शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

'वडिलांचा बूट अन् आईची बांगडी सापडली, शरीर जळून राख झालेले', संभल पीडिताची अपबाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 20:07 IST

संभलमध्ये 1978 साली झालेल्या दंगलीत 184 लोक मारले गेले होते. ही दंगल इतकी भयंकर होती की, हिंदू समाज संभलमधून स्थलांतरित झाला.

UP Sambhal : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील संभल चर्चेत आले आहे. प्रशासनाला या ठिकाणी अनेक पुरातन मंदिरे आणि बारव सापडल्यामुळे संभलची देशभरात चर्चा सुरू आहे. 1978 साली याच संभलमध्ये जातीय हिंसाचार झाला होता, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच, तेव्हापासून आतापर्यंत अनेक मंदिरांवर अतिक्रमण करण्यात आले होते. पण, आता प्रशासनाने बहुतांश मंदिरे खुली केल्यामुळे 1978 च्या दंगलीतील पीडित एक एक करत पुढे येत आहेत आणि त्यांच्या वेदनादायक जगासमोर मांडत आहेत. 

दंगलीत आई-वडिलांना गमावलेगुलाब सिंह सांगतात की, 1978 साली ते 20 वर्षांचे होते. नखासा परिसरात त्यांच्या आई-वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. वडिलांचे नाव किशन सिंह आणि आईचे नाव नरेनिया होते. दंगलीच्या आगीत दोघेही जळून खाक झाले. गुलाब सिंग आई-वडिलांचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी गेले असता, त्यांना फक्त वडिलांचे बूट आणि आईची बांगडी सापडली. आजूबाजूला फक्त राख होती. इतक्या निर्घृण हत्येनंतरही गुलाब सिंह यांचा एफआयआर नोंदवण्यात आला नाही. त्या हत्याकांडाच्या कटू आठवणी त्यांच्या मनात आजही घर करुन आहेत. वृद्ध गुलाबसिंग आजही ते दृश्य आठवून थरथर कापतात.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?गुलाब सिंह यांनी 'आज तक'शी संवाद साधताना सांगितले की, त्या दिवशी आई-वडील भाचीच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. यावेळी अचानक दंगल सुरू झाली, ज्यामुळे बाजारात चेंगराचेंगरी झाली. जीव वाचवण्यासाठी अनेकजण जवळच्या कारखान्यात लपले. मात्र दंगलखोरांनी कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश केला आणि लपलेल्या सर्वांना तलवारीने कापले अन् जाळून मारले. अनेकांचे मृतदेहही हाती आले नाही, हाती आली ती फक्त राख... 

दंगलीनंतर संभलमध्ये 72 तासांचा संचारबंदी लागू करण्यात आला होता, आम्ही कुठेही जाऊ शकत नव्हतो. नंतर त्याच कारखान्यात काम करणाऱ्या एका व्यक्तीकडून मला माहिती मिळाली की, माझ्या आई-वडिलांचाही दंगलीत मृत्यू झाला आहे. जीव मुठीत ठेवून मी कारखान्यात गे,लो तेव्हा मला माझ्या वडिलांचा एक बूट आणि माझ्या आईची एक बांगडी सापडली. त्यांच्या शरीराची राख झाली होती. 1978 च्या दंगलीत एकूण 184 लोक मारले गेले होते. ही दंगल इतकी भयंकर होती की, हिंदू समाज संभलमधून स्थलांतरित झाला. आज लोकसंख्या 45 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस