शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

जीव गेले तरीही गर्दी हटेना, जास्त गर्दीमुळे परिस्थिती हाताळणे अधिकाऱ्यांना जमेना; भाविकांचा ओघ थांबता थांबेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 09:18 IST

या अव्यवस्थेची जबाबदारी अखेर कुणाची?

नवी दिल्ली : शनिवारी रात्री दिल्ली स्टेशनवर शेकडो भाविक प्रयागराज रेल्वेची वाट पाहत उभे असताना गाडीचा फलाट बदलल्याच्या उद्घोषणेमुळे घात झाला आणि पळापळीत १८ जणांचे जीव गेले. फलाट बदलाचे कारण जीवघेणे ठरले आहे.

चेंगराचेंगरीच्या एका दिवसानंतर, हजारो प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. योग्य नियोजन नसल्याने महाकुंभला जाणारे भाविक स्टेशनवर ताटकळत उभे होते. अतिरिक्त उपाय करूनही भाविकांचा ओघ सुरूच आहे. त्यापैकी बहुतेक महाकुंभ यात्रेकरू प्रयागराजला जात आहेत. जास्त गर्दीमुळे परिस्थिती हाताळणे अधिकाऱ्यांना कठीण झाले आहे.

फाटलेल्या बॅगांचे साक्षीदार

फलाट १४ आणि १५ एका भयंकर घटनेचे साक्षीदार ठरले. या फलाटांवर विखुरलेल्या चपला-बूट, फाटलेल्या बॅगा, खाण्याचे पदार्थ यांचा खच पाहणाऱ्यांचे मन हेलावून गेले होते. हे साहित्य रविवारी सकाळपर्यंत कर्मचाऱ्यांनी हलवले, परंतु या घटनेने प्रत्येकाच्या मनात कोरलेल्या भयंकर खुणा कधीच न मिटणाऱ्या ठरल्या.

पत्नी, मुलगी ठार, पण...

राजकुमार मांझीने त्याच्यावर कोसळलेल्या दु:खाची आपबीती सांगितली. राजकुमारची पत्नी आणि मुलगी या चेंगराचेंगरीत मारली गेली. मुलगा वाचला खरा, परंतु तो रविवारी उशिरापर्यंत सापडला नव्हता.

लोकांचा गेल्या २९ जानेवारीला मौनी अमावस्येदिवशी महाकुंभच्या संगम भागात चेंगराचेंगरीत  मृत्यू, ६० जखमी. गेल्या वर्षी जुलैमध्ये उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये स्वयंभू भोलेबाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

ताशी १५०० तिकिटे

एकिकडे विलंबाने धावणाऱ्या रेल्वे आणि दुसरीकडे सामान्य श्रेणीतील डब्यांसाठी ताशी १५०० तिकिटांची विक्री, यामुळे दिल्ली स्टेशनवर गर्दी वाढत राहिली. आता चुकले कुठे याचा अधिकारी शोध घेत आहेत.

इकडे राजकारण तापले

राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते : प्रयागराजकडे जाणाऱ्यांची संख्या पाहता योग्य नियोजन करायला हवे होते. या घटनेने पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता दिसून आली.

मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस अध्यक्ष : चेंगराचेंगरीची घटना रेल्वे विभागाचे अपयश आणि सरकारच्या असंवेदनशीलतेची साक्ष आहे. सरकार सत्य दडवू पाहत आहे.

लालुप्रसाद यादव, राजद प्रमुख : दिल्ली स्टेशनवरील घटनेला सर्वस्वी रेल्वे विभागच जबाबदार आहे.

अखिलेश यादव, सपा प्रमुख : सुनियोजित व्यवस्थेच्या अभावामुळे अशा दुर्घटना होत आहेत.

टॅग्स :New Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीrailwayरेल्वे