शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सगळे पैशांत न्हाऊन निघाले! या दोन बड्या पक्षांना एकही इलेक्टोरल बाँड मिळाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 09:37 IST

निवडणूक आयोगाने रविवारी विविध राजकीय पक्षांद्वारे सोपविण्यात आलेल्या बंद लिफाफ्यांबाबत खुलासा केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँडवर कठोर भूमिका घेतल्यावर आता हे प्रकरण शेकण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांनी वेगवेगळी कारणे सांगून हात वर करण्यास सुरुवात केली आहे. यात पहिला नंबर पलटूराम म्हणून प्रसिद्ध असलेल्या नितिशकुमारांच्या पक्षाचा लागला आहे. या पक्षाला २४ कोटी रुपये इलेक्ट्रोरल बाँडमधून मिळाल्याचे जगजाहीर झाल्यानंतर आयोगाला १० कोटी कुठून आले त्याचे हास्यास्पद कारण दिले आहे. दुसरा नंबर सपाचा लागला आहे. परंतू, असे दोन महत्वाचे पक्ष आहेत ज्यांना एकही इलेक्टोरल बाँड मिळालेला नाही. 

निवडणूक आयोगाने रविवारी विविध राजकीय पक्षांद्वारे सोपविण्यात आलेल्या बंद लिफाफ्यांबाबत खुलासा केला आहे. यामध्ये जदयूला २४ कोटी रुपये बाँडद्वारे मिळाल्याचे म्हटले आहे. यामध्ये भारती एअरटेल आणि श्री सिमेंटकडून अनुक्रमे १ कोटी आणि २ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड मिळाल्याचे जदयूने म्हटले आहे. ३ एप्रिल २०१९ ला कोणीतरी कार्यालयात येऊन लिफाफा दिला, तो उघडून पाहिला असता त्यात १० कोटींचे बाँड होते, असे जदयूने म्हटले आहे. हे दान कोणी दिले माहिती नाही. पक्षाकडे याची माहिती नाही आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा असा काही आदेश नसल्याने आम्ही ते माहितही करून घेतले नाही, असे जदयूने म्हटले आहे. 

दुसरे हास्यास्पद कारण अखिलेश यादवांच्या सपाने दिले आहे. पोस्टाने आम्हाला १० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे प्राप्त झाल्याचे सपाने म्हटले आहे. इलेक्टोरल बाँडचा एकही रुपया न मिळालेले दोन पक्ष म्हणजे मायावती यांचा बसपा आणि सीपीआयएम हे आहेत. या दोन्ही पक्षांना एकही बाँड मिळालेला नाही. 

दरम्यान, इलेक्टोरल बाँडचे प्रकरण भाजपाला शेकण्याची चिन्हे असताना आता आरएसएस मदतीला धावून आली आहे. सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांनी इलेक्टोरल बाँड हा एक ईव्हीएमसारखाच प्रयोग असल्याचे म्हटले आहे. आज अचानक इलेक्टोरल बाँड्स आणले गेले असे नाही. ते आधीही आणले होते. जेव्हा जेव्हा बदल केला जातो तेव्हा प्रश्न उपस्थित केले जातात. ईव्हीएम सुरू केल्यावरही प्रश्न उपस्थित झाले होते. ते स्वाभाविक आहे, असे होसाबळे म्हणाले आहेत.  

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय