा अडीच वर्षांचा मुलगा जैनुल यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात गुलनाज ही एकमेव महिला बचावली आहे.

कार चालकाला झोप आल्याने कार पुलावर आदळून हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पीडितांच्या नातेवाईकांनी एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पुलावर आदळून तिला आग लागल्याचा दावा केला आहे.  

टॅग्स :AccidentअपघातcarकारfireआगUttar Pradeshउत्तर प्रदेश