शस्त्रसंधी केवळ दोन आठवड्यांची असली तरी युद्धविरामाचा भारताला फायदा, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 09:44 IST2026-04-09T09:43:44+5:302026-04-09T09:44:13+5:30
भारताकडून या युद्धविरामाचे स्वागत

शस्त्रसंधी केवळ दोन आठवड्यांची असली तरी युद्धविरामाचा भारताला फायदा, वाचा सविस्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ८ एप्रिल २०२६ रोजी जाहीर झालेल्या अमेरिका-इराण युद्धविरामाचे भारतासाठी अनेक सकारात्मक परिणाम झाले आहेत. यामुळे केवळ ऊर्जा सुरक्षाच नव्हे तर आर्थिक स्थैर्यालाही दिलासा मिळाला आहे. ही शस्त्रसंधी केवळ दोन आठवड्यांची असली तरी, भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि ऊर्जा सुरक्षेवर पडलेला ताण तात्पुरता का होईना, पण नक्कीच कमी झाला आहे. भारताने या युद्धविरामाचे स्वागत करत 'संवाद आणि मुत्सद्देगिरी' या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. यामुळे भारताच्या 'तटस्थ' आणि 'शांतताप्रिय' प्रतिमेला बळ मिळाले आहे.
ऊर्जा आणि इंधन पुरवठ्यात सुधारणा
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली: इराणने 'होर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा खुली करण्यास सहमती दिल्याने भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. भारताच्या ९०% एलपीजी आणि सुमारे ६०% कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते.
तेल आणि गॅसचा साठा : युद्धामुळे एलपीजी आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला होता. आता ४ एलपीजी, ३ एलएनजी आणि १० क्रूड ऑइल टँकर्स भारताच्या दिशेने येण्यास मार्ग मोकळा झाला आहे.
आर्थिक स्थैर्य आणि शेअर बाजार
कच्च्या तेलाच्या किमतीत घट: युद्धविरामाच्या बातमीने जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत १०० डॉलर्सवरून घसरून ९३.८७ डॉलर्स प्रति बॅरल वर आली आहे. यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याचा धोका कमी झाला आहे.
शेअर बाजारात तेजी: शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
निर्यात आणि व्यापार
लॉजिस्टिक्स खर्च कमी : युद्धामुळे विम्याचे दर आणि मालवाहतुकीचा खर्च प्रचंड वाढला होता. आता मार्ग सुरक्षित झाल्याने हा खर्च कमी होईल, ज्याचा फायदा भारतीय निर्यातदारांना होईल. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनने याचे स्वागत केले आहे.