शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

भारताच्या हल्ल्याची पाकला भीती; सीमेजवळील नागरिकांना केले सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 5:32 AM

लष्कराने सुरू केली तयारी : रुग्णालयांत जवानांसाठी २५ टक्के खाटा ठेवण्याचे आदेश

श्रीनगर : पुलवामाच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या भारताकडून हल्ले होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये धावपळ सुरू झाली आहे. पाक सरकारने खासगी व सरकारी २५ टक्के खाटा जवानांसाठी राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नियंत्रण रेषेजवळील नीलम, झेलम, रावळकोट, हवेली, भीमबेर या भागातील लोकांना हल्ल्यांपासून सतर्क राहाण्याचा इशारा दिला असून, रात्री शक्यतो दिवे लावू नका, अशाही सूचना केल्या आहेत.

पाकिस्तानी लष्कराच्या बलुचिस्तानमधील एका छावणीतला दस्तावेज तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाला सरकारने पाठविलेले पत्रातून ही माहिती उघड झाली. भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याची तयारी केली असल्याचे या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. भारताशी होणारे संभाव्य युद्ध लक्षात घेऊन सर्व वैद्यकीय सुविधांनिशी सुसज्ज राहावे, असे पत्र क्वेट्टा येथील लष्करी तळाने सिंध व पंजाब प्रांतातील लष्करी व अन्य रुग्णालयांना पाठविले आहे. बलुचिस्तानमध्ये पाकसरकारविरोधी भावना प्रबळ आहे. त्यामुळे तिथे आदेशांचे तंतोतंत पालन व्हावे म्हणून पाकिस्तान सरकार अधिकच लक्ष देत आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर काय कारवाई करायची याचे संपूर्ण अधिकार लष्कराला दिले आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. त्यावर भारताने हल्ला केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल्, असा इशारा पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला होता. भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्याची शक्यता लक्षात घेऊन सीमेजवळील सर्व दहशतवादी तळ पाकिस्तानने आपल्या लष्करी छावण्यांजवळ हलविले आहेत. त्यामुळे भारताने हल्ला चढविल्यास त्यांची थेट पाकिस्तानी सैन्याशी गाठ पडेल.काश्मिरी अतिरेक्यांना उत्तर प्रदेशातून अटकलखनऊ : जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे अटक करण्यात आली. त्यापैकी एक कुलगामचा शहानवाज अहमद तेली व दुसरा पुलवामातील अकीब अहमद मलिक आहे. जैश-ए-मोहम्मदमध्ये दहशतवाद्यांची भरती करण्याचे काम हे दोघे करत. त्यांचा १४ फेब्रुवारीच्या पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभाग आहे का असे विचारता पोलिसांनी सांगितले की, पुलवामा हल्ल्याआधी ते इथे का आले, चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच याबाबत अधिक काही माहिती सांगता येईल.पाकिस्तानमध्ये६९ संघटनांवर बंदीइस्लामाबाद : मुंबईवर २००८ साली झालेल्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा, फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन यासह ६९ दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानने आजवर बंदी घातली आहे. भारताने बंदी घातलेल्या निम्म्याहून अधिक संघटनांना पाकिस्तानातील दहशतवादी गटांकडून मदत मिळत होती.काश्मिरात दोन दहशतवाद्यांचा खात्माश्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सोपोरच्या वारपोरा भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी तिथे शोधमोहिम हाती घेतली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांना सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSoldierसैनिकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान