शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अखेर शिवाजी महाराजांवरील 'ते' पुस्तक घेतलं मागे; लेखक जयभगवान गोयल यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 23:50 IST

छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जगाचे राजे होते,

नवी दिल्ली - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या नावाने लेखक जयभगवान गोयल यांनी नरेंद्र मोदींवर पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकाचं प्रकाशन दिल्ली भाजपा कार्यालयात करण्यात आलं होतं. मात्र या वादावरुन महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर भाजपाने हे पुस्तक मागे घेतलं आहे. लेखक जयभगवान गोयल यांनी या प्रकारावर माफी मागितली आहे. 

या प्रकारावर बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, देशभरात कालपासून लोकांमध्ये  या पुस्तकामुळे नाराजी व्यक्त होत होती. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही. जयभगवान गोयल यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्याचा भाजपाशी काही संबंध नाही. पुस्तक प्रकाशित होईपर्यंत यात काय आहे याची कल्पना नव्हती. आज त्यांनी भेटून माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे असं जावडेकरांनी सांगितले. 

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जगाचे राजे होते, कल्याणकारी राज्य त्यांनी चालवलं त्यामुळेच इतक्या वर्षांनंतर त्यांचे स्मरण आजही लोकं करतात. अतुलनीय व्यक्तिमत्वाची तुलना केली जाऊ शकत नाही. या पुस्तकामुळे अनेक ठिकाणी आंदोलन झालं. हे पुस्तक ज्यांनी लिहिलं आहे ते लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. हा मुद्दा इथे संपवावा अशी विनंती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. 

दरम्यान, जाणीवपूर्वक शिवरायांचा अवमान भाजपाकडून केला जातो. जनतेत जो आक्रोश केला जात होता. विरोधक राजकारण करतंय असं भाजपा आरोप करत होती. मात्र ही जनभावना होती असं मतं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. तर भाजपाकडून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवण्यात येतात. त्याचा जनतेत काय प्रतिक्रिया उमटतात हे भाजपा पाहतं. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा हा विषय आहे. विषय संपवा हे जनता ठरवणार आहे असं विधान अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.  

टॅग्स :BJPभाजपाPrakash Javadekarप्रकाश जावडेकरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज