शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणांवर फेसबुकवर टीकात्मक पोस्ट, 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 22:16 IST

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. झाकीर अली त्यागी असे या या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

नवी दिल्ली -  सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. झाकीर अली त्यागी असे या या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे.  उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये हा प्रकार घडला. झाकीर अली त्यागीनं एका फेसबुक पोस्टमध्ये या तरुणाने सरकारच्या धोरणांवर टीकात्मक लिखाण केलं होतं. त्यामुळे त्याला 42 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. यावेळी त्याला सराईत गुन्हागारांसोबत राहावे लागले. इतकेच नाही तर स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी पोलिसांना लाचही द्यावी लागल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

2 एप्रिलच्या रात्री पोलिसांनी त्याला फेसबुकवर पोस्ट लिहिल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्यावर भांदवि 420 अन्वये फसवणुकीचा तसेच आयटी अॅक्ट कलम 66 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला होता. त्यानतंर 42 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र, यावेळी पोलिसांनी आरोपपत्रात त्याच्यावर कलम 124 ए अन्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याची खळबळजनक माहिती त्यागीचे वकिल काझी अहमद यांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. एका स्टील फॅक्टरीमध्ये ट्रान्स्पोर्टर म्हणून काम करणाऱ्या झाकीरने सांगितले की, स्थानिक मदरशातून घरी परतत असताना चौकशीच्या नावाखाली पोलिसांनी त्याला २ एप्रिलच्या रात्री ताब्यात घेतले. चौकशीनंतर काही वेळातच त्याला सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या झाकीरच्या एफआयआर कॉपीमध्ये त्याच्यावर फेसबुकवरील लिखाणाबाबत आरोप लावण्यात आल्याचे स्पष्ट होते. या आरोपपत्रानुसार, झाकीरने फेसबुकवर लिहिले होते की, गंगा नदीला आता सजिव असल्याचा दर्जा देण्यात आला आहे. जर एखादी व्यक्ती नदीत बुडून मृत पावली, तर गंगा नदीवर गुन्हा दाखल करणार का? त्याचबरोबर राम मंदिराबाबत त्याने लिहिले होते की, राम मंदिर निर्मितीचा वाद केवळ एक थट्टा आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये पुन्हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करण्यात येईल. तसेच हज यात्रेसाठी एअर इंडियाला देण्यात आलेले अनुदान केंद्र सरकारने अद्याप का काढले नाही, याचे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे त्याने फेसबूकवरील पोस्टमध्ये लिहीले होते

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक