शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; ५ डिसेंबरला प्रतिमा दहन! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 12:38 AM

केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाविषयी गंभीर नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी पंतप्रधानांच्या नावाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास निवेदन देण्याचा उपक्रम घेतला आहे

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करताना एक भूमिका घेतात आणि दुसरीकडे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये फूट कशी पाडता येईल, याचेही डावपेच आखतात हे संतापजनक असून गुरुवारी देशभरातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन देण्यात येईल, असे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाविषयी गंभीर नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी पंतप्रधानांच्या नावाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास निवेदन देण्याचा उपक्रम घेतला आहे. गुरुवारी देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले जाईल. शेतीविषयक कायदे मागे घ्या अन्यथा होणाऱ्या उद्रेकास केंद्र सरकार जबाबदार राहील, अशी ताकीद या निवेदनाद्वारे दिली जाणार आहे.  या आंदोलनात ४५० संघटना एकसंघ आहेत. कोणीही दिशाभूल करणार असेल तर त्यांना ‘सरळ’ करा असा इशारा देत आपण जराही विचलित होणार नाही, याची काळजी घेऊ असे आवाहन दर्शन पाल (पंजाब), शिवकुमार कक्काजी (मध्य प्रदेश), जगजीतसिंह दल्लेवाल (पंजाब), गुरनामसिंग चडोनी (हरियाणा), मेधा पाटकर (महाराष्ट्र), योगेंद्र यादव (हरियाणा), रणजीत राजू (राजस्थान), प्रतिभा शिंदे (महाराष्ट्र), अक्षय कुमार (ओडिशा), के. व्ही. बिजू (केरळ), हरपाल चौधरी (उत्तरप्रदेश), कविता कुरुगंते (कर्नाटक) आदींनी केले आहे.

५ डिसेंबरला प्रतिमा दहन!शेतकरी संघटनांनी ५ डिसेंबर रोजी देशभरात सगळ्याच गावांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या प्रतिमांचे दहन करण्याचा निर्णय घेतला असून, तशा सूचना स्थानिक शेतकरी नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी