शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

शेकोटीसाठी लावलेल्या आगीत अख्खं गाव जळून खाक, 100 जनावरांचा होरळपून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 12:49 PM

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सांवणी गावात गुरुवारी रात्री आग लागल्यामुळे 40 घरं जळून खाक झाली

देहरादून - उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सांवणी गावात गुरुवारी रात्री आग लागल्यामुळे 40 घरं जळून खाक झाली. आग इतकी भयानक होती गावातील लाकडाची सर्व घरं जळाली. आग लागण्याचं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, थंडी वाढली असल्या कारणाने एका घरात शेकोटी पेटवण्यात आली होती, ज्यामुळे त्या घराला आग लागली आणि ती नंतर संपुर्ण गावभर पसरली.

गावात लाकडाची घरं असल्या कारणाने आग अत्यंत वेगाने पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ लहान मुलं, बायका आणि वयस्करांना घेऊन शेताच्या दिशेने धावले. पण गुरंढोरं गावातच राहिली होती. आगीत होरपळून जवळपास 100 जनावरांचा मृत्यू झाला. गाव अत्यंत दुर्गम भागात असल्या कारणाने प्रशासनाला गावात पोहण्याचासाठी खूप वेळ लागला. वेळेत पोहोचू न शकल्याने गावाचं प्रचंड नुकसान झालं. 

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी जिल्हाधिका-यांना मदत पोहोचवण्याचा आदेश दिला आहे. त्यांनी घटनेसंबंधी ट्विट करत लिहिलं आहे की, 'उत्तरकाशीमधील सावणी गावात झालेल्या दुर्घटनेबद्दल मी दुख: व्यक्त करतो. पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर मदत पोहोचवण्याचा आदेश जिल्हाधिका-यांना दिला आहे. पीडित कुटुंबांना औषधं आणि वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा आदेश सीएमओला दिला आहे'.