शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 12:50 IST

केंद्र सरकारने अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानी नागरिकांचे परतणे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत हा आदेश लागू राहील, असं सांगण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उच्चस्तरीय बैठका घेतल्या. सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती, ही मुदत आता संपली आहे. यानंतरही केंद्र सरकारने अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानी नागरिकांचे परतणे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत ३० एप्रिलपर्यंत निश्चित करण्यात आली होती. पण, आता पुन्हा मुदत वाढवली आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईनंतर सहा दिवसात ५५ राजदूत आणि सहाय्यक कर्मचारी यांच्यासह ७८६ पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून भारताबाहेर पडले आहेत. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. यासह पाकिस्तानी व्हिसा असलेले आठ जण पाकिस्तानमध्ये गेले आहेत.

भारतानं एअरस्पेस बंद केल्याने पाकिस्तानला मोठा फटका; 'या' देशांमध्ये जाण्यासाठी लागणार आणखी वेळ

२४ एप्रिलपासून, २५ राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह एकूण १,४६५ भारतीय पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानातून भारतात आले आहेत. याशिवाय, दीर्घकालीन भारतीय व्हिसा असलेले १५१ पाकिस्तानी नागरिकही भारतात आले आहेत.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानशी संबंधित दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केल्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 'भारत सोडा' नोटीस बजावली होती.

शेवटची तारीख २९ एप्रिल होती

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या व्हिसा धारकांसाठी भारत सोडण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल होती. वैद्यकीय व्हिसा धारकांसाठी देश सोडण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल होती. इतर १२ श्रेणीतील व्हिसा धारकांसाठी देश सोडण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल होती. या श्रेणींमध्ये आगमनानंतरचा व्हिसा आणि व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, ट्रान्झिट, कॉन्फरन्स, पर्वतारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, गट पर्यटक, तीर्थयात्री आणि गट तीर्थयात्री व्हिसा यांचा समावेश आहे.

२९ एप्रिल रोजी १० राजदूतांसह एकूण ९४ पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून भारताबाहेर पडले, असे अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी ३६ राजदूत, त्यांचे अवलंबित आणि सहाय्यक कर्मचारी असे १४५ पाकिस्तानी भारत सोडून गेले आणि २७ एप्रिल रोजी नऊ राजदूत आणि अधिकाऱ्यांसह एकूण २३७ पाकिस्तानी आणि २६ एप्रिल रोजी ८१, २५ एप्रिल रोजी १९१ आणि २४ एप्रिल रोजी २८ पाकिस्तानी भारत सोडून गेले.

२९ एप्रिल रोजी पाकिस्तानी व्हिसावर असलेले आठ भारतीय नागरिकही आंतरराष्ट्रीय सीमा क्रॉसिंग पॉइंटवरून भारतातून बाहेर पडले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला