शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खर्चात हयगय नाही : सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 2:11 AM

महामारी कधी संपणार माहिती नाही; खात्रीशीर लसही नाही

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारी कधी संपेल याबाबत काहीच सांगता येत नाही, या आजारावर खात्रीशीर लसही नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. खर्चातही कोणतीच हयगय केली जाणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.सीतारामन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मागील सहा महिन्यांत आव्हाने अजिबात कमी झालेली नाहीत. आव्हानांचे स्वरूप मात्र बदलले आहे. वित्त मंत्रालयाने प्रतिसादात्मक कृतीची गती वाढविली आहे.सीतारामन यांनी म्हटले की, प्रतिदशलक्ष रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण यात अनेक कारणांनी घट झाली आहे. लोकांतील जागरूकता आणि खबरदारी हे त्यातील एक कारण आहे; पण चिंता अजूनही कायम आहे. आपल्याकडे अजूनही खात्रीशीर लस उपलब्ध नाही.साथ कधी संपेल याची कोणतीही तारीख सांगता येत नाही. काही ठिकाणाहून बातम्या येत आहेत की, बरे झालेल्या लोकांनाही पुन्हा लागण होत आहे.त्यामुळे सर्व छोट्या व मध्यम व्यावसायिक - उद्यमींच्या मनात अनिश्चितता घोंगावत आहे. त्यांचा जीडीपीतील वाटा ५५ टक्के आहे.उत्पादन क्षेत्राला गती देण्यासाठी प्रयत्न सुरूसरकारकडून केल्या जात असलेल्या खर्चाबाबत सरकारमधील एक गट असंतुष्ट दिसत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता सीतारामन यांनी सांगितले की, नाही असे काहीही नाही. सरकारकडून प्रोत्साहन जारी केले जात आहे. खर्चातही कोणतीच हयगय केली जात नाही. सरकारी प्रयत्नांचे परिणामही काही प्रमाणात दिसून येत आहेत. वस्तू उत्पादन क्षेत्र पुन्हा झेप घेताना दिसून येत आहे. गावी गेलेले कामगार कार्यस्थळी परतत आहेत. याला आणखी गती देण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन