शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

शेतकरी आता संसदेवर धडकणार, 1 फेब्रुवारीला 'पायी मोर्चा' काढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 20:09 IST

Farmers to march towards Parliament on Budget day on February 1: शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला म्हणजेच 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन  गेल्या ६० दिवसांपासून दिल्ली सीमेवर सुरूच आहे. याच आंदोलनातंर्गत शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला म्हणजेच 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

दरम्यान, दिल्ली पोलिसांकडून ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता दिल्ली सीमेवर आंदोलन करणारे क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे नेते दर्शन पाल यांनी सोमवारी सांगितले की, १ फेब्रुवारीला शेतकऱ्यांकडून संसदेवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, बजेट सत्राचा पहिला टप्पा २९ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान चालणार असून १ फेब्रुवारीला केंद्र सरकार आपले बजेट सादर करणार आहे. 

याआधी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सोमवारी एएनआयशी संवाद साधताना सांगितले की, प्रजासत्ताक दिनाखेरीज इतर कोणताही दिवस ट्रॅक्टर रॅलीसाठी निवडला असता, पण आता त्यांनी जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व पोलीस प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे कोणतीही घटना घडू न देता शांततापूर्वक ट्रॅक्टर रॅली पार पाडली पाहिजे. 

तसेच, शेतकरी आंदोलन कधी संपेल या प्रश्नावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर की आंदोलन लवकरच संपेल. "प्रत्येकाला आपला विरोध दर्शविण्याचा अधिकार आहे, आम्ही ज्यावेळी पाहिले शेतकऱ्यांची एक अल्प संख्या कृषी  कायद्याच्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यावेळी आम्ही त्यांच्या समस्या ऐकण्याचा प्रयत्न केला आणि हा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच, हा मुद्दा होईल लवकरच सोडविला जाईल," असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले.

नवीन कृषी कायदे दीड ते दीड वर्षासाठी स्थगित करण्याचा सरकारचा प्रस्ताव एक “उत्तम ऑफर” आहे आणि निषेध नोंदवणाऱ्या शेतकरी संघटनांनी यावर फेरविचार करून आपला निर्णय कळविला जाईल, अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले व्यक्त केली. दरम्यान, सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यातील ११ व्या फेरीतील चर्चेही निष्फळ ठरली. दहाव्या फेरीच्या चर्चेत सरकारने नवीन कृषी कायदे दीड ते दीड वर्षासाठी स्थगित ठेवण्याची ऑफर दिली, पण हे शेतकरी संघटनांनी नाकारले.

११ व्या फेरीतील चर्चेच्या वेळी सरकारने शेतकरी संघटनांना प्रस्तावावर पुनर्विचार करण्यास व त्याच्या निर्णयाबद्दल जागरूक करण्यास सांगितले होते. सरकारने शेतकरी संघटनांना सर्वोत्तम ऑफर दिली आहे. मला आशा आहे की ते आपापसात चर्चा करतील आणि त्यांच्या निर्णयाबद्दल आम्हाला जागरूक करतील. एकदा त्याला याची जाणीव झाल्यावर आम्ही पुढे जाऊ, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीBudgetअर्थसंकल्प