शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

सरकारच्या धोरणांवर फेसबुकवर टीकात्मक पोस्ट, 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 22:16 IST

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. झाकीर अली त्यागी असे या या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

नवी दिल्ली -  सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. झाकीर अली त्यागी असे या या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे.  उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये हा प्रकार घडला. झाकीर अली त्यागीनं एका फेसबुक पोस्टमध्ये या तरुणाने सरकारच्या धोरणांवर टीकात्मक लिखाण केलं होतं. त्यामुळे त्याला 42 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. यावेळी त्याला सराईत गुन्हागारांसोबत राहावे लागले. इतकेच नाही तर स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी पोलिसांना लाचही द्यावी लागल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

2 एप्रिलच्या रात्री पोलिसांनी त्याला फेसबुकवर पोस्ट लिहिल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्यावर भांदवि 420 अन्वये फसवणुकीचा तसेच आयटी अॅक्ट कलम 66 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला होता. त्यानतंर 42 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र, यावेळी पोलिसांनी आरोपपत्रात त्याच्यावर कलम 124 ए अन्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याची खळबळजनक माहिती त्यागीचे वकिल काझी अहमद यांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. एका स्टील फॅक्टरीमध्ये ट्रान्स्पोर्टर म्हणून काम करणाऱ्या झाकीरने सांगितले की, स्थानिक मदरशातून घरी परतत असताना चौकशीच्या नावाखाली पोलिसांनी त्याला २ एप्रिलच्या रात्री ताब्यात घेतले. चौकशीनंतर काही वेळातच त्याला सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या झाकीरच्या एफआयआर कॉपीमध्ये त्याच्यावर फेसबुकवरील लिखाणाबाबत आरोप लावण्यात आल्याचे स्पष्ट होते. या आरोपपत्रानुसार, झाकीरने फेसबुकवर लिहिले होते की, गंगा नदीला आता सजिव असल्याचा दर्जा देण्यात आला आहे. जर एखादी व्यक्ती नदीत बुडून मृत पावली, तर गंगा नदीवर गुन्हा दाखल करणार का? त्याचबरोबर राम मंदिराबाबत त्याने लिहिले होते की, राम मंदिर निर्मितीचा वाद केवळ एक थट्टा आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये पुन्हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करण्यात येईल. तसेच हज यात्रेसाठी एअर इंडियाला देण्यात आलेले अनुदान केंद्र सरकारने अद्याप का काढले नाही, याचे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे त्याने फेसबूकवरील पोस्टमध्ये लिहीले होते

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक