शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

'वडिलांचा बूट अन् आईची बांगडी सापडली, शरीर जळून राख झालेले', संभल पीडिताची अपबाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 20:07 IST

संभलमध्ये 1978 साली झालेल्या दंगलीत 184 लोक मारले गेले होते. ही दंगल इतकी भयंकर होती की, हिंदू समाज संभलमधून स्थलांतरित झाला.

UP Sambhal : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील संभल चर्चेत आले आहे. प्रशासनाला या ठिकाणी अनेक पुरातन मंदिरे आणि बारव सापडल्यामुळे संभलची देशभरात चर्चा सुरू आहे. 1978 साली याच संभलमध्ये जातीय हिंसाचार झाला होता, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच, तेव्हापासून आतापर्यंत अनेक मंदिरांवर अतिक्रमण करण्यात आले होते. पण, आता प्रशासनाने बहुतांश मंदिरे खुली केल्यामुळे 1978 च्या दंगलीतील पीडित एक एक करत पुढे येत आहेत आणि त्यांच्या वेदनादायक जगासमोर मांडत आहेत. 

दंगलीत आई-वडिलांना गमावलेगुलाब सिंह सांगतात की, 1978 साली ते 20 वर्षांचे होते. नखासा परिसरात त्यांच्या आई-वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. वडिलांचे नाव किशन सिंह आणि आईचे नाव नरेनिया होते. दंगलीच्या आगीत दोघेही जळून खाक झाले. गुलाब सिंग आई-वडिलांचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी गेले असता, त्यांना फक्त वडिलांचे बूट आणि आईची बांगडी सापडली. आजूबाजूला फक्त राख होती. इतक्या निर्घृण हत्येनंतरही गुलाब सिंह यांचा एफआयआर नोंदवण्यात आला नाही. त्या हत्याकांडाच्या कटू आठवणी त्यांच्या मनात आजही घर करुन आहेत. वृद्ध गुलाबसिंग आजही ते दृश्य आठवून थरथर कापतात.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?गुलाब सिंह यांनी 'आज तक'शी संवाद साधताना सांगितले की, त्या दिवशी आई-वडील भाचीच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. यावेळी अचानक दंगल सुरू झाली, ज्यामुळे बाजारात चेंगराचेंगरी झाली. जीव वाचवण्यासाठी अनेकजण जवळच्या कारखान्यात लपले. मात्र दंगलखोरांनी कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश केला आणि लपलेल्या सर्वांना तलवारीने कापले अन् जाळून मारले. अनेकांचे मृतदेहही हाती आले नाही, हाती आली ती फक्त राख... 

दंगलीनंतर संभलमध्ये 72 तासांचा संचारबंदी लागू करण्यात आला होता, आम्ही कुठेही जाऊ शकत नव्हतो. नंतर त्याच कारखान्यात काम करणाऱ्या एका व्यक्तीकडून मला माहिती मिळाली की, माझ्या आई-वडिलांचाही दंगलीत मृत्यू झाला आहे. जीव मुठीत ठेवून मी कारखान्यात गे,लो तेव्हा मला माझ्या वडिलांचा एक बूट आणि माझ्या आईची एक बांगडी सापडली. त्यांच्या शरीराची राख झाली होती. 1978 च्या दंगलीत एकूण 184 लोक मारले गेले होते. ही दंगल इतकी भयंकर होती की, हिंदू समाज संभलमधून स्थलांतरित झाला. आज लोकसंख्या 45 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस