शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

750 किलो कांद्याच्या विक्रीतून फक्त 1,064 रुपये; शेतकऱ्यानं मोदींना पाठवली 'कमाई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 17:53 IST

कांद्याला अतिशय कमी दर मिळाल्यानं बळीराजा मेटाकुटीला

नाशिक: कांद्याला प्रति किलोमागे जेमतेम दीड रुपयाचा भाव मिळाल्यानं मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यानं ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवली आहे. कांद्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या दराचा निषेध म्हणून त्यांनी ही रक्कम पंतप्रधान कार्यालयाला पाठवली आहे. संजय साठे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. साठे यांनी त्यांच्या शेतातला 750 किलो कांदा विक्रीसाठी नेला होता. त्यातून चांगला परतावा मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र त्यांना फक्त 1 हजार 64 रुपये मिळाले. नाशिकच्या निफाडमध्ये राहणाऱ्या संजय साठे यांनी शेतातला 750 किलो कांदा विक्रीसाठी नेला. 'मी या हंगामात 750 किलो कांद्याचं उत्पादन घेतलं. मात्र निफाडच्या घाऊक बाजारात एक किलो कांद्यासाठी फक्त 1 रुपयाचा भाव दिला जात होता. त्यामुळे मी कशीबशी घासाघीस केली. त्यामुळे एक किलो कांद्याला 1.40 रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे 750 किलो विकून मला 1 हजार 64 रुपये मिळाले,' अशी व्यथा साठे यांनी मांडली. गेले चार महिने मेहनत करुन कांद्याला इतका कमी दर मिळाल्यानं प्रचंड दु:ख झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.कांदा विकून मिळालेली रक्कम निषेध म्हणून पंतप्रधान कार्यालयाला पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. 'पंतप्रधान कार्यालयांतर्गत येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन निधीला मी 1 हजार 64 रुपये पाठवून दिले. त्यासाठी मला आणखी 54 रुपयांचा खर्च आला', अशी माहिती त्यांनी दिली. 'मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. मी एक साधा शेतकरी आहे. मात्र सरकारला आमच्या त्रासाबद्दल काहीच वाटत नाही, याचं अतिशय वाईट वाटतं,' असं साठे म्हणाले.  

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीonionकांदा