शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:37 IST

Car Accident In Uttar Pradesh: कारला भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबामधील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण बदायूं येथील एका लग्नसमारंभातून दिल्लीला परतत होते, त्यादरम्यान, वाटेतच बुलंदशहर जिल्ह्यात हा अपघात झाला.

कारला भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबामधील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण बदायूं येथील एका लग्नसमारंभातून दिल्लीला परतत होते, त्यादरम्यान, वाटेतच बुलंदशहर जिल्ह्यात हा अपघात झाला.

या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्रीच्या वेळी कार चालवत असताना चालकाला झोप आली. त्यामुळे ही कार पुलावर आदळून पलटली. त्यानंतर या कारमध्ये आग लागली. मात्र अपघातानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने आतील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताची माहिती देताना बुलंदशहर पोलिसांनी सांगितले की, जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या जानीपूर चंदोस तिठ्याजवळ एक स्विफ्ट कार पुलावर आदळली. त्यानंतर या कारमध्ये आग लागली. या कारमधून एखाच कुटुंबातील सहा जण प्रवास करत होते. पैकी एक महिला बचावली तर इतर पाच जणांचा जळून मृत्यू झाला.  

दिल्लीतील मालवीयनगर येथील रहिवासी तंबीज अहमद हे आपल्या आणि त्यांच्या भाओजींच्या कुटुंबीयांसह एका लग्नसोहळ्यासाठी बदायूं येथील एका गावात आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते दिल्लीला परत जात होते. त्या प्रवासादरम्यान, आज पहाटे त्यांच्या कारला हा अपघात झाला. या अपघातात तंबीज अहमद, त्यांचे भाओजी जुबैर, सलजनिदा, त्यांची पत्नी मोमिना आणि भाओजींचा अडीच वर्षांचा मुलगा जैनुल यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात गुलनाज ही एकमेव महिला बचावली आहे.

कार चालकाला झोप आल्याने कार पुलावर आदळून हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पीडितांच्या नातेवाईकांनी एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पुलावर आदळून तिला आग लागल्याचा दावा केला आहे.  

टॅग्स :AccidentअपघातcarकारfireआगUttar Pradeshउत्तर प्रदेश