शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

माजी नोकरशहांनी लिहिलं राष्ट्रपतींना पत्र, निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर व्यक्त केली चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 11:50 AM

देशात निपक्ष:पाती चौकशी आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची भूमिका यावर चिंता व्यक्त करणारे 66 माजी नोकरशहांनी लिहिलेलं पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलं आहे. 

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीला घेऊन राजकीय पक्षांच्या प्रचाराला रंगत आली आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच निवडणूक आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीही एकमेकांच्याविरोधात देत आहेत. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी येत निवडणूक आयोगाकडे येत असताना त्या तक्रारींची निपक्ष:पाती चौकशी व्हावी ही मोठी जबाबदारी निवडणूक आयोगाला पार पाडावी लागणार आहे. मात्र देशात निपक्ष:पाती चौकशी आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची भूमिका यावर चिंता व्यक्त करणारे 66 माजी नोकरशहांनी लिहिलेलं पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलं आहे. 

66 माजी नोकरशहा वर्गाने देशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र आचारसंहितेचे पालन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. या नोकरशहांनी लिहलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की, ऑपरेशन शक्ती दरम्यान अॅन्टी सॅटेलाईट मिसाइलचं यशस्वी परीक्षणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना भाषण केले. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी बायोपिक आला. मोदी यांच्या योजनांची माहिती देणाऱ्या वेबसिरीज आणि मालिका आल्या. भाजपाच्या अनेक नेत्यांची वादग्रस्त विधाने ज्यावर निवडणूक आयोगाकडे अनेक आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आल्या मात्र त्यावर निवडणूक आयोगाकडून दिखाव्यापुरती कारवाई करण्यात येतेय असं या पत्रात नमूद केलं आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहणाऱ्यांमध्ये माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन, दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग, पंजाबचे माजी डीजीपी जुलिरो रिबेरो, प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार आणि ट्रायचे माजी चेअरमन राजीव खुल्लर यांच्यासारख्या माजी नोकरशहांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्ष आणि केंद्र सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग आणि मनमानी पद्धतीने आचारसंहितेचं उल्लंघन करण्याचं काम होत आहे. त्यांच्या अशा कारभारामुळे निवडणूक आयोगाची कोणत्याही प्रकारची भिती त्यांच्या मनात नाही असा आरोप पत्रात केला आहे. पीएम नरेंद्र मोदी यांचा बायोपिक, चहाच्या कपवर मै भी चौकीदार असा उल्लेख तर मालिकांमधून मोदींच्या योजनेचा प्रचार या माध्यमातून होणाऱ्या आचारसंहितेचं उल्लंघन थांबविण्याची मागणी माजी नोकरशहांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून केली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारतElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग