शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

गुपचूप उभा राहा नाहीतर...; कॉलेजमध्ये खुलेआम सुरू होती रॅगिंग, तीन तासांनी विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 20:01 IST

गुजरातच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगमुळे पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Patan Medical College Ragging:  गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील जीएमईआरएस मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेला विद्यार्थी आणि इतर विद्यार्थ्यांची त्यांच्या वरिष्ठांनी रॅगिंग केली होती. यादरम्यान विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला तीन तास उभे केले, त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून कॉलेज प्रशासनाने १५ विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मेथानिया असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याच वर्षी त्याने जीएमईआरएस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. तो प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. वसतिगृहातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्याला ओळख करुन देण्याच्या नावाखाली तीन तास उभे केले. अनिलला गाणं गाण्यास आणि नृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर अनिल बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. अनिलने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. जबाब नोंदवल्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे. यानंतर कॉलेजमध्ये तातडीने रॅगिंगविरोधी समितीची बैठक झाली. यामध्ये कनिष्ठ विद्यार्थ्यांचे जबाब घेण्यात आले, त्यात रॅगिंग झाल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले होते. जबाब दिल्यानंतर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अनिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अंतर्गत जखमा असू शकतात, अशी भीती रुग्णालयाचे डॉ.जयेश पांचाळ यांनी व्यक्त केली.

अनिलचे कुटुंब गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात राहते. अनिलने महिनाभरापूर्वीच धारपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्याच्या कुटुंबियांना कॉलेजमधून फोन आला आणि सांगण्यात आले की अनिल बेशुद्ध झाला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनानंतरच सत्य कळणार आहे. आम्हाला शासन आणि महाविद्यालयाकडून न्याय हवा आहे, असे अनिलच्या कुटुंबियांचे म्हणणं आहे.