शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

निर्गुंतवणुकीचे लक्ष्य गाठण्यात अपयश; ५०,२९८ कोटी रुपये प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 01:49 IST

सन २०१९-२० चे अंदाजपत्रक सादर करताना सरकारने यावर्षामध्ये १.०५ लाख कोटी रुपये निर्गुंवणुकीच्या माध्यमातून मिळविण्याचे लक्ष्य ठेवले होते.

नवी दिल्ली : गेली दोन वर्षे सातत्याने पूर्ण होत असलेले निर्गुंवणुकीचे लक्ष्य गाठण्यात सरलेल्या आर्थिक वर्षात सरकारला अपयश आले. या वर्षात निर्गुंवणुकीतून ६५ हजार कोटी रुपये जमा करण्याचा सरकारचा इरादा असताना केवळ ५०,२९८ कोटी रुपये यामधून मिळाले. उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी १४,७०० कोटी रुपये कमी पडले.

सन २०१९-२० चे अंदाजपत्रक सादर करताना सरकारने यावर्षामध्ये १.०५ लाख कोटी रुपये निर्गुंवणुकीच्या माध्यमातून मिळविण्याचे लक्ष्य ठेवले होते. वर्षभरातील शेअर बाजाराची निराशाजनक स्थिती बघून सरकारने अनेक कंपन्यांमधील निर्गुंतवणूक स्थगित केली. १ फे ब्रुवारी २०२० रोजी सन २०२०-२१ चे अंदाजपत्रक सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे लक्ष्य कमी करून ६५ हजार कोटी रुपयांवर आणले, मात्र कमी कलेले लक्ष्य गाठण्यातही सरकारला अपयश आले.

सन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये सरकारला निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ५०,२९८.६४ कोटी रुपये प्राप्त झाले. याआधी सन २०१७-१८ मध्ये १ लाख कोटी रुपयांहून अधिक तर २०१८-१९ मध्ये ८४,९७२ कोटी रुपये सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे मिळविले होते.

गत आर्थिक वर्षात सरकारने टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि निपको या कंपन्यांमधील आपला हिस्सा एनटीपीसीला विकला. या माध्यमातून सरकारला ११,५०० कोटी रुपये मिळाले. याशिवाय कामराजन पोर्टमधील २३८३ कोटी रुपयांचे समभाग सरकारने चेन्नई पोर्ट ट्रस्टला विकले.

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या ईटीएफ फॉलो-आॅन आॅफरच्या माध्यमातून सरकारला २६,५०० कोटी रुपयांची, तर भारत-२२ या ईटीएफच्या विक्रीतून ४३६८ कोटी रुपयांची कमाई झाली. याशिवाय आरव्हीएनएल आणि आयआरसीटीसी या दोन कंपन्यांची प्रारंभिक भाग विक्री करून सरकारने ११३० कोटी रुपये जमविले. याशिवाय हक्क भागांची सरकारने विक्री केली आणि आणखी ११३० कोटी रुपये प्राप्त करून घेतले.

चालू वर्षासाठी २.१० लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित

च्चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी सरकारने २.१० लाख कोटी रुपये निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून उभे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या वर्षामध्ये एअर इंडिया, बीपीसीएल या कंपन्यांची भागविक्री करण्याचा सरकारचा मानस आहे. याशिवाय केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच एलआयसीचा आयपीओ आणून त्या माध्यमातून काही रक्कम उभारण्याचा सरकारचा विचार जाहीर करण्यात आला आहे. अनिश्चित परिस्थितीतून शेअर बाजार कधी बाहेर येतो यावरच निर्गुंतवणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

टॅग्स :Indiaभारत