शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

हायवेतून धावणार वेगवान इंटरनेट, 2025 पर्यंत पूर्ण होणार 10 हजार किमीचा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 15:25 IST

सरकारने देशभरात 10,000 km लांब डिजिटल हायवेचा प्रकल्प हाती घेतला आहे. याची सुरुवात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेने होणार आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात डिजिटल क्रांती घडली आहे. आता यात आणखी वाढ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) देशात 10,000 किमी लांबीचा डिजिटलमहामार्ग तयार करणार आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि हैदराबाद-बंगळुरू कॉरिडॉरची डिजिटल महामार्गाची निर्मिती सुरू करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. 

NHI ने 2025 पर्यंत देशभरातील 10,000 किमी रस्त्यांवर ऑप्टिक फायबर केबल टाकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तुमच्या मनात प्रश्न येत असेल की डिजिटल हायवे म्हणजे काय? याचा कोणाला फायदा कसा होईल? डिजिटल महामार्ग किंवा रस्ते, हे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत. याद्वारे रस्त्यांचे नेटवर्क तर सुधारेल, शिवाय दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट सुविधा पुरवल्या जातील. या योजनेत त्या महामार्गांचा विकासही होईल.

डिजिटल महामार्ग कसा बांधणार?डिजिटल हायवे बांधण्याचे काम ऑप्टिकल फायबर केबल्स (OFC) द्वारे केले जाईल. निवडक द्रुतगती मार्ग आणि महामार्गांवर या तारा टाकल्या जातील. यामुळे आसपासच्या भागातही इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढेल. ऑप्टिकल फायबरमध्ये काचेच्या आणि प्लास्टिकच्या लहान तारा असलेल्या नळ्या असतात. याद्वारे, सामान्य तारांपेक्षा अधिक वेगाने माहिती पाठविली जाऊ शकते. हे नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडद्वारे बांधले जाईल. ही कंपनी NHAI चे पूर्ण मालकीचे युनिट आहे.

डिजिटल महामार्ग कुठे बांधणार?पथदर्शी प्रकल्प म्हणून दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील 1367 किलोमीटर आणि हैदराबाद-बंगळुरू कॉरिडॉरवरील 512 किलोमीटरची निवड करण्यात आली आहे. यामुळे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामधील दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देण्यात मदत होईल. NHAI ची योजना संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी जुळते. यामध्ये 2030 पर्यंत सर्वांना सुरक्षित, परवडणारी, सुलभ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :digitalडिजिटलtechnologyतंत्रज्ञानInternetइंटरनेटNitin Gadkariनितीन गडकरीCentral Governmentकेंद्र सरकारhighwayमहामार्गIndiaभारत