शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

"फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी एकाच नाण्याच्या दोन बाजू’’ चीन, कलम ३७० वरील विधानांवरून भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 18:47 IST

Farooq Abdullah Statement News : फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा टोला भाजपा नेते संबित पात्रा यांनी लगावला आहे

ठळक मुद्देफारुख अब्दुल्ला आपल्या मुलाखतींमधून चीनच्या विस्तारवादी मानसिकतेला योग्य ठरवतातराहुल गांधींची हल्लीच्या काळातील काही विधाने ऐकली तर फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे दिसून येईलसर्जिकल स्ट्राइक आणि एरअर स्ट्राइकबाबत प्रश्न निर्माण करून राहुल गांधी पाकिस्तानात हीरो बनले होते. आता फारुख अब्दुल्ला चीनमध्ये हीरो बनले आहेत

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी चीनची मदत घेऊ असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काल केल्याने नव्या वादास तोंड फुटले आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी फारुख अब्दुल्लांचे हे विधान देशविरोधी असल्याचा आरोप केला आहे. तसेच फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा टोला लगावला आहे.फारुख अब्दुल्लांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संबित पात्रा म्हणाले की, फारुख अब्दुल्ला आपल्या मुलाखतींमधून चीनच्या विस्तारवादी मानसिकतेला योग्य ठरवतात. दुसरीकडे जर संधी मिळाली तर चीनची मदत घेऊन आम्ही कलम ३७० परत आणू ,असे म्हणत देशद्रोह करणारे विधान करतात. याच फारुख अब्दुलांनी पाकव्याप्त काश्मीर तुमच्या बापाचा आहे का, असे विधान केल होते. पाकिस्तान आणि चीनबाबत यांच्या मनात असलेली आपुलकी आणि भारताविरोधातील कठोरता अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.यावेळी संबित पात्रा यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, केवळ फारुख अब्दुल्लाच असे करतात असे नाही तर तुम्ही भूतकाळात डोकावून राहुल गांधींची हल्लीच्या काळातील काही विधाने ऐकली तर फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे दिसून येईल. सर्जिकल स्ट्राइक आणि एरअर स्ट्राइकबाबत प्रश्न निर्माण करून राहुल गांधी पाकिस्तानात हीरो बनले होते. आता फारुख अब्दुल्ला चीनमध्ये हीरो बनले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.यापूर्वी २४ सप्टेंबर रोजी फारुख अब्दुल्ला यांनी जर जम्मू काश्मीरमध्ये गेलात आणि लोकाना तुम्ही भारतीय आहात का असं विचारलं तर त्याचं उत्तर ते नाही असे देतील. बरं झालं असतं जर आम्ही चिनी असतो, असं विधान केलं होतं. देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उपस्थित करणे, स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह लावणे हे एका खासदाराला शोभते का, ही देशविरोधी विधाने नाहीत का, अशी विचारणाही संबित पात्रा यांनी केली आहे.दरम्यान, काल आज तक या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना फारुख अब्दुल्ला यांनी एलएसीवर जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी केंद्र सरकार जबादार आहे कारण त्यांनी कलम ३७० रद्द केले आहे, असा आरोप केला होता. चीनने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला कधीही पाठिंबा दिलेला नाही. आता कलम ३७० चीनच्या मदतीने पुन्हा लागू करता येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे विधान केले होते.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSambit Patraसंबित पात्राFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाRahul Gandhiराहुल गांधीArticle 370कलम 370chinaचीन