शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

असे उदगार तर शत्रू राष्ट्रही काढत नाही, मोदींबाबतच्या त्या विधानावरून भाजपाचा राहुल गांधीवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 16:35 IST

राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांना सरेंडर मोदी अशी उपमा दिल्याने भाजपाचा तीळपापड झाला आहे.

ठळक मुद्देजपान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी अशी उपमा दिली होतीराहुल गांधींचे हे विधान लाजिरवाणे असून, राहुल गांधी जी भाषा बोलत आहेत, तशी भाषा शत्रूराष्ट्राचे नेतेही वापरत नाहीत, असा टोला भाजपाने लगावला राहुल गांधी हे मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. ते देशाचा अपमान करत आहेत. ही बाब देशाची जनता खपवून घेणार नाही

नवी दिल्ली - एकीकडे लडाखमध्ये चीनची घुसखोरी आणि चिनी सैनिकांसोबतच्या झटापटीत २० जवानांना वीरमरण आल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे राजधानीमध्ये चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये दररोज आरोप प्रत्यारोपांचे नवनवे अंक सादर होत आहेत. आज राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांना सरेंडर मोदी अशी उपमा दिल्याने भाजपाचा तीळपापड झाला आहे. राहुल गांधींचे हे विधान लाजिरवाणे असून, राहुल गांधी जी भाषा बोलत आहेत, तशी भाषा शत्रूराष्ट्राचे नेतेही वापरत नाहीत, असा टोला भाजपाने लगावला आहे.

जपान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी अशी उपमा दिली होती.  त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. ‘’राहुल गांधी हे मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. ते देशाचा अपमान करत आहेत. ही बाब देशाची जनता खपवून घेणार नाही. राहुल गांधी ज्या प्रकारची भाषा बोलत आहेत. तशी भाषा शत्रू राष्ट्रांचे नेतेसुद्धा बोलू शकत नाही. भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाल्यापासून राहुल गांधी दररोज पंतप्रधानांचा अवमान करत आहेत. तसेच ते ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा देशातील जनता काँग्रेसला कधी माफ करणार नाही.’’ असे शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले.  

दरम्यान, राहुल गांधींच्या आक्रमक टीकेनंतर भाजपाचे अनेक नेते त्यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. आसाम सरकारमध्ये मंत्री असलेल्या हेमंत बिस्वा शर्मा यांनीही राहुल गांधींनी टोला लगावला आहे. राहुल गांधी, तुम्ही एवढे निराश झाला आहात की, तुम्हाला व्यवस्थित लिहिताही येत नाही आहे. आत्मसमर्पण करणे हा गांधी-नेहरू परिवाराचा हॉलमार्क आहे. १९६२ मध्ये पंडित नेहरू यांनी आसाम चीनला जवळपास देऊनच टाकला होता. जेव्हा चीनने बोमडिलावर कब्जा केला तेव्हा माझे हृदय आसामी लोकांसाठी रडत आहे, असे नेहरूंनी म्हटले होते, असा आरोप हेमंत बिस्वा शर्मा यांनी केला.

  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

टॅग्स :IndiaभारतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण