शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
2
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
3
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
4
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
5
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
6
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
7
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
8
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
9
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
10
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
11
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
12
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
13
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
14
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
15
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
16
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
17
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
18
PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास
19
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
20
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:56 IST

सौदी अरेबियामध्ये मक्काहून मदीनाला जाणाऱ्या बसला अपघात झाला, या अपघातामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले.

सौदी अरेबियामध्ये उमरा यात्रेदरम्यान झालेल्या एका दुर्दैवी अपघातात किमान ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यातील बहुतेक प्रवासी हैदराबादचे असल्याचे सांगितले जात आहे. तेलंगणा सरकार आणि जेद्दाहमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये टँकरशी टक्कर झाल्यानंतर बसला आग लागल्याचे दिसत आहे.

सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री १.३० च्या सुमारास घडला, यावेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. समोरून येणाऱ्या एका वेगाने येणाऱ्या टँकरने बसला धडक दिली. टँकरमध्ये डिझेल भरलेले असल्याचे वृत्त आहे. धडक लागताच त्याला आग लागली आणि बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसमधून धुराचे लोट दिसत होते. प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच कळाले नाही. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने बचाव कार्यासाठी पोहोचल्या. जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने ८००२४४०००३ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दु:ख व्यक्त केले

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सौदी अरेबियामधील अपघातावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट केली . "सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताने मला खूप धक्का बसला आहे. रियाधमधील आमचे दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास या अपघातात बाधित झालेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहेत. शोकाकुल कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो", असंही एस जयशंकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 42 Indians Feared Dead in Saudi Bus Accident, Telangana CM Condoles

Web Summary : A tragic bus accident in Saudi Arabia during Umrah pilgrimage reportedly killed 42 Indians, mostly from Hyderabad. The bus collided with a fuel tanker and caught fire. Indian embassy in Jeddah issued helpline numbers. External Affairs Minister S Jaishankar expressed grief.
टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाAccidentअपघातTelanganaतेलंगणा