शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

Explainer : ३ राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही CMपदाच्या नावांना उशीर; हे आहे सर्वात मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 16:38 IST

विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतरही भाजपकडून मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर का होत नाहीत, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

देशातील पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपला पुन्हा 'अच्छे दिन' आले आहेत. कारण भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांत काँग्रेसच्या ताब्यातील सत्ता खेचून आणण्यात आणि मध्य प्रदेशात आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे. मात्र निवडणूक निकाल जाहीर होऊन तीन दिवस उलटून गेल्यानंतरही भाजपने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना आणि केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखले जाणारे नेते असतानाही भाजपकडून मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर का होत नाहीत, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या विलंबामागे जी काही कारणे आहेत, त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका हे सर्वांत महत्त्वाचं कारण असण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांना बहुमताचा आकडा पार करण्याची किमया साधली. हीच कामगिरी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्याचं आव्हान पक्षासमोर आहे. त्यादृष्टीने भाजपने तयारी सुरू केली असून केंद्र सरकारच्या योजना घराघरात पोहोचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत ज्या राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे, त्या राज्यांमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत मिळून लोकसभेच्या ६५ जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यातील तब्बल ६२ जागा जिंकल्या होत्या. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा मानस आहे. त्यामुळेच या तीनही राज्यांत मुख्यमंत्र्यांची निवड करताना भाजपकडून सावध पावलं टाकली जात आहेत. 

लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या जास्तीत जास्त निवडून आणू शकेल, असे चेहरे या राज्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून देण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, राजस्थानात वसुंधराराजे आणि छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वांचा पर्याय असतानाही भाजपकडून इतर नेत्यांच्या नावाचाही मुख्यमंत्रिपदासाठी विचार केला जात असल्याचे समजते.

राजस्थानात काय आहे स्थिती?

राजस्थानात वसुंधराराजे या गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं नेतृत्व करत आहेत. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी वसुंधराराजे यांचं फारसं सख्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असते. यामुळेच वसुंधराराजे यांना विधानसभा निवडणूक प्रचारावेळी पक्षाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणं भाजपनं टाळलं होतं. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी वसुंधराराजे यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू असली तरी मोदी-शहा त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवराजसिंह चौहानांबाबत काय होणार?

शिवराजसिंह चौहान यांनी जवळपास २० वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. मध्य प्रदेशात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांचे मागील काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही मुद्द्यांवरून मतभेद झाल्याचं बोललं जात होतं. त्याचाच परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचार यंत्रणा राबवत असताना भाजपकडून 'मोदी के मन मे एमपी और एमपी के मन मे मोदी' असं म्हणत संपूर्ण प्रचार मोदी यांच्या भोवतीच फिरेल, यासाठी प्रयत्न केला जात होता. मात्र निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसं कसलेले राजकारणी असलेल्या शिवराजसिंह यांनी आपल्या सत्ताकाळात राबवलेल्या योजनांचे मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग करत आपल्याला मुख्य प्रवाहापासून वेगळं केलं जाणार नाही, याची दक्षता घेतल्याचं बघायला मिळालं. त्यातच भाजपला १६३ जागांसह प्रचंड बहुमत मिळाल्याने शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवणं मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी तितकसं सोपं असणार नाही. त्यामुळे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा चौहान हेच विराजमान होणार की मोदी-शहा धक्कातंत्राचा वापर करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक