शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंमुळे भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनला नाही, एस जयशंकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 07:44 IST

S Jaishankar : दहशतवादावरूनही एस जयशंकर यांनी मागील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात बुधवारी आयोजित सभेत नेहरूंमुळेच भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) स्थायी सदस्य बनता आले नाही. भारताऐवजी चीनला ही संधी मिळाली, असे एस जयशंकर म्हणाले. तसेच, दहशतवादावरूनही एस जयशंकर यांनी मागील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला.

नेहरूंना भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) स्थायी सदस्य व्हावे असे वाटत नव्हते. नेहरूंनी भारतापेक्षा चीनला प्राधान्य दिले होते आणि चीनच्या स्थायी सदस्य बनवण्याच्या बाजूने होते. चीन आधी स्थायी सदस्य होईल. नंतर भारत होईल, असे नेहरू तेव्हा म्हणाले होते. पण जर मी पंतप्रधान झालो असतो तर सर्वात आधी देशाचे हित पाहिले असते, असे एस जयशंकर म्हणाले. 

भारत यापुढे सीमेपलीकडून येणारा दहशतवाद सहन करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा आव्हानांवर मात करणे सर्वात महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी २००८ मध्ये भारतावर दहशतवादी हल्ला झाला आणि मुंबई हादरली होती. आजच्या भारतात सीमेपलीकडून कोणतीही दहशतवादी घटना घडली तर आम्ही उरीसारखी प्रतिक्रिया देतो, असे एस जयशंकर यांनी सांगितले. 

याचबरोबर, सीमावर्ती भागातील जिल्ह्यांमध्ये सुरक्षा मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक नागरिकाला त्याचे महत्त्व माहीत आहे. देशाच्या उत्तर सीमेवर आपले जवान तैनात असल्यामुळेच आपल्याला सुरक्षित वाटते. हवामानासह सर्व प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या जवानांनी देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्या आहेत, असे एस जयशंकर म्हणाले.

पूर्वीचे आणि आजचे नेतृत्व यात खूप मोठा फरक आहे. आता मोदींचे नेतृत्व आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली १० वर्षांत सर्वात मोठा बदल झाला आहे. आज देश खंबीर नेतृत्वाच्या हाती आहे आणि निर्णयांमध्ये पूर्ण स्पष्टता आहे. योग्य निर्णयांमुळेच त्यांचे योग्य पालन करणे आपल्यासाठी सोपे होते. आज कोणतीही कारवाई करताना आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कारण आम्हाला १०० टक्के पाठिंबा मिळेल, हे आम्हाला माहीत आहे, असेही एस. जयशंकर म्हणाले.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाcongressकाँग्रेस