शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

असे उदगार तर शत्रू राष्ट्रही काढत नाही, मोदींबाबतच्या त्या विधानावरून भाजपाचा राहुल गांधीवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 16:35 IST

राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांना सरेंडर मोदी अशी उपमा दिल्याने भाजपाचा तीळपापड झाला आहे.

ठळक मुद्देजपान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी अशी उपमा दिली होतीराहुल गांधींचे हे विधान लाजिरवाणे असून, राहुल गांधी जी भाषा बोलत आहेत, तशी भाषा शत्रूराष्ट्राचे नेतेही वापरत नाहीत, असा टोला भाजपाने लगावला राहुल गांधी हे मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. ते देशाचा अपमान करत आहेत. ही बाब देशाची जनता खपवून घेणार नाही

नवी दिल्ली - एकीकडे लडाखमध्ये चीनची घुसखोरी आणि चिनी सैनिकांसोबतच्या झटापटीत २० जवानांना वीरमरण आल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे राजधानीमध्ये चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये दररोज आरोप प्रत्यारोपांचे नवनवे अंक सादर होत आहेत. आज राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांना सरेंडर मोदी अशी उपमा दिल्याने भाजपाचा तीळपापड झाला आहे. राहुल गांधींचे हे विधान लाजिरवाणे असून, राहुल गांधी जी भाषा बोलत आहेत, तशी भाषा शत्रूराष्ट्राचे नेतेही वापरत नाहीत, असा टोला भाजपाने लगावला आहे.

जपान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी अशी उपमा दिली होती.  त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. ‘’राहुल गांधी हे मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. ते देशाचा अपमान करत आहेत. ही बाब देशाची जनता खपवून घेणार नाही. राहुल गांधी ज्या प्रकारची भाषा बोलत आहेत. तशी भाषा शत्रू राष्ट्रांचे नेतेसुद्धा बोलू शकत नाही. भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाल्यापासून राहुल गांधी दररोज पंतप्रधानांचा अवमान करत आहेत. तसेच ते ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा देशातील जनता काँग्रेसला कधी माफ करणार नाही.’’ असे शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले.  

दरम्यान, राहुल गांधींच्या आक्रमक टीकेनंतर भाजपाचे अनेक नेते त्यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. आसाम सरकारमध्ये मंत्री असलेल्या हेमंत बिस्वा शर्मा यांनीही राहुल गांधींनी टोला लगावला आहे. राहुल गांधी, तुम्ही एवढे निराश झाला आहात की, तुम्हाला व्यवस्थित लिहिताही येत नाही आहे. आत्मसमर्पण करणे हा गांधी-नेहरू परिवाराचा हॉलमार्क आहे. १९६२ मध्ये पंडित नेहरू यांनी आसाम चीनला जवळपास देऊनच टाकला होता. जेव्हा चीनने बोमडिलावर कब्जा केला तेव्हा माझे हृदय आसामी लोकांसाठी रडत आहे, असे नेहरूंनी म्हटले होते, असा आरोप हेमंत बिस्वा शर्मा यांनी केला.

  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

टॅग्स :IndiaभारतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण