शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

Ladakh Standoff: ...म्हणून चीनच्या सैन्याने घेतली माघार; आंतरराष्ट्रीय तज्ञांनी सांगितले तीन प्रमुख कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 11:34 IST

कोरोना व्हायरमुळे जगभरातील अनेक महत्वाचे देश चीनवर दबाव टाकत आहे.

नवी दिल्ली:  लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैन्य सीमेपासून काही अंतरावर मागे हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे सैनिक सीमेपासून दोन किलोमीटर मागे हटले आहेत. तर भारतीय लष्कराचे जवान आपल्या जागेपासून एक किलोमीटर मागे हटले आहेत. 

५ मे रोजी चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीने (PLA)या भागात आक्रमक भूमिका घेतली होती. पण तीन-चार दिवसांपासून या भागात चिनी सैनिकांकडून कुठल्याही हालचाली होत नाहीए. ते शांत आहेत. ज्या भागात चिनी सैनिकांनी अतिक्रमण केले होते तिथूनही त्यांनी मागे हटण्यास सुरुवात केलीय, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र चीनने माघार घेण्यामागे तीन प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय प्रकरणातील तज्ञ कमर आगा यांनी सांगितले की, चीनचे सैनिक सीमेपासून दोन किलोमीटर हटण्यामागे तीन प्रमुख कारण आहे. यामध्ये भारतीय सैनिकांनी दिलेलं चोख प्रत्युत्तर हे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दूसरे कारण म्हणजे कोरोना व्हायरसमुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. त्यामुळे चीनमधील नागरिकांमध्ये बेरोजगारी व असंतोषाचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांचे या सर्व प्रकरणातून दूसरीकडे लक्ष वेदण्यासाठी चीन सरकार राष्ट्रवादाचे कार्ड वापरत आहे. अमेरिकेमुळे तैवान आणि दक्षिण चीन समुद्रात काहीही करता येत नसल्याने चीनने भारताविरूद्ध दबाव वाढवायला सुरूवात केली असल्याचे कमर आगा यांनी सांगितले.

कमर आगा म्हणाले की, कोरोना व्हायरमुळे जगभरातील अनेक महत्वाचे देश चीनवर दबाव टाकत आहे. हे लडाखच्या गलवान खोऱ्यातील चीनच्या सैनिकांनी माघार घेण्याचे तीसरं कारण आहे. दक्षिण चीन समुद्र, कोरोना आणि व्यापाराच्या बाबतीत चीन अमेरिकेबरोबर युद्ध करीत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सामर्थ्यशाली देशांच्या गट -7 चा समावेश करण्यासाठी भारताचा विस्तार करण्याचे संकेत दिले आहेत. एवढेच नाही तर जपान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया आणि तैवान चीनच्या विस्तारवादी धोरणाला सतत विरोध करत आहेत. त्यामुळे जगातील परिस्थिती पाहता सर्वात मोठी सेनापैकी एक असणाऱ्या भारतासोबत युद्ध करणं परवडणार नाही. त्याचप्रमाणे चीनलाही भारतीय बाजार गमावायचा नाही, म्हणूनच चीनने आक्रमक भूमिका सोडली असल्याचे कमर आगा यांनी सांगितले.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाखAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प