शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

Explainer : ३ राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही CMपदाच्या नावांना उशीर; हे आहे सर्वात मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 16:38 IST

विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतरही भाजपकडून मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर का होत नाहीत, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

देशातील पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपला पुन्हा 'अच्छे दिन' आले आहेत. कारण भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांत काँग्रेसच्या ताब्यातील सत्ता खेचून आणण्यात आणि मध्य प्रदेशात आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे. मात्र निवडणूक निकाल जाहीर होऊन तीन दिवस उलटून गेल्यानंतरही भाजपने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना आणि केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखले जाणारे नेते असतानाही भाजपकडून मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर का होत नाहीत, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या विलंबामागे जी काही कारणे आहेत, त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका हे सर्वांत महत्त्वाचं कारण असण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांना बहुमताचा आकडा पार करण्याची किमया साधली. हीच कामगिरी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्याचं आव्हान पक्षासमोर आहे. त्यादृष्टीने भाजपने तयारी सुरू केली असून केंद्र सरकारच्या योजना घराघरात पोहोचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत ज्या राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे, त्या राज्यांमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत मिळून लोकसभेच्या ६५ जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यातील तब्बल ६२ जागा जिंकल्या होत्या. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा मानस आहे. त्यामुळेच या तीनही राज्यांत मुख्यमंत्र्यांची निवड करताना भाजपकडून सावध पावलं टाकली जात आहेत. 

लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या जास्तीत जास्त निवडून आणू शकेल, असे चेहरे या राज्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून देण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, राजस्थानात वसुंधराराजे आणि छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वांचा पर्याय असतानाही भाजपकडून इतर नेत्यांच्या नावाचाही मुख्यमंत्रिपदासाठी विचार केला जात असल्याचे समजते.

राजस्थानात काय आहे स्थिती?

राजस्थानात वसुंधराराजे या गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं नेतृत्व करत आहेत. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी वसुंधराराजे यांचं फारसं सख्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असते. यामुळेच वसुंधराराजे यांना विधानसभा निवडणूक प्रचारावेळी पक्षाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणं भाजपनं टाळलं होतं. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी वसुंधराराजे यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू असली तरी मोदी-शहा त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवराजसिंह चौहानांबाबत काय होणार?

शिवराजसिंह चौहान यांनी जवळपास २० वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. मध्य प्रदेशात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांचे मागील काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही मुद्द्यांवरून मतभेद झाल्याचं बोललं जात होतं. त्याचाच परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचार यंत्रणा राबवत असताना भाजपकडून 'मोदी के मन मे एमपी और एमपी के मन मे मोदी' असं म्हणत संपूर्ण प्रचार मोदी यांच्या भोवतीच फिरेल, यासाठी प्रयत्न केला जात होता. मात्र निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसं कसलेले राजकारणी असलेल्या शिवराजसिंह यांनी आपल्या सत्ताकाळात राबवलेल्या योजनांचे मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग करत आपल्याला मुख्य प्रवाहापासून वेगळं केलं जाणार नाही, याची दक्षता घेतल्याचं बघायला मिळालं. त्यातच भाजपला १६३ जागांसह प्रचंड बहुमत मिळाल्याने शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवणं मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी तितकसं सोपं असणार नाही. त्यामुळे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा चौहान हेच विराजमान होणार की मोदी-शहा धक्कातंत्राचा वापर करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक