शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

"इंडिया आघाडीचे सरकार बनताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल"; राहुल गांधींची पंजाबमध्ये मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 18:08 IST

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंजाबमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंजाबमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी २९ मे रोजी पंजाबमधील लुधियाना येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली. इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच शेतकरी कर्जमाफी आयोगाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली.

तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम

गांधी म्हणाले की, इंडिया आघाडी सरकार स्थापन होताच आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. जसे भाजप अब्जाधीशांचे कर्ज माफ करतात. तसेच शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु. आम्ही एकदाच शेतकऱ्यांची कर्जे माफ करणार नाही, त्यासाठी आम्ही एक आयोग स्थापन करू, ज्याला शेतकरी कर्जमाफी आयोग म्हटले जाईल. ज्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असेल तेव्हा आयोग सरकारला कळवेल आणि आम्ही कर्जमाफी करू, असेही ते म्हणाले.

“एकदा, दोनदा, तीनदा, जितक्या वेळा शेतकऱ्याला गरज असेल तितक्या वेळा आम्ही त्याचे कर्ज माफ करू. शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांचे संरक्षण झाले पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. "पंतप्रधान मोदी म्हणतात की शेतकऱ्यांना कायदेशीर एमएसपी देता येणार नाही. निवडणुकांनंतर इंडिया आघाडी सरकार ४ जून रोजी येईल आणि आम्ही पहिल्यांदाच शेतकऱ्यांना हमीभावासह कायदेशीर एमएसपी देऊ, असंही गांधी म्हणाले. "पंजाबमध्ये ड्रग्जचा मुद्दा वाढत आहे यावर कडक कारवाई करावी, पंजाबने अंमली पदार्थांविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढले पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी