शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"इंडिया आघाडीचे सरकार बनताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल"; राहुल गांधींची पंजाबमध्ये मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 18:08 IST

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंजाबमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंजाबमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी २९ मे रोजी पंजाबमधील लुधियाना येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली. इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच शेतकरी कर्जमाफी आयोगाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली.

तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम

गांधी म्हणाले की, इंडिया आघाडी सरकार स्थापन होताच आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. जसे भाजप अब्जाधीशांचे कर्ज माफ करतात. तसेच शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु. आम्ही एकदाच शेतकऱ्यांची कर्जे माफ करणार नाही, त्यासाठी आम्ही एक आयोग स्थापन करू, ज्याला शेतकरी कर्जमाफी आयोग म्हटले जाईल. ज्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असेल तेव्हा आयोग सरकारला कळवेल आणि आम्ही कर्जमाफी करू, असेही ते म्हणाले.

“एकदा, दोनदा, तीनदा, जितक्या वेळा शेतकऱ्याला गरज असेल तितक्या वेळा आम्ही त्याचे कर्ज माफ करू. शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांचे संरक्षण झाले पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. "पंतप्रधान मोदी म्हणतात की शेतकऱ्यांना कायदेशीर एमएसपी देता येणार नाही. निवडणुकांनंतर इंडिया आघाडी सरकार ४ जून रोजी येईल आणि आम्ही पहिल्यांदाच शेतकऱ्यांना हमीभावासह कायदेशीर एमएसपी देऊ, असंही गांधी म्हणाले. "पंजाबमध्ये ड्रग्जचा मुद्दा वाढत आहे यावर कडक कारवाई करावी, पंजाबने अंमली पदार्थांविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढले पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी