शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

असे उदगार तर शत्रू राष्ट्रही काढत नाही, मोदींबाबतच्या त्या विधानावरून भाजपाचा राहुल गांधीवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 16:35 IST

राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांना सरेंडर मोदी अशी उपमा दिल्याने भाजपाचा तीळपापड झाला आहे.

ठळक मुद्देजपान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी अशी उपमा दिली होतीराहुल गांधींचे हे विधान लाजिरवाणे असून, राहुल गांधी जी भाषा बोलत आहेत, तशी भाषा शत्रूराष्ट्राचे नेतेही वापरत नाहीत, असा टोला भाजपाने लगावला राहुल गांधी हे मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. ते देशाचा अपमान करत आहेत. ही बाब देशाची जनता खपवून घेणार नाही

नवी दिल्ली - एकीकडे लडाखमध्ये चीनची घुसखोरी आणि चिनी सैनिकांसोबतच्या झटापटीत २० जवानांना वीरमरण आल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे राजधानीमध्ये चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये दररोज आरोप प्रत्यारोपांचे नवनवे अंक सादर होत आहेत. आज राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांना सरेंडर मोदी अशी उपमा दिल्याने भाजपाचा तीळपापड झाला आहे. राहुल गांधींचे हे विधान लाजिरवाणे असून, राहुल गांधी जी भाषा बोलत आहेत, तशी भाषा शत्रूराष्ट्राचे नेतेही वापरत नाहीत, असा टोला भाजपाने लगावला आहे.

जपान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी अशी उपमा दिली होती.  त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. ‘’राहुल गांधी हे मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. ते देशाचा अपमान करत आहेत. ही बाब देशाची जनता खपवून घेणार नाही. राहुल गांधी ज्या प्रकारची भाषा बोलत आहेत. तशी भाषा शत्रू राष्ट्रांचे नेतेसुद्धा बोलू शकत नाही. भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाल्यापासून राहुल गांधी दररोज पंतप्रधानांचा अवमान करत आहेत. तसेच ते ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा देशातील जनता काँग्रेसला कधी माफ करणार नाही.’’ असे शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले.  

दरम्यान, राहुल गांधींच्या आक्रमक टीकेनंतर भाजपाचे अनेक नेते त्यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. आसाम सरकारमध्ये मंत्री असलेल्या हेमंत बिस्वा शर्मा यांनीही राहुल गांधींनी टोला लगावला आहे. राहुल गांधी, तुम्ही एवढे निराश झाला आहात की, तुम्हाला व्यवस्थित लिहिताही येत नाही आहे. आत्मसमर्पण करणे हा गांधी-नेहरू परिवाराचा हॉलमार्क आहे. १९६२ मध्ये पंडित नेहरू यांनी आसाम चीनला जवळपास देऊनच टाकला होता. जेव्हा चीनने बोमडिलावर कब्जा केला तेव्हा माझे हृदय आसामी लोकांसाठी रडत आहे, असे नेहरूंनी म्हटले होते, असा आरोप हेमंत बिस्वा शर्मा यांनी केला.

  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

टॅग्स :IndiaभारतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण