शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

देशातील पहिले राज्य : सिक्कीममध्ये यापुढे केवळ सेंद्रिय भाज्या, फळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:46 IST

येत्या १ एप्रिल, २०१८ पासून सिक्कीममध्ये केवळ आणि केवळ रसायनांचा वापर न करता पिकवलेल्या सेंद्रिय भाज्याच मिळणार आहेत. एवढेच नव्हे, तर रसायनांचा वापर करून पिकवलेल्या (असेंद्रिय) भाज्या आणि फळे यांच्यावर सिक्कीमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

गंगटोक : येत्या १ एप्रिल, २०१८ पासून सिक्कीममध्ये केवळ आणि केवळ रसायनांचा वापर न करता पिकवलेल्या सेंद्रिय भाज्याचमिळणार आहेत. एवढेच नव्हे, तर रसायनांचा वापर करून पिकवलेल्या (असेंद्रिय) भाज्या आणि फळे यांच्यावर सिक्कीमध्ये बंदी घालण्यात आली आहे.अन्य राज्यांतून रसायनांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या येऊ न देण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. केवळ सेंद्रिय कृषी उत्पादने म्हणजे भाज्या आणि फळेच उपलब्ध असणारे सिक्कीम हे त्यामुळे भारतातील पहिले राज्य असेल.सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या आणि फळे बाजारात आणण्यासाठी राज्य सरकार वाहने उपलब्ध करून देणार आहे. यामुळे सिक्कीम कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात स्वावलंबी बनले, असे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी म्हटले आहे.राज्यात रासायनिक शेती करणाºया सुमारे ६६ हजार शेतकºयांना सेंद्रिय शेती करण्याचे महत्त्व पटवून देणे, सरकारला जड गेले नाही. चामलिंग २००३मध्ये चामलिंग मुख्यमंत्री होते व त्यांनी विधानसभेत राज्यातील संपूर्ण शेती सेंद्रिय करण्याची घोषणा केली होती. ते तेव्हा म्हणाले होते की आले, हळद, आॅर्किड, वेलची आणि बकव्हिट (एका प्रकारचे धान्य) ही पाच उत्पादने सेंद्रिय पद्धतीने करण्याचे लक्ष्य आहे व त्यानंतर इतर पिके घेतली जातील.९९ टक्के सेंद्रिय शेतीत्यांनी २०१०मध्ये सिक्कीम आॅर्गनिक मिशनची स्थापना करून प्रारंभिक प्रकल्पात ८,१५० हेक्टर्स सेंद्रिय शेतीला सुरुवात झाली. आज राज्यातील लागवडयोग्य ७७ हजार हेक्टर्सपैकी ९९ टक्के शेती सेंद्रिय व्यवस्थापनाखाली आहे. १५ वर्षांपूर्वी सिक्कीम पूर्णपणे सेंद्रिय शेतीचे राज्य करण्याची विधानसभेत केलेली घोषणा आता प्रत्यक्षात आली आहे. विद्यमान मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनीच २००३मध्ये ही घोषणा केली होती.

टॅग्स :vegetableभाज्या