शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आता संसदेवर धडकणार, 1 फेब्रुवारीला 'पायी मोर्चा' काढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 20:09 IST

Farmers to march towards Parliament on Budget day on February 1: शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला म्हणजेच 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन  गेल्या ६० दिवसांपासून दिल्ली सीमेवर सुरूच आहे. याच आंदोलनातंर्गत शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला म्हणजेच 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

दरम्यान, दिल्ली पोलिसांकडून ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता दिल्ली सीमेवर आंदोलन करणारे क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे नेते दर्शन पाल यांनी सोमवारी सांगितले की, १ फेब्रुवारीला शेतकऱ्यांकडून संसदेवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, बजेट सत्राचा पहिला टप्पा २९ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान चालणार असून १ फेब्रुवारीला केंद्र सरकार आपले बजेट सादर करणार आहे. 

याआधी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सोमवारी एएनआयशी संवाद साधताना सांगितले की, प्रजासत्ताक दिनाखेरीज इतर कोणताही दिवस ट्रॅक्टर रॅलीसाठी निवडला असता, पण आता त्यांनी जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व पोलीस प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे कोणतीही घटना घडू न देता शांततापूर्वक ट्रॅक्टर रॅली पार पाडली पाहिजे. 

तसेच, शेतकरी आंदोलन कधी संपेल या प्रश्नावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर की आंदोलन लवकरच संपेल. "प्रत्येकाला आपला विरोध दर्शविण्याचा अधिकार आहे, आम्ही ज्यावेळी पाहिले शेतकऱ्यांची एक अल्प संख्या कृषी  कायद्याच्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यावेळी आम्ही त्यांच्या समस्या ऐकण्याचा प्रयत्न केला आणि हा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच, हा मुद्दा होईल लवकरच सोडविला जाईल," असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले.

नवीन कृषी कायदे दीड ते दीड वर्षासाठी स्थगित करण्याचा सरकारचा प्रस्ताव एक “उत्तम ऑफर” आहे आणि निषेध नोंदवणाऱ्या शेतकरी संघटनांनी यावर फेरविचार करून आपला निर्णय कळविला जाईल, अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले व्यक्त केली. दरम्यान, सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यातील ११ व्या फेरीतील चर्चेही निष्फळ ठरली. दहाव्या फेरीच्या चर्चेत सरकारने नवीन कृषी कायदे दीड ते दीड वर्षासाठी स्थगित ठेवण्याची ऑफर दिली, पण हे शेतकरी संघटनांनी नाकारले.

११ व्या फेरीतील चर्चेच्या वेळी सरकारने शेतकरी संघटनांना प्रस्तावावर पुनर्विचार करण्यास व त्याच्या निर्णयाबद्दल जागरूक करण्यास सांगितले होते. सरकारने शेतकरी संघटनांना सर्वोत्तम ऑफर दिली आहे. मला आशा आहे की ते आपापसात चर्चा करतील आणि त्यांच्या निर्णयाबद्दल आम्हाला जागरूक करतील. एकदा त्याला याची जाणीव झाल्यावर आम्ही पुढे जाऊ, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीBudgetअर्थसंकल्प