शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

अखेर केरळमधील शाळेची घंटा वाजली, पंधरवड्यानंतर शाळा अन् महाविद्यालये पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 6:38 AM

विमाने व प्रवाशांनी कोची विमानतळही गजबजला

तिरुवनंतपुरम : पुराच्या थैमानामुळे मोठी हानी झालेल्या केरळमध्ये आता स्थिती काहीशी पूर्वपदावर येत असून तिथे पंधरवड्यानंतर शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु झाली. पुराचे पाणी घुसल्याने १४ आॅगस्टपासून बंद असलेला कोची विमानतळही सुरू झाला असून तेथे दुपारी दोन वाजता पहिले विमान उतरले.

घरे उद्धवस्त झाल्याने १० लाखांहून अधिक लोक विस्थापीत झाले. त्यांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयांत जाणेही शक्य नव्हते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तसेच पुराचे पाणी ओसरल्यानंतर राज्यातील शाळा, कॉलेजांची सफाई मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. पाणी घुसल्याने अनेक शाळांच्या इमारतींचे व आतील फर्निचर तसेच पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.शिक्षणमंत्री प्रा. सी. रवींद्रनाथ यांनी सांगितले की, पुरामुळे राज्यातील ६५० शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील काही शाळा उघडण्यास अजूनही उशीर लागणार असल्याने निवारा शिबिरांमध्येच मुलांचे वर्ग घेतले जात आहेत. मात्र येत्या ३ सप्टेंबरपासून सर्व शाळा पूर्वीप्रमाणेच सुरू होतील. अजूनही १.५ लाख विद्यार्थी निवारा शिबिरांमध्येच राहात आहेत. पुरामुळे ज्या मुलांची पाठ्यपुस्तके व गणवेश पूर्णपणे खराब झाले असतील किंवा हरवले असतील त्यांना ते नवे दिले जातील, असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे. बंद असलेल्या कोची विमानतळावर बुधवारी पहिले विमान दुपारी दोन वाजता उतरले. ते होते अहमदाबाद ते कोची या मार्गावरील इंडिगो कंपनीचे. त्यानंतर विमानांची नियमित ये-जा सुरु झाली.पूरग्रस्तांना केंद्राची मदत अपुरी - राहुलकेरळमधील पूरग्रस्तांना पुरेशी मदत न दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, यूएईकडून केरळला मदत मिळण्याची शक्यता असून ती स्वीकारावी असे आपले मत आहे. जर पूरग्रस्तांना कोणी विनाशर्त मदत करत असेल तर ती घ्यायला काहीच हरकत नाही. राहुल गांधी केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. पुरेशी मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस केंद्र सरकारवर दबाव आणेल असेही त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना सांगितले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळSchoolशाळा