शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

निर्गुंतवणुकीचे लक्ष्य गाठण्यात अपयश; ५०,२९८ कोटी रुपये प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 01:49 IST

सन २०१९-२० चे अंदाजपत्रक सादर करताना सरकारने यावर्षामध्ये १.०५ लाख कोटी रुपये निर्गुंवणुकीच्या माध्यमातून मिळविण्याचे लक्ष्य ठेवले होते.

नवी दिल्ली : गेली दोन वर्षे सातत्याने पूर्ण होत असलेले निर्गुंवणुकीचे लक्ष्य गाठण्यात सरलेल्या आर्थिक वर्षात सरकारला अपयश आले. या वर्षात निर्गुंवणुकीतून ६५ हजार कोटी रुपये जमा करण्याचा सरकारचा इरादा असताना केवळ ५०,२९८ कोटी रुपये यामधून मिळाले. उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी १४,७०० कोटी रुपये कमी पडले.

सन २०१९-२० चे अंदाजपत्रक सादर करताना सरकारने यावर्षामध्ये १.०५ लाख कोटी रुपये निर्गुंवणुकीच्या माध्यमातून मिळविण्याचे लक्ष्य ठेवले होते. वर्षभरातील शेअर बाजाराची निराशाजनक स्थिती बघून सरकारने अनेक कंपन्यांमधील निर्गुंतवणूक स्थगित केली. १ फे ब्रुवारी २०२० रोजी सन २०२०-२१ चे अंदाजपत्रक सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे लक्ष्य कमी करून ६५ हजार कोटी रुपयांवर आणले, मात्र कमी कलेले लक्ष्य गाठण्यातही सरकारला अपयश आले.

सन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये सरकारला निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ५०,२९८.६४ कोटी रुपये प्राप्त झाले. याआधी सन २०१७-१८ मध्ये १ लाख कोटी रुपयांहून अधिक तर २०१८-१९ मध्ये ८४,९७२ कोटी रुपये सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे मिळविले होते.

गत आर्थिक वर्षात सरकारने टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि निपको या कंपन्यांमधील आपला हिस्सा एनटीपीसीला विकला. या माध्यमातून सरकारला ११,५०० कोटी रुपये मिळाले. याशिवाय कामराजन पोर्टमधील २३८३ कोटी रुपयांचे समभाग सरकारने चेन्नई पोर्ट ट्रस्टला विकले.

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या ईटीएफ फॉलो-आॅन आॅफरच्या माध्यमातून सरकारला २६,५०० कोटी रुपयांची, तर भारत-२२ या ईटीएफच्या विक्रीतून ४३६८ कोटी रुपयांची कमाई झाली. याशिवाय आरव्हीएनएल आणि आयआरसीटीसी या दोन कंपन्यांची प्रारंभिक भाग विक्री करून सरकारने ११३० कोटी रुपये जमविले. याशिवाय हक्क भागांची सरकारने विक्री केली आणि आणखी ११३० कोटी रुपये प्राप्त करून घेतले.

चालू वर्षासाठी २.१० लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित

च्चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी सरकारने २.१० लाख कोटी रुपये निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून उभे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या वर्षामध्ये एअर इंडिया, बीपीसीएल या कंपन्यांची भागविक्री करण्याचा सरकारचा मानस आहे. याशिवाय केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच एलआयसीचा आयपीओ आणून त्या माध्यमातून काही रक्कम उभारण्याचा सरकारचा विचार जाहीर करण्यात आला आहे. अनिश्चित परिस्थितीतून शेअर बाजार कधी बाहेर येतो यावरच निर्गुंतवणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

टॅग्स :Indiaभारत