शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

15 वर्षांनी संपणार भाजपाचा वनवास, उत्तरप्रदेशात सत्ता मिळण्याचा सर्व्हेचा अंदाज

By admin | Updated: January 5, 2017 09:48 IST

इंडिया टुडे - अॅक्सिसच्या सर्व्हेनुसार राजकारणात अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणा-या उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 5 - उत्तरप्रदेशासहित पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. सर्व राज्यांमधील निवडणुका महत्वाच्या असल्या तरी सर्वांचं लक्ष लागून आहे ते उत्तरप्रदेशाकडे. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार गेल्या 15 वर्षांपासून भाजपाचा सुरु असलेला वनवास यावेळी संपण्याची शक्यता आहे. इंडिया टुडे - अॅक्सिसच्या सर्व्हेनुसार राजकारणात अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणा-या उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे. भाजपाच्या खात्यात 206 ते 216 जागा जमा होण्याची शक्यता आहे. एकूण मतदारांपैकी एक तृतीयांश मतदारांचं समर्थनही मिळू शकतं.उत्तरप्रदेशात 403 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 मार्चला निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. 
 
(CM से PM तक, उत्तरप्रदेशची दंगल कोण जिंकणार ?)
(UP मध्ये अखिलेशना सर्वाधिक पसंती, पण विधानसभा त्रिशंकू - सर्वे)
 
इंडिया टुडे - अॅक्सिसचा हा सर्व्हे 12 ते 24 डिसेंबर दरम्यान करण्यात आला. सर्व्हेनुसार एकीकडे भाजपाला 206 ते 216 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तिकडे दुसरीकडे समाजवादी पक्ष दुस-या स्थानावर आहे. कौटुंबिक वादात अडकलेल्या समाजवादी पक्षआला 92 ते 97 जागा मिळू शकतात. बहुजन समाज पक्षाला 79 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला दोन अंकी आकडाही पार करणं कठीण होणार आहे. काँग्रेसच्या खात्यात पाच  ते नऊ जागा जमा होऊ शकतात. मतदानाच्या टक्क्यांबद्दल बोलायला गेल्यास सर्व्हेनुसार भाजपाला 33 टक्के, बसपा आणि सपाला 26-26 टक्के, काँग्रेसला सहा टक्के आणि इतरांनी नऊ टक्के मतं मिळू शकतात. 
 
(पाच राज्यांमधील निवडणुका जाहीर)
 
कोण होणार आदर्श मुख्यमंत्री - 
सर्व्हेत सहभागी होणा-या अनेकांनी अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. 33 टक्के लोक अखिलेश यादव चांगले मुख्यमंत्री असल्याचं बोलले आहेत. 25 टक्के लोकांनी मायावतींना, 22 टक्के लोकांनी राजनाथ सिंह तर 18 टक्के लोकांनी आदित्यनाथ चांगले मंत्री असल्याचं सांगितलं आहे. सर्व्हेनुसार प्रियंका गांधी, मुलायम सिंह यादव आणि वरुण गांधी यांना मुख्यमंत्रीपदासाठी फक्त एक टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. 
 
कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर लोकांची मायावतींना पसंती आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या 48 टक्के लोकांनी मायावती कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत उत्तम असल्याचं सांगितलं. तर 28 टक्के लोकांनी अखिलेश आणि 23 टक्के लोकांनी राजनाथ सिंह यांना पसंती दर्शवली आहे. फक्त एक टक्का लोकांनी मुलायम सिंह यांना पसंती दाखवली. 
 
भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा ?
भाजपाने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा का ? या प्रश्नावर जास्तीत जास्त लोकांचं हो असंच उत्तर आहे. 69 टक्के लोकांनी भाजपाने उमेदवार जाहीर करावा असं वाटत आहे. तर 24 टक्के लोक भाजपाने असं करु नये सांगत आहेत. 
 
सर्वात मोठा निवडणूक मुद्दा - 
या निवडणुकीत विकासाचा मुद्दा मुख्य मुद्दा असेल असं 45 टक्के लोकांना वाटत आहे. 18 टक्के लोकांना वीज - रस्ते हे मुद्दे मोठे वाटत आहेत. 15 टक्के लोकांनी बेरोजगारीचा, तर सहा टक्के लोकांनी बदल हा मुख्य मुद्दा असल्याचं सांगितलं आहे. फक्त तीन टक्के लोकांनी कायदा - सुव्यवस्था मुद्दा मोठा असल्याचं सांगितलं आहे. तर फक्त चार टक्के लोक भ्रष्टाराच्या मुद्यावर बोलले आहेत.