शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:56 IST

सौदी अरेबियामध्ये मक्काहून मदीनाला जाणाऱ्या बसला अपघात झाला, या अपघातामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले.

सौदी अरेबियामध्ये उमरा यात्रेदरम्यान झालेल्या एका दुर्दैवी अपघातात किमान ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यातील बहुतेक प्रवासी हैदराबादचे असल्याचे सांगितले जात आहे. तेलंगणा सरकार आणि जेद्दाहमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये टँकरशी टक्कर झाल्यानंतर बसला आग लागल्याचे दिसत आहे.

सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री १.३० च्या सुमारास घडला, यावेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. समोरून येणाऱ्या एका वेगाने येणाऱ्या टँकरने बसला धडक दिली. टँकरमध्ये डिझेल भरलेले असल्याचे वृत्त आहे. धडक लागताच त्याला आग लागली आणि बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसमधून धुराचे लोट दिसत होते. प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच कळाले नाही. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने बचाव कार्यासाठी पोहोचल्या. जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने ८००२४४०००३ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दु:ख व्यक्त केले

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सौदी अरेबियामधील अपघातावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट केली . "सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताने मला खूप धक्का बसला आहे. रियाधमधील आमचे दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास या अपघातात बाधित झालेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहेत. शोकाकुल कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो", असंही एस जयशंकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 42 Indians Feared Dead in Saudi Bus Accident, Telangana CM Condoles

Web Summary : A tragic bus accident in Saudi Arabia during Umrah pilgrimage reportedly killed 42 Indians, mostly from Hyderabad. The bus collided with a fuel tanker and caught fire. Indian embassy in Jeddah issued helpline numbers. External Affairs Minister S Jaishankar expressed grief.
टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाAccidentअपघातTelanganaतेलंगणा