शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

नेहरूंमुळे भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनला नाही, एस जयशंकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 07:44 IST

S Jaishankar : दहशतवादावरूनही एस जयशंकर यांनी मागील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात बुधवारी आयोजित सभेत नेहरूंमुळेच भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) स्थायी सदस्य बनता आले नाही. भारताऐवजी चीनला ही संधी मिळाली, असे एस जयशंकर म्हणाले. तसेच, दहशतवादावरूनही एस जयशंकर यांनी मागील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला.

नेहरूंना भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) स्थायी सदस्य व्हावे असे वाटत नव्हते. नेहरूंनी भारतापेक्षा चीनला प्राधान्य दिले होते आणि चीनच्या स्थायी सदस्य बनवण्याच्या बाजूने होते. चीन आधी स्थायी सदस्य होईल. नंतर भारत होईल, असे नेहरू तेव्हा म्हणाले होते. पण जर मी पंतप्रधान झालो असतो तर सर्वात आधी देशाचे हित पाहिले असते, असे एस जयशंकर म्हणाले. 

भारत यापुढे सीमेपलीकडून येणारा दहशतवाद सहन करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा आव्हानांवर मात करणे सर्वात महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी २००८ मध्ये भारतावर दहशतवादी हल्ला झाला आणि मुंबई हादरली होती. आजच्या भारतात सीमेपलीकडून कोणतीही दहशतवादी घटना घडली तर आम्ही उरीसारखी प्रतिक्रिया देतो, असे एस जयशंकर यांनी सांगितले. 

याचबरोबर, सीमावर्ती भागातील जिल्ह्यांमध्ये सुरक्षा मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक नागरिकाला त्याचे महत्त्व माहीत आहे. देशाच्या उत्तर सीमेवर आपले जवान तैनात असल्यामुळेच आपल्याला सुरक्षित वाटते. हवामानासह सर्व प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या जवानांनी देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्या आहेत, असे एस जयशंकर म्हणाले.

पूर्वीचे आणि आजचे नेतृत्व यात खूप मोठा फरक आहे. आता मोदींचे नेतृत्व आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली १० वर्षांत सर्वात मोठा बदल झाला आहे. आज देश खंबीर नेतृत्वाच्या हाती आहे आणि निर्णयांमध्ये पूर्ण स्पष्टता आहे. योग्य निर्णयांमुळेच त्यांचे योग्य पालन करणे आपल्यासाठी सोपे होते. आज कोणतीही कारवाई करताना आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कारण आम्हाला १०० टक्के पाठिंबा मिळेल, हे आम्हाला माहीत आहे, असेही एस. जयशंकर म्हणाले.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाcongressकाँग्रेस