शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

शेतकऱ्यांना लवकरच नव्या पीक विमा योजनेची भेट

By admin | Updated: January 3, 2016 01:55 IST

देशातल्या शेतकऱ्यांना नव्या वर्षात मोदी सरकारकडून नव्या पीक विम्याच्या आकर्षक योजनेची भेट मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २ डिसेंबरला पीक विम्याच्या प्रिमियमविषयी

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

देशातल्या शेतकऱ्यांना नव्या वर्षात मोदी सरकारकडून नव्या पीक विम्याच्या आकर्षक योजनेची भेट मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २ डिसेंबरला पीक विम्याच्या प्रिमियमविषयी विस्ताराने चर्चा झाली होती. तथापि अर्थ व कृषी मंत्रालयातल्या विसंवादामुळे हा विषय अनिर्णीत राहिला होता. पीक विम्याच्या प्रिमियमची रक्कम एकूण विमा रकमेच्या दोन ते तीन टक्क्यांपेक्षा अधिक नसावी, हा कृषी मंत्रालयाचा आग्रह अर्थ मंत्रालयाने मान्य केल्यामुळे आता ६ जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होईल, अशी शक्यता कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. सद्य:स्थितीत विविध पिकांच्या विम्यासाठी साधारणत: ३.५ ते ८ टक्के दराने प्रिमियम आकारला जातो. हा दर बराच महागडा असल्याने बहुतांश शेतकरी पिकांचा विमा उतरवण्याचे टाळतात. देशातल्या १२ कोटी शेतकऱ्यांपैकी अवघे २ कोटी शेतकरी पिकांचा विमा उतरवतात. शेतकऱ्यांना विविध कारणांनी नुकसान सोसावे लागल्यास विम्याची रक्कम अदा करण्याच्या विद्यमान नियमांमध्येही अनेक दोष व त्रुटी आहेत. मुदतीचे बंधन नसल्याने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अनेकदा वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारीही आहेत.शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊ न केंद्रीय कृषी मंत्रालयाने या संदर्भात जो प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवला, त्यात सर्वसाधारण पिकांच्या विमा प्रिमियमची रक्कम २ ते ३ टक्क्यांपेक्षा अधिक नसावी. विविध प्रकारच्या डाळींच्या पिकांचा प्रिमियम कोणत्याही स्थितीत दोन टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळण्याचा कालावधी निश्चित असावा, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली. सदर प्रस्ताव स्वीकारण्यास अर्थ मंत्रालयाने नाखुशी दर्शवली व काही अडथळे निर्माण केले. तथापि कृषिमंत्री राधामोहनसिंगांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन या प्रस्तावावर विस्ताराने चर्चा करून अधिकाऱ्यांच्या बैठकीत या प्रस्तावाबाबत एकमत झाले. डाळी, तेलबियांच्या उत्पादन वाढीसाठी विविध उपायभारतात डाळी व तेलबियांच्या उत्पादनाचे घसरलेले प्रमाण पुन्हा रुळावर यावे, यासाठी केंद्र सरकारने विविध उपायांवर भर दिला आहे. देशातल्या कृषी विज्ञान केंद्रांवर मुख्यत्वे या विषयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डाळींचे उत्पादन जिथे वाढू शकेल अशा ३00 जिल्ह्यांत, ६0 हजार हेक्टर क्षेत्रावर कृषी विज्ञान केंद्रातर्फे नवे बियाणे व नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याखेरीज आधुनिक पद्धतीने डाळी व तेलबियांचे उत्पादन कसे वाढवता येईल, याची प्रात्यक्षिकेही शेतकऱ्यांना दाखवण्यात येणार आहेत.सिंचनाच्या सुविधा वाढवण्यासाठी व जैविक शेतीला प्राधान्य देण्यासाठी कृषी मंत्रालयातर्फे विविध योजनांचा सविस्तर आराखडाही तयार करण्यात येतो आहे, अशी माहिती या सूत्रांनी दिली.